शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

माेहझरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST

महागाईमुळे सामान्य ग्राहक त्रस्त मुलचेरा : मागील काही महिन्यांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. ...

महागाईमुळे सामान्य ग्राहक त्रस्त

मुलचेरा : मागील काही महिन्यांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच महागाईमुळे जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्या

कुरुड (काेंढाळा) : सध्या काही नागरिकांकडे सिलिंडर घेण्याइतके पैसे नसल्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत. त्यामुळे जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तलावाचे सर्वेक्षण करावे

जाेगीसाखरा : जिल्ह्यातील मागील अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावाचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

महा-ई-सेवा केंद्र अत्यल्प

भामरागड : जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी, महा-ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले, तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असल्याने अनेकदा चकरा माराव्या लागतात.

जिल्ह्यातील सौरदिवे दुरुस्त करावे

रांगी : शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यातील विविध गावांत सौर पथदिवे सुरू केले. मात्र, यातील अर्धेअधिक सौरदिवे बंद अवस्थेत आहेत. दरम्यान, काही सौरदिव्यांच्या बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

जंगली प्राण्यांची गावाकडे धाव

भामरागड : तालुक्यातील काही गावांतील शेतशिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या उन्हाची चाहूल लागल्यामुळे जंगली प्राणी पाण्याच्या शोधात शेतशिवारात येत आहेत. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वीज खांबामुळे अपघाताचा धोका

आरमाेरी : येथील अनेक वॉर्डांतील रस्त्यालगत असलेले वीज खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे.

शौचालयाचा गैरवापर

घाेट : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने, शौचालयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जागृतीची गरज निर्माण झाली आहे.

बेरोजगारांमध्ये नैराश्य

देसाईगंज : परिसरात मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार असून, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहेत. त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी परिसरात उद्योगाची निर्मिती करावी, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.

कोसा उत्पादकांना लोखंडी शिडी द्यावी

आरमाेरी : भोई-ढिवर समाजाचा मासेमारीसोबतच कोसा (रेशीम) उत्पादनावर भर आहे. आरमाेरी तालुक्यात चामाेर्शी माल, वणखी, वासाळा या गावांमध्ये कोसा उत्पादन माेठ्या प्रमाणात घेतल्या जाते. त्यामुळे झाडावरुन कोसा तोडण्यासाठी लोखंडी शिडी शासनाने सदर उत्पादकांना द्यावी, अशी मागणी कोसा उत्पादकांनी केली आहे.

धोकादायक पुलाला कठडे लावा

चामाेर्शी : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षण कठडे तुटले असून, काही चोरीलाही गेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी होत आहे.

ट्रॅव्हल्समुळे अपघाताची शक्यता

गडचिराेली : शहरातील काही ट्रॅव्हल्सधारक रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स उभ्या ठेवतात. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर प्रवाशांकरिता ट्रॅव्हल्स उभ्या ठेवल्या जात आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

जिल्ह्यातील शिवभोजनाचे केंद्र वाढावे

गडचिराेली : शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केली आहेत. मात्र, त्याच्यातील थाळींची संख्या मोजकीच ठेवली आहे, शिवाय केंद्रांची संख्या कमी आहे.

रस्त्यावरील वृक्षांना रेडियम पट्ट्या लावाव्या

गडचिराेली : तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा व प्रमुख मार्ग समजल्या जाणाऱ्या गडचिराेली ते आरमाेरी रस्त्यावरील वृक्षांवर रेडियम पट्ट्या लावण्यात याव्या, अशी मागणी वाहतूकदारांकडून होत आहे. वृक्षावर रेडियम पट्टी लावल्यास रात्रीच्या अंधारात प्रवासासाठी सोयीचे होईल, त्यामुळे पट्ट्या लावण्यात याव्या, अशी मागणी आहे.

बचतगटांना कर्जपुरवठा करण्याची मागणी

आलापल्ली : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात परिणाम पडला आहे. यामध्ये बचत गटांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांनी कर्जपुरवठा करून त्यांना जीवनदान देणे सध्यातरी गरजेचे आहे.

पांदण रस्त्यामुळे भांडणे वाढली

एटापल्ली : ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते आता संकटात आहे. शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भांडणे होत आहेत.

रोजगार हमीची कामे सुरू करावी

वैरागड : परिसरात शेतमजुरांची संख्या बरीच आहे. मात्र, रोहयोची कामे सुरू करण्यात आली नाही. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने सिंचन व कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कामे सुरू केली होती. त्यामुळे मजुरांच्या हाताला काेम मिळाले. मात्र, या वर्षी जॉब कार्डवाटप करूनही काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे कुटुंब कसे चालावे, हा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे.