शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

कृषी कार्यालयात उरले केवळ दोनच कर्मचारी

By admin | Updated: January 16, 2016 01:53 IST

१८४ गावातील हजारो शेतकऱ्यांचा भार वाहणाऱ्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी सुमारे १६ पदे मंजूर करण्यात आले आहेत.

१८४ गावांचा भार : अहेरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची दैनावस्थाविवेक बेझलवार अहेरी१८४ गावातील हजारो शेतकऱ्यांचा भार वाहणाऱ्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी सुमारे १६ पदे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे केवळ यातील दोनच पदे भरण्यात आली असून सुमारे १४ पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाच्या अभावाने शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अडचण जात असून याचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. तालुका कृषी अधिकारी हे कार्यालय राज्य शासनाच्या अखत्यारित येते. या कार्यालयाच्या वतीने कृषी विकासाच्या ८० टक्के योजना राबविल्या जातात. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कार्यालयाबरोबरच तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयसुद्धा स्थापन करण्यात आले आहे. अहेरी तालुक्यात एकूण १८४ गावे आहेत. यापैकी १५८ आबादी गावे तर २६ रिठ गावे आहेत. एकूण १४ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख ३ हजार ७५९ एवढी आहे. यातील ९० टक्के नागरिक शेती हा एकमेव व्यवसाय करतात. त्यामुळे कृषी विभागाचे अहेरी तालुक्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. अहेरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकूण १६ पदे मंजूर आहेत. यामध्ये १ तालुका कृषी अधिकारी, १ कृषी अधिकारी, १ कृषी पर्यवेक्षक, १ कृषी सहाय्यक, १ तालुका सहाय्यक, २ अनुरेखक, १ सहाय्यक अधीक्षक, १ वरिष्ठ लिपीक, ४ कनिष्ठ लिपीक, १ वाहनचालक व ३ शिपाई असे एकूण १६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी कृषी पर्यवेक्षक व कनिष्ठ लिपीक असे दोनच पदे भरण्यात आली असून उर्वरित सुमारे १४ पदे रिक्त आहेत. विविध शासकीय योजनांच्या कामासाठी शेतकरीवर्ग तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये येतात. मात्र या कार्यालयात शुकशुकाट राहते. कमी मनुष्यबळामुळे एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यास महिन्याचा कालावधी लागतो. कधीकधी तर योजनेचा कालावधीही निघून जातो. एकाच अर्जासाठी सतरावेळा या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. दुसरीकडे कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यामुळे कर्मचारीसुद्धा त्रस्त झाले असून पदे भरण्याची मागणी होत आहे. ३० वर्षांपासून कार्यालय भाड्याच्या खोलीतजिल्हा निर्मितीबरोबरच अहेरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचीही स्थापना करण्यात आली. मात्र या कार्यालयाला अजूनपर्यंत स्वतंत्र इमारत शासनाने बांधून दिली नाही. त्यामुळे सदर कार्यालय ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही भाड्याच्याच खोलीत सुरू आहे. कार्यालयासाठी कमी जागा उपलब्ध असल्याने दस्तावेज ठेवण्यासही अडचण निर्माण होत आहे.मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील १७ पैकी १० पदे भरण्यात आली आहेत. तर ७ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सेवक ४, अनुरेखक १ व शिपायाचा १ पद रिक्त आहे.