शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पाच हजार एकरवर होणार सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:55 IST

आत्माच्या पुढाकाराने यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार एकरवर सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे ३१ गट तयार करण्यात आले आहेत. रासायनिक खतांमुळे कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण झाली.

ठळक मुद्दे‘आत्मा’चा पुढाकार : जिल्ह्यातील १,२०० शेतकरी सहभागी

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आत्माच्या पुढाकाराने यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार एकरवर सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे ३१ गट तयार करण्यात आले आहेत.रासायनिक खतांमुळे कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण झाली. उत्पादनात दुपटीने वाढ झाली. मात्र दिवसेंदिवस आता रासायनिक खते व कीटकनाशकांचे दुष्परिणाम मानवी आरोग्यासह जमिनीवर सुद्धा होऊ लागले आहेत. दिवसेंदिवस जमिनीची उत्पादकता कमी होत चालली आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचा मारा असाच सुरू राहिल्यास जमीन पूर्णपणे नापीक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेंद्रिय पध्दतीने शेती करण्याचा उपाय सुचविला जात आहे.शेतकऱ्यांना रासायनिक खते व कीटकनाशके वापरायची सवय झाली आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती नेमकी कशा पध्दतीने करावी याबाबतचे ज्ञानही नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार आत्माने पुढाकार घेत मागील तीन वर्षांपासून सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी जिल्हाभरातून शेतकऱ्यांचे ३१ गट तयार करण्यात आले आहेत. २०१६-१७ या वर्षात १ हजार ५०० एकरवर सेंद्रिय शेती करण्यात आली. २०१७-१८ या वर्षात २ हजार ५० एकरवर सेंद्रिय शेती झाली. तर २०१८-१९ या वर्षात पाच हजार एकरवर सेंद्रिय शेती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सेंद्रिय शेतीचे लाभ शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर या शेतीखालील क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सेंद्रिय पद्धतीने शेतीची मशागत करण्यासाठी आत्माच्या वतीने संबंधित शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे. सेंद्रिय खत व कीटकनाशके तयार करण्यासाठी आवश्यक असलेले काही प्रमाणात साहित्य सुद्धा अनुदानावर उपलब्ध करून दिले जात आहेत. सेंद्रिय शेतीचे फायदे शेतकऱ्यांच्या लक्षात येत असल्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची आशा वर्तविली जात आहे. जागतिक स्तरावर सेंद्रिय शेतीच्या मालाला विशेष मागणी आहे.३१ गावांमध्ये केली जात आहे सेंद्रिय शेतीसेंद्रिय शेती करण्यासाठी ३१ गावांमध्ये ३१ गट तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून १२०० शेतकरी सेंद्रीय शेतीसोबत जोडण्यात आले आहेत. सेंद्रिय शेती होत असलेल्या गावांमध्ये गडचिरोली तालुक्यातील साखरा, नगरी, चामोर्शी तालुक्यातील भिवापूर, वागदरा, मुरखळा चक, भेंडाळा, धानोरा तालुक्यातील मोहगाव, मुलचेरा तालुक्यातील पुल्लीगुडम, कोळसापूर, देसाईगंज तालुक्यातील उसेगाव, आरमोरी तालुक्यातील सुकाळा, गणेशपूर चक, कुरखेडा तालुक्यातील मालदुगी, सावरखेडा, वाढोणा, नवरगाव, कोरची तालुक्यातील बोंडेणा, साल्ले, अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ, रायगट्टा, मेडीगुडम, एटापल्ली तालुक्यातील रेकनार, पेठा, भामरागड तालुक्यातील हिदूर, सिरोंचा तालुक्यातील कोरलामाल, कोटामाल या गावांचा समावेश आहे.गोप्स नावाची कंपनी रजिस्टर्डसेंद्रिय शेतीतील उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या पुढाकारातून गोप्स (गडचिरोली आॅरगॅनिक फार्मिंग सिस्टीम) हा ब्रॅन्ड तयार केला. या ब्रॅन्ड अंतर्गत मागील वर्षी नागपूर, अकोला, चंद्रपूर, पुणे, मुंबई, दिल्ली व गडचिरोलीत सुमारे ३२ लाख रूपयांचे उत्पादन विकण्यात आले. सेंद्रिय शेतीसोबत जोडलेले शेतकरी कायम राहावे, यासाठी गोप्स नावाची कंपनी सुद्धा रजिस्टर्ड करण्यात आली आहे. या कंपनीचे संचालन १२ तालुक्यातील १२ शेतकरी करणार आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती