शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

नागरिक टेबलासभोवताल मात्र कर्मचारी कार्यालयाबाहेर

By admin | Updated: December 16, 2014 22:54 IST

थंडीला सुरूवात झाल्यापासून दुपारी ११ वाजेपर्यंत कर्मचारी उन्ह शेकत कार्यालयाबाहेर राहतात. तर कोसो दुरावरून शासकीय कामासाठी आलेले नागरिक टेबलासभोवताल गोळा होऊन अधिकारी व

गडचिरोली : थंडीला सुरूवात झाल्यापासून दुपारी ११ वाजेपर्यंत कर्मचारी उन्ह शेकत कार्यालयाबाहेर राहतात. तर कोसो दुरावरून शासकीय कामासाठी आलेले नागरिक टेबलासभोवताल गोळा होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट बघत असल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरातील बहुतांश कार्यालयांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी थम्ब मशीन बसविण्यात आली आहे. या थम्ब मशीनवर कार्यालयाच्या वेळेप्रमाणे सकाळी १०.१० ते १०.३० या कालावधीत हजेरी लावणे गरजेचे आहे. अन्यथा सदर कर्मचाऱ्याची उशीरा आल्याची नोंद घेतली जाते. त्यामुळे वेतनात कपात होण्याची शक्यता असल्याने बहुतांश कर्मचारी १०.१० ते १०.३० या कालावधीत कार्यालयात येतात. हजेरी झाल्यानंतर मात्र लगेच बाहेर निघून उन्हात गप्पागोष्टी करीत असल्याचे चित्र बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये दिसून येते. अधिकारीवर्ग जवळपास १२ वाजेपर्यंत शासकीय कार्यालयात येत नाही. त्यामुळे तोपर्यंत कर्मचारी बिनधास्त असतात. कामाच्या लगबगीने कोसो दुरावरून आलेले नागरिक शासकीय कार्यालयात १० वाजताच पोहोचतात. अधिकारी व कर्मचाऱ्याच्या टेबलासभोवताल बसून त्यांची वाट पाहत राहतात. अधिकारी १२ वाजेपर्यंत येत नाही. तर कर्मचारी हजेरी लावून पसार होतात. ११ वाजेपर्यंत टेबलासमोर नागरिकांची सभोवताल गर्दी जमली असल्याचे दिसून येते. मात्र साहेबाला बोलविण्याची हिंमत नागरिकांमध्ये नसल्याने आपसात कर्मचाऱ्यांच्या नावाने बोटे मोडीत उभे राहतात. काही कार्यालये तर पूर्णपणे ओस पडली असल्याचे चित्र बघावयास मिळते. साहेब व कर्मचारी नसले तरी त्यांच्या कार्यालयातील पंखे व लाईट मात्र सुरूच राहतात. थम्ब मशीनवर हजेरी लावल्याने कर्मचारी कार्यालयात आला, हे सिद्ध झाले असले तरी त्याच्या येण्याबरोबरच कामसुद्धा होणे महत्वाचे आहे. कर्मचाऱ्यांच्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी समज देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)