शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१० गावात धानबिज प्रक्रिया प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

बियाणांवर बिज प्रक्रिया बुरशीचा नाश होतो. बियाणांची उगमवण क्षमता वाढते. व बियाणे सक्षक्त होते. प्रक्रिया केलेल्या बियाणांमुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहज घरी करता येणारी धानबिज प्रक्रिया करावी, बाजारातील महागडे धानबियाणे खरेदी करून तोट्याची शेती करू नये, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १० गावांमध्ये बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : महागडे धान बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांनी टाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांसह कृषी विभागाचे कर्मचारीही शेतीबाबत सतर्क झाले आहेत. तालुका कृषी कार्यालय आरमोरीच्या वतीने ग्रामीण भागात धानबिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.बियाणांवर बिज प्रक्रिया बुरशीचा नाश होतो. बियाणांची उगमवण क्षमता वाढते. व बियाणे सक्षक्त होते. प्रक्रिया केलेल्या बियाणांमुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहज घरी करता येणारी धानबिज प्रक्रिया करावी, बाजारातील महागडे धानबियाणे खरेदी करून तोट्याची शेती करू नये, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १० गावांमध्ये बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. वैरागड, मोहझरी, परसवाडी, खडकी, कोरेगाव, पिसेवडधा, नरोटी (माल), डार्ली, बोरी आदी गावात प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर गावाच्या मध्यभागी तसेच मोकळ्या जागेत फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून कृषी विभागाच्या वतीने बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी एस.पी.ढोणे, कृषी पर्यवेक्षक जी.एन.जाधवर, कृषी सहायक अमित केराम, कोविद मडकाम, लीना करंगामी आदी उपस्थित होते.याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी एस.एस.ढगे यांनी सदर १० गावांमध्ये शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया, लागवडीची पद्धती, यंदाच्या खरीप हंगामात होणारा पाऊस आदीबाबत मार्गदर्शन केले. आरमोरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व शेतीमशागतीची कामे सुरू आहेत. शेताची स्वच्छता करणे, शेतात सेंद्रिय खत टाकणे, काटेरी झाडेझुडूपे तोडणे आदी कामे सकाळच्या सुमारास शेतकरी व शेतमजूर करीत असताना दिसून येत आहे. काही शेतकरी पीक लागवडीसाठी पैशाची जुळवाजुळव करीत असतानाही पीक कर्जासाठी धावपळ सुरू आहे.अशी करा बिज प्रक्रियाएका बादलीमध्ये १० लीटर पाणी घ्यावे. मिठ द्रावण ढवळून घ्यावे. या द्रावणात धानबियाणे टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे द्रावणाबाहेर करून दोन ते तीन वेळा या बियाणाला स्वच्छ पाण्याने धुवावे. सदर बियाणे सावलीमध्ये २४ तास वाळवावे. प्रक्रिया केलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती