शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

धान पेरणीचेही झाले यांत्रिकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

धान पट्ट्यात एक एकर शेतजमिनीत नांगरणी, वखरणी व चिखलणी आदी कामापर्यंतचा खर्च दीड ते दोन हजार रुपये आहे. त्यानंतर रोवणी कामाचा खर्च प्रती एकर अडीच ते तीन हजार रुपये येतो. मजुरांमार्फत हे सर्व कामे केल्यास वरील प्रमाणे खर्च येतो. मात्र शेती मशागतीची हीच कामे यंत्राच्या सहाय्याने केली तर कमी खर्चास सोयीस्कर होते

ठळक मुद्देपेरणीला वेग : शेतीच्या कामात यंत्राचा वापर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात शेती मशागतीच्या कामात यंत्राचा वापर वाढला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षापासून धान पेरणीचे कामही यंत्रामार्फत केले जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात मानापूर/देलनवाडी परिसरासह बऱ्याच ठिकाणी यंत्राच्या सहाय्याने धानाची पेरणी केली जात आहे.धान पट्ट्यात एक एकर शेतजमिनीत नांगरणी, वखरणी व चिखलणी आदी कामापर्यंतचा खर्च दीड ते दोन हजार रुपये आहे. त्यानंतर रोवणी कामाचा खर्च प्रती एकर अडीच ते तीन हजार रुपये येतो. मजुरांमार्फत हे सर्व कामे केल्यास वरील प्रमाणे खर्च येतो. मात्र शेती मशागतीची हीच कामे यंत्राच्या सहाय्याने केली तर कमी खर्चास सोयीस्कर होते. ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्राचा वापर केला तर चिखलणी करून रोवणी करण्याची गरज पडत नाही. परिणामी साडेचार ते पाच हजार रुपयांच्या खर्चाची एकरामागे बचत होते.ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्र आधुनिक पद्धतीने बनविण्यात आले. या पेरणी यंत्रामध्ये एका उपकरणात खत ठेवले जाते. दुसºया उपकरणात धान बियाणे टाकले जाते. याला थेट दोन्ही पाईप लावून ते फाळाला जोडण्यात आले आहे. ज्याप्रमाणे लाकडी तिफन नांगर असतो. त्यापद्धतीने हे यंत्र बनविण्यात आले आहे. ज्यावेळी ट्रॅक्टर सुरू होते त्या एकाच वेळी नांगरणी तसेच खताची मात्रा व बियाणे मातीत पेरली जातात. त्यामुळे बराच खर्च वाचतो. सदर पेरणी यंत्राने धानाचा पेरा विशिष्ट ठराविक अंतराने होत असल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून धानाच्या रोपांना योग्य मात्रानुसार खत पुरवठा होतो. परिणामी वाढही योग्य पद्धतीने होऊन उत्पादनात वाढ होते.मांगदाच्या शेतात प्रात्यक्षिकमानापूर देलनवाडी परिसरातील मांगदा येथील शेतात कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी सदर यंत्राच्या सहाय्याने शेतात प्रत्यक्ष धानाची पेरणी करण्यात आली. यावेळी आरमोरी तालुका कृषी अधिकारी टी.डी.ढगे, मंडळ कृषी अधिकारी एस.पी.ढोणे, कृषी पर्यवेक्षक जी.एन.जाधव, कृषी सहाय्यक कोविद मडकाम उपस्थित होते.मजुराच्या तुटवड्यावर उपायशेती मशागतीचे कामे करण्यास पूर्वीप्रमाणे आता मजूर मिळत नाही. गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी व शेतमजुराची संख्या मोठी आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ, निराधार योजनेचे महिन्याला मिळणारे अनुदान, स्वस्त धान्य दुकानातून अत्यल्प दरात उपलब्ध होणारे धान्य तसेच इतर अडचणीच्या वेळी मिळणारी शासकीय व अशासकीय मदत या सर्व कारणामुळे प्रचंड मेहनतीचे काम करण्यास मजूर तयार होत नाही. मजूर मिळत नसल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील अनेक मोठ्या शेतकऱ्यांनी आपली अर्धी शेतजमीन दुसऱ्या शेतकऱ्याला भाड्याच्या स्वरूपात लागवडीसाठी दिली आहे. काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व इतर यंत्र खरेदी करून यंत्राच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे कल वाढविला आहे. कृषी विभागाची जनजागृती, सरकारी अनुदान यामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे.

टॅग्स :agricultureशेती