शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाच्या दक्षता समित्या नावापुरत्याच

By admin | Updated: March 3, 2016 01:33 IST

इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाने शाळा, महाविद्यालये व परीक्षा केंद्रस्तरावर दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत.

कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची होती जबाबदारीदेसाईगंज : इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाने शाळा, महाविद्यालये व परीक्षा केंद्रस्तरावर दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र परीक्षेच्या दरम्यान या समित्या कोणतीही भूमिका पार पाडीत नसल्याने या समित्या केवळ कागदावरच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करून उत्तरे लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉपीवर आळा घालण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात भरारी पथके स्थापन केली जातात. मात्र जिल्ह्याचा व्याप लक्षात घेता, या पथकांना प्रत्येक परीक्षा केंद्राला भेट देणे शक्य होत नाही. कॉपीला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये याबाबत समुपदेशन केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी प्रत्येक परीक्षा केंद्र, शाळा, महाविद्यालयस्तरावर दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हाभरात शेकडो दक्षता समित्या स्थापन झाल्या. या दक्षता समित्यांमध्ये गावातील पोलीस पाटील, नगरसेवक, प्रतिष्ठीत महिला, सेवाभावी संस्थांमधील सदस्य यांचा समावेश होता. शाळा सुरू असताना तसेच परीक्षेच्या पूर्वी या दक्षता समित्यांनी कॉपीमुक्त अभियानासाठी विद्यार्थ्यांना प्रबोधन करायचे होते. मात्र सद्यस्थितीत एकाही केंद्रावरची ही समिती सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कॉपी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष घालून दक्षता समित्यांना सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)शिक्षण खाते झोपेतकॉपीमुक्त अभियान राबविण्यात दक्षता समित्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे दोन वर्षांपूर्वी दक्षता समित्यांनी दाखवून दिले आहे. मात्र त्यानंतर शिक्षण विभागानेही या समित्यांकडे दुर्लक्ष केले आहे. समितीच्या सदस्यांना परीक्षेपूर्वी शिक्षण विभागाने याबाबत पूर्व कल्पना देणे गरजेचे होते. त्याचबरोबर या सदस्यांना प्रशिक्षण देता आले असते तर अतिशय सोयीचे झाले असते. मात्र शिक्षण विभागाने या समित्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कॉपीमुक्त वातावरणाची निर्मिती करण्यास दक्षता समित्यांनीही हात वर केले आहेत.