शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

पाण्याअभावी धानपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:03 IST

ऑनलाईन लोकमतमानापूर/देलनवाडी : मानापूर, देलनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपीकाची लागवड करण्यात आली आहे. या परिसरातून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीचे पात्र कोरडे पडल्याने धानपीक धोक्यात आले आहे.नदी काठावरील बहुतांश शेतकरी उन्हाळी धानपीकाचे उत्पादन घेतात. या पिकाला नदीपात्रातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मानापूर, देलनवाडी परिसरात शेकडो हेक्टरवर धानपीक लावण्यात आले आहे. धानपिकाच्या रोवणीचे ...

ठळक मुद्देखोब्रागडी नदी आटली : सिंचनाअभावी उन्हाळी धानपीक करपण्याचा धोका

ऑनलाईन लोकमतमानापूर/देलनवाडी : मानापूर, देलनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपीकाची लागवड करण्यात आली आहे. या परिसरातून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीचे पात्र कोरडे पडल्याने धानपीक धोक्यात आले आहे.नदी काठावरील बहुतांश शेतकरी उन्हाळी धानपीकाचे उत्पादन घेतात. या पिकाला नदीपात्रातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मानापूर, देलनवाडी परिसरात शेकडो हेक्टरवर धानपीक लावण्यात आले आहे. धानपिकाच्या रोवणीचे काम पूर्ण झाले असून हिरवेकंच धानपीक डोलायला लागले आहे. मात्र अशातच खोब्रागडी नदीचे पात्र पूर्णपणे आटले आहे. काही शेतकऱ्यांनी नदीपात्रात खड्डा खोदून खड्ड्यातील पाणी धानपिकाला मोटारच्या सहाय्याने देण्यास सुरुवात केली आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यातच नदीपात्र कोरडे पडले आहे. नदीच्या भूगर्भातील पाण्याची पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे. धानपीक निघण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.उन्हाळ्यात कडक ऊन पडत असल्याने धानपिकाला अधिक पाणी द्यावे लागते. धानाच्या रोवणीवर काही शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च केले आहेत. मात्र पाण्याअभावी सदर धानपीक करपण्याचा धोका आहे. शासनाने खोब्रागडी नदीच्या पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी नदीपात्रात लहान बंधारे बांधावे, अशी मागणी आहे.