शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

चारपैकी एकच पॅसेंजर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

देसाईगंज हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असल्याने येथील नागरिकांना देसाईगंजवरूनच पुढचा प्रवास करावा लागताे. देसाईगंज रेल्वे स्थानकावर बऱ्यापैकी प्रवाशी मिळत असल्याने, सर्वच पॅसेंजर व काही एक्स्प्रेसचे थांबेही देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना साेयीचे हाेत हाेते. मात्र, काेराेनाच्या कालावधीत रेल्वेसेवा ठप्प हाेती. त्यानंतर, आता काही प्रमाणात रेल्वे सुरू झाली असली, तरी काही रेल्वे अजूनही बंदच आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील एकमेव असलेल्या देसाईगंज रेल्वे स्थानकावरून काेराेनापूर्वी चार पॅसेंजर धावत हाेत्या. आता मात्र केवळ एकच पॅसेंजर धावत आहे, तसेच काही एक्स्प्रेस गाड्यांचे थांबेही रद्द करण्यात आले आहेत. देसाईगंज हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असल्याने येथील नागरिकांना देसाईगंजवरूनच पुढचा प्रवास करावा लागताे. देसाईगंज रेल्वे स्थानकावर बऱ्यापैकी प्रवाशी मिळत असल्याने, सर्वच पॅसेंजर व काही एक्स्प्रेसचे थांबेही देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना साेयीचे हाेत हाेते. मात्र, काेराेनाच्या कालावधीत रेल्वेसेवा ठप्प हाेती. त्यानंतर, आता काही प्रमाणात रेल्वे सुरू झाली असली, तरी काही रेल्वे अजूनही बंदच आहेत. सध्या गाेंदिया-बल्लारशहा ही पॅसेंजर सकाळी १० वाजता गाेंदियावरून बल्लारशहाकडे जाते व सायंकाळी ५.३४ वाजता गाेंदियाकडे जाते. याच मार्गाने चालणाऱ्या उर्वरित तीन पॅसेंजर बंद आहेत. मागील एक महिन्यापासून एसटीचाही संप सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास करावा लागत आहे. एकच पॅसेंजर असल्याने या पॅसेंजरमध्ये माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी राहते. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.

प्रवाशांच्या खिशाला झळ

काेराेनाच्या कालावधीत शासनाने रेल्वेसेवा बंद ठेवली हाेती. आता मात्र, काेराेनाचे रुग्ण कमी झाले आहेत. सर्वच क्षेत्रातील काम पूर्ववत सुरू झाले आहे. मात्र, शासनाने अनेक पॅसेंजर बंदच ठेवल्या आहेत. पॅसेंजर बंद असण्याबराेबरच एसटीचा संपही सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही. शासनाने पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे.                  - शरद मेश्राम, नागरिक

दरभंगा, यशवंतपूर-काेरबा एक्स्प्रेसचा थांबा रद्ददेसाईगंज रेल्वे मार्गाने दिवसभरातून अनेक एक्स्प्रेस धावतात. त्यापैकी यशवंतपूर-काेरबा, बिलासपूर-चेन्नई व दरभंगा या तीन एक्स्प्रेसचे काेराेनापूर्वी देसाईगंज येथे थांबे हाेते. आता मात्र, यशवंतपूर-काेरबा, दरभंगा या दाेन एक्स्प्रेसचा देसाईगंज येथील थांबा रद्द करण्यात आला आहे. केवळ बिलासपूर-चेन्नई या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. बिलासपूरवरून चेन्नईकडे जाणारी एक्सप्रेस दुपारी ३ वाजता देसाईगंजात पाेहाेचते, तर चेन्नईवरून बिलासपूरला जाणारी एक्स्प्रेस रात्री ७.४० वाजता देसाईगंज येथे पाेहाेचते.

 

टॅग्स :railwayरेल्वे