शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू संस्कृतीच्या पितृपक्षातील पूजनीय कावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:26 IST

वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवरही होत आहे. याची प्रचिती पर्यावरणातील होत असलेल्या ....

ठळक मुद्देमहत्त्व आजही कायम : प्रदूषण, टॉवर, रसायने प्रजातींसाठी ठरताहेत ‘काळ’

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवरही होत आहे. याची प्रचिती पर्यावरणातील होत असलेल्या जीवसृष्टीच्या ºहासावरून नेहमीच आलेली आहे. पर्यावरणातील तसेच हिंदू संस्कृतीतील महत्त्वपूर्ण मानला जाणारा पक्षी कावळा आज वाढत्या प्रदूषणामुळे जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वायू प्रदूषण, मोबाईल टॉवरमधील धोकादायक तरंग तसेच शेती व इतर क्षेत्रात वापरल्या जाणाºया रसायनांच्या परिणामांमुळे आजघडीला कावळ्यांची संख्या कमी झाली आहे. तरीसुद्धा पितृपक्षातील कावळ्याचे महत्त्व आजही कायम आहे. सर्वपित्री अमावस्या मंगळवारी साजरी होत आहे. या निमित्ताने सण व कावळ्याच्या महत्त्वाचा घेतलेला हा आढावा.पितृपक्षाच्या पंधरवड्यात प्राचीन काळापासून कावळ्याला एक वेगळे महत्त्व आहे. ही परंपरा हिंदू संस्कृतीत आजही जोपासली जात आहे. कावळा हा चतूर व बुद्धिमान पक्षी आहे. देशी कावळा, डोम कावळा, पहाडी कावळा तर चवथा अत्यंत दुर्मीळ आढळणारा पांढरा कावळा असे कावळ्यांच्या जातीचे चार प्रकार पाहावयास मिळतात. ग्रामीण भागात बहुतेक देशी व डोम कावळा आढळतो. परंतु पूर्वीच्या तुलनेत आज झालेल्या प्रदूषणामुळे कावळ्यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. श्री गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षाला सुरूवात होते. या पंधरवड्यात घरावर टाकलेले अन्न कावळ्यांनी खावे याकरिता हाजीहाजी करावी लागते. पितृपक्षात पूजापाठ केल्यानंतर द्रोणातील नवैैद्य जोपर्यंत कावळा ग्रहण करीत नाही. तोपर्यंत सारेजण जेवणाची वाट पाहत असतात. पितृपक्षात फिरणाºया कावळ्यांना यावेळी सुगीचे दिवस असतात. पितृपक्षात पूजापाठ केल्यानंतर नवैैद्याचा अधिकार प्रथम कावळ्यांना दिला जातो. पूर्वजांच्या रूपात कावळा घरी अन्नग्रहण करण्याकरिता येतो, असाही समज ग्रामीण भागात आहे. किंवा कावळ्याच्या पिलांना, कावळ्याला माणसाचा स्पर्श झाला तर त्या कावळ्यावर इतर कावळे हल्ला करतात, असाही समज ग्रामीण भागात आहे. एकूणच, पितृपक्षातील पंधरवड्यात कावळ्याचे महत्त्व आजही कायम आहे.अमावस्येला अशी होते पूजापितृपक्ष अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी खास पक्वानांचे पात्र तयार केले जाते. त्याची पूजा केल्यानंतरच पात्रातील सर्व पदार्थ एका पळसाच्या किंवा घोगर वनस्पतीच्या पानांच्या द्रोणात काढून ते अंगणात ठेवतात. त्यामागील उद्देश असा की, कावळ्यांनी चोच मारून ते थोडेतरी ग्रहण करावे. कारण कावळ्यांनी चोच मारल्यानंतर ते पात्र स्वर्गातील आपल्या पितरांना पावन होते, असा समज हिंदू संस्कृतीत आजही कायम आहे. त्यामुळे पितृपक्षात कावळ्यांचे महत्त्व पूजनीय व अनन्यसाधारण आहे.दुर्गम भागातून कावळे लुप्तजिल्ह्यातील जंगलात अनेक जातींचे पशुपक्षी आढळून येतात. यात कावळ्यांची संख्या पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. परंतु मागील काही वर्षांपासून प्रत्येक गावात आढळणारा कावळा दुर्गम भागातून लुप्त झाला आहे. चिमणी व इतर पक्ष्यांचा ठावठिकाणाही दुर्गम भागातील पाड्यांमध्ये दिसून येत नाही. कावळ्यांची शिकार करून त्यांचे पंख एका बांबूच्या टोकावर अडकवून ठेवण्याची प्रवृत्ती बळावल्यामुळे तसेच शिकारी वाढल्याने दुर्गम भागातील कावळे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे संख्येवरून दिसून येते.