शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

संस्थांच्या आडकाठीने अहेरीत धान खरेदी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:35 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत अहेरी उपविभागात असलेल्या ३३ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाºयांनी यंदाच्या खरीप हंगामात मंजुरी प्रदान केली आहे.

ठळक मुद्देतीन केंद्र नाममात्र सुरू : अहेरी उपविभागात आतापर्यंत धानाची आवक नाही; कमिशनचा मुद्दा ऐरणीवर

ऑनलाईन लोकमत गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत अहेरी उपविभागात असलेल्या ३३ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात मंजुरी प्रदान केली आहे. मात्र गतवर्षी खरेदी केलेल्या धानाच्या कमिशनच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अहेरी उपविभागात अद्यापही ३० धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत अहेरी उपविभागात महामंडळाच्या केंद्रावर धान खरेदी झाली नाही.आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने अहेरी उपविभागातील अंकिसा, आसरअल्ली, अमरादी या ठिकाणचे तीन धान खरेदी केंद्र बुधवारी व गुरूवारी रितसर उद्घाटन करून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मुलचेरा, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी आदी पाच तालुक्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करून दरवर्षी लाखो क्विंटल धानाची खरेदी केली जाते. मात्र कमिशनच्या मुद्यावरून संस्थांनी आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदीच्या कामात पंचाईत केली आहे.अहेरी उपविभागातही धानाची कापणी व बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हलक्या प्रतीच्या धानाची मळणीही झाली आहे. मात्र महामंडळाचे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकºयांची अडचण झाली आहे.आता संस्थाच नियुक्त करणार प्रतवारीकारआदिवासी विकास महामंडळाच्या सर्वच कार्यालयात पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आहे. पदे रिक्त असल्याने महामंडळाला प्रतवारीकार नियुक्त करणे शक्य होत नाही. त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनीच आपल्या संबंधित केंद्रांवर प्रतवारीकार (ग्रेडर)ची नियुक्ती करावी, असा निर्णय महामंडळाच्या संचालक बोर्डांनी घेतला आहे. त्यामुळे आता केंद्रांवर प्रतवारीकाराची नियुक्ती संस्थेकडूनच होणार आहे. प्रतवारीकाराला महामंडळातर्फे क्विंटलमागे पाच रूपये देण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रशिक्षण गडचिरोली येथे शनिवारी आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या निमित्ताने महामंडळाचे नाशिक येथील वरिष्ठ अधिकारी गडचिरोलीत येत आहेत. या प्रशिक्षण बैठकीत अहेरी उपविभागातील सहकारी संस्थांकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.२०१६-१७ च्या खरीप हंगामातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे धान खरेदीपोटीचे ४० टक्के कमिशन हुंडीमध्ये अदा करण्यात आले. तर खरेदी हंगाम आटोपल्यावर केंद्रावरून धानाची उचल झाल्यानंतर घटीतुटीचा हिशोब करण्यात आला. त्यानंतर संस्थांना ६ लाख १० हजार २५ रूपये इतके ६० टक्के कमिशन अदा करण्यात आले आहे. संस्थांची धान खरेदी हंगामातील दोन टक्के शासनाकडून मान्य केली जाते.- आशिष मुळेवार, उपप्रादेशिक व्यवस्थापक अहेरी