शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पावसाने धान चिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:20 IST

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळी वातावरण कायम असून सोमवारी पहाटे व सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसल्याने रबी पिकांसह धान पुंजन्यांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : ढगाळ वातावरणाने रबी पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळी वातावरण कायम असून सोमवारी पहाटे व सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसल्याने रबी पिकांसह धान पुंजन्यांचे नुकसान झाले. कुरखेडा, देसाईगंज, चामोर्शी तालुक्यात केंद्रावर विक्रीसाठी आणलेला धान भिजल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.कुरखेडा : सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव, आंधळी, सोनसरी, येंगलखेडा व कुरखेडा या केंद्राच्या परिसरात ठेवलेले धानाचे पोते भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. धानाची विक्री करण्यासाठी कुरखेडा परिसरातील शेतकºयांनी विविध केंद्रांवर आपले धान आणले. तीन ते चार गाव मिळून महामंडळाच्या वतीने एक धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. त्यामुळे एका गावाला आठवड्यातून केवळ एक दिवस धानाचा काटा करण्यासाठी मिळतो. अनेक शेतकरी थेट शेताच्या शेतातून आविकाच्या केंद्रांवर धान विक्रीसाठी आणतात. केंद्र परिसरात शेडची व्यवस्था नसल्याने खुल्या परिसरात धान ठेवले जाते. दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने शेतकºयांचे धान भिजून नुकसान झाले.विसोरा : ढगाळी वातावरणामुळे देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने विसोरा भागातील अनेक शेतकºयांचे धान पुंजने ओले झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. आॅगस्ट महिन्याअखेरीस झालेला पाऊस सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर व आता डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतर पुन्हा परतला. तब्बल १०० दिवसांनी झालेल्या या पावासाच्या सरींनी शेतकºयांचे नुकसान केले. सद्य:स्थितीत धान उत्पादक शेतकºयांच्या धान मळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. अनेक शेतकºयांचे धान पुंजने अद्यापही शेतातच आहे. सोमवारी झालेल्या पावसाने धान पुंजने ओले झाले. नुकसानीच्या भितीपोटी आता शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणी, रोवणी, निंदन, कापणी, बांधणी व आता मळणी असे टप्पे शेतकºयांना पार करावे लागतात. सर्वत्र धान मळणीची लगबग सुरू असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना वेळेवर मळणी यंत्र उपलब्ध होत नाही. परिणामी धान पुंजने तसेच शेतात ठेवावे लागतात. मळणीसाठी विलंब झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान पुंजने सोमवारी झालेल्या पावसात सापडले. पाऊस बंद होऊन कडक ऊन निघाल्यास धान पुंजने सडणार नाहीत. मात्र पुन्हा पाऊस झाल्यास धानाचे नुकसान निश्चित आहे. बळीराजा आता सुर्योदयाची आशा बाळगूण आहे. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने रबी हंगामातील तूर, मूग, लाखोळी, उडीद आदीसह भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे.आष्टी : आष्टी येथे सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका कापूस, तूर पिकांना बसला आहे. आष्टी भागात आज सकाळपासूनच ढगाळी वातावरण कायम होते. अवकाळी पावसाने या भागातील शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. आष्टी भागाला मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.सायंकाळच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या विसोरा, शंकरपूर येथे पावसाला सुरूवात झाली आहे. देसाईगंज तालुक्यात १.०, कोरची तालुक्यात ६.३ पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे. अवकाळी पाऊस व ढगाळी वातावरणामुळे टमाटर पिकासह इतर भाजीपाला पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Marketबाजार