शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अतिवृष्टीने शेकडो घरे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 23:44 IST

१५ आॅगस्टपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून जमीनदोस्त झालेल्या एकूण घरांचा आकडा ३०० च्या वर जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घरांच्या पडझडीमुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत.

ठळक मुद्देमहसूल विभागामार्फत सर्वेक्षण सुरू : तात्काळ मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा/जिमलगट्टा : १५ आॅगस्टपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून जमीनदोस्त झालेल्या एकूण घरांचा आकडा ३०० च्या वर जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घरांच्या पडझडीमुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांना शासनाने तत्काळ मदत द्यावी तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.१६ आॅगस्ट रोजी किष्टापूर नाल्याला पूर आल्याने किष्टापूर गावाला पाण्याचा वेढा बसला होता. नागरिकांनी इकडे तिकडे धाव घेत कसाबसा आपला प्राण वाचविला. मात्र पाळीव प्राणी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गाय, बैल यांची जीवितहानी झाली. घरातील साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. घरात पाणी शिरल्याने मातीची घरे जमीनदोस्त झाली. शेडा गावालाही पुराने वेढा घातला होता. या गावातील २० घरे पाण्याखाली होती. या घरांमध्ये जवळपास चार फूट पाणी होते. किष्टापूर येथील बाजीराव बापय्या सिडाम यांचे घर कोसळले.जून ते आॅगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्यातील सुमारे ११८ घरांची पडझड झाली असून यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी झाली. नदी, नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये यामुळे घरांचे नुकसान झाले. सिरोंचा तालुका जंगलाने व्यापला आहे. परिणामी दरवर्षीच पुराचा फटका सिरोंचा तालुक्याला बसतो. अतिवृष्टीनंतर महसूल विभागाने केलेल्या पाहणीत सुमारे ११८ घरांची पडझड झाली असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर एक गाय, एक बैल व एक रेडा मृत्यूमुखी पडला आहे. महसूल विभागाच्या मार्फत सर्वेक्षण केले जात आहे. नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर