शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

जंगली डुकरांमुळे धानपीक उद्ध्वस्त

By admin | Updated: November 14, 2015 01:29 IST

तालुक्यातील चेरपल्ली येथे जंगली डुकरांनी हैदोस घातला असून कापणीसाठी तयार झालेले पीक उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे.

चेरपल्लीतील शेतकरी त्रस्त : वन विभागाने नुकसान भरपाई द्यावीअहेरी : तालुक्यातील चेरपल्ली येथे जंगली डुकरांनी हैदोस घातला असून कापणीसाठी तयार झालेले पीक उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. चेरपल्ली गावातील संपूर्ण शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे जंगलातील डुकरे धानपिकात शिरून नासाडी करीत आहेत. रानडुकरांचा कळप धान शेतीमध्ये शिरत असल्याने एकाच दिवशी चार ते पाच हेक्टरवरील शेताचे नुकसान होत आहे. चेरपल्ली येथील किशोर मल्लीय्या सुनतकर यांनी तीन एकर जमिनीत धानपिकाची लागवड केली. यावर्षी पाण्याची कमतरता असतानाही विहिरीने दररोज पाणी देऊन पिकाची निगा राखली. धानपिकाला लोंब लागले असून कापणीसाठी तयार झाले आहे. तीन दिवसांपूर्वी डुकरांचे कळप शेतामध्ये शिरून धानपिकाची नासधूस केली. दुष्काळी परिस्थितीतूनही सुनतकर यांनी धानपीक वाचविले. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. सुनतकर यांच्यासोबतच इतरही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. सुनतकर यांनी याबाबतची तक्रार वनपरिक्षेत्र कार्यालय अहेरी येथे केली आहे. चेरपल्ली पिकाचे वनरक्षक आनकरी यांनी पिकाची पाहणी केली व वरिष्ठांकडे ही घटना कळविले आहे. वन विभागाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)