शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

१० गावात धानबिज प्रक्रिया प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

बियाणांवर बिज प्रक्रिया बुरशीचा नाश होतो. बियाणांची उगमवण क्षमता वाढते. व बियाणे सक्षक्त होते. प्रक्रिया केलेल्या बियाणांमुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहज घरी करता येणारी धानबिज प्रक्रिया करावी, बाजारातील महागडे धानबियाणे खरेदी करून तोट्याची शेती करू नये, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १० गावांमध्ये बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : महागडे धान बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांनी टाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांसह कृषी विभागाचे कर्मचारीही शेतीबाबत सतर्क झाले आहेत. तालुका कृषी कार्यालय आरमोरीच्या वतीने ग्रामीण भागात धानबिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.बियाणांवर बिज प्रक्रिया बुरशीचा नाश होतो. बियाणांची उगमवण क्षमता वाढते. व बियाणे सक्षक्त होते. प्रक्रिया केलेल्या बियाणांमुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहज घरी करता येणारी धानबिज प्रक्रिया करावी, बाजारातील महागडे धानबियाणे खरेदी करून तोट्याची शेती करू नये, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १० गावांमध्ये बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. वैरागड, मोहझरी, परसवाडी, खडकी, कोरेगाव, पिसेवडधा, नरोटी (माल), डार्ली, बोरी आदी गावात प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर गावाच्या मध्यभागी तसेच मोकळ्या जागेत फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून कृषी विभागाच्या वतीने बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी एस.पी.ढोणे, कृषी पर्यवेक्षक जी.एन.जाधवर, कृषी सहायक अमित केराम, कोविद मडकाम, लीना करंगामी आदी उपस्थित होते.याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी एस.एस.ढगे यांनी सदर १० गावांमध्ये शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया, लागवडीची पद्धती, यंदाच्या खरीप हंगामात होणारा पाऊस आदीबाबत मार्गदर्शन केले. आरमोरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व शेतीमशागतीची कामे सुरू आहेत. शेताची स्वच्छता करणे, शेतात सेंद्रिय खत टाकणे, काटेरी झाडेझुडूपे तोडणे आदी कामे सकाळच्या सुमारास शेतकरी व शेतमजूर करीत असताना दिसून येत आहे. काही शेतकरी पीक लागवडीसाठी पैशाची जुळवाजुळव करीत असतानाही पीक कर्जासाठी धावपळ सुरू आहे.अशी करा बिज प्रक्रियाएका बादलीमध्ये १० लीटर पाणी घ्यावे. मिठ द्रावण ढवळून घ्यावे. या द्रावणात धानबियाणे टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे द्रावणाबाहेर करून दोन ते तीन वेळा या बियाणाला स्वच्छ पाण्याने धुवावे. सदर बियाणे सावलीमध्ये २४ तास वाळवावे. प्रक्रिया केलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती