शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पावसाने धान चिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:20 IST

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळी वातावरण कायम असून सोमवारी पहाटे व सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसल्याने रबी पिकांसह धान पुंजन्यांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : ढगाळ वातावरणाने रबी पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळी वातावरण कायम असून सोमवारी पहाटे व सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसल्याने रबी पिकांसह धान पुंजन्यांचे नुकसान झाले. कुरखेडा, देसाईगंज, चामोर्शी तालुक्यात केंद्रावर विक्रीसाठी आणलेला धान भिजल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.कुरखेडा : सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव, आंधळी, सोनसरी, येंगलखेडा व कुरखेडा या केंद्राच्या परिसरात ठेवलेले धानाचे पोते भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. धानाची विक्री करण्यासाठी कुरखेडा परिसरातील शेतकºयांनी विविध केंद्रांवर आपले धान आणले. तीन ते चार गाव मिळून महामंडळाच्या वतीने एक धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. त्यामुळे एका गावाला आठवड्यातून केवळ एक दिवस धानाचा काटा करण्यासाठी मिळतो. अनेक शेतकरी थेट शेताच्या शेतातून आविकाच्या केंद्रांवर धान विक्रीसाठी आणतात. केंद्र परिसरात शेडची व्यवस्था नसल्याने खुल्या परिसरात धान ठेवले जाते. दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने शेतकºयांचे धान भिजून नुकसान झाले.विसोरा : ढगाळी वातावरणामुळे देसाईगंज तालुक्याच्या विसोरा भागासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने विसोरा भागातील अनेक शेतकºयांचे धान पुंजने ओले झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. आॅगस्ट महिन्याअखेरीस झालेला पाऊस सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर व आता डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतर पुन्हा परतला. तब्बल १०० दिवसांनी झालेल्या या पावासाच्या सरींनी शेतकºयांचे नुकसान केले. सद्य:स्थितीत धान उत्पादक शेतकºयांच्या धान मळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. अनेक शेतकºयांचे धान पुंजने अद्यापही शेतातच आहे. सोमवारी झालेल्या पावसाने धान पुंजने ओले झाले. नुकसानीच्या भितीपोटी आता शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणी, रोवणी, निंदन, कापणी, बांधणी व आता मळणी असे टप्पे शेतकºयांना पार करावे लागतात. सर्वत्र धान मळणीची लगबग सुरू असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना वेळेवर मळणी यंत्र उपलब्ध होत नाही. परिणामी धान पुंजने तसेच शेतात ठेवावे लागतात. मळणीसाठी विलंब झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान पुंजने सोमवारी झालेल्या पावसात सापडले. पाऊस बंद होऊन कडक ऊन निघाल्यास धान पुंजने सडणार नाहीत. मात्र पुन्हा पाऊस झाल्यास धानाचे नुकसान निश्चित आहे. बळीराजा आता सुर्योदयाची आशा बाळगूण आहे. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने रबी हंगामातील तूर, मूग, लाखोळी, उडीद आदीसह भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे.आष्टी : आष्टी येथे सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका कापूस, तूर पिकांना बसला आहे. आष्टी भागात आज सकाळपासूनच ढगाळी वातावरण कायम होते. अवकाळी पावसाने या भागातील शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. आष्टी भागाला मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.सायंकाळच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या विसोरा, शंकरपूर येथे पावसाला सुरूवात झाली आहे. देसाईगंज तालुक्यात १.०, कोरची तालुक्यात ६.३ पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली आहे. अवकाळी पाऊस व ढगाळी वातावरणामुळे टमाटर पिकासह इतर भाजीपाला पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Marketबाजार