शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

केवळ ५७ शेतकऱ्यांची सहमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:46 IST

वडसा-गडचिरोली या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम लवकर सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली वाढल्या असताना शेतकरी मात्र मिळणाऱ्या मोबदल्यासाठी समाधानी नाहीत. त्यामुळे गडचिरोली उपविभागातल्या ७ गावांमधील प्रकल्पबाधित १७५ पैकी फक्त ५७ शेतकऱ्यांनीच या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देण्यास सहमती दर्शविली आहे.

ठळक मुद्देवडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग : दर निश्चितीत भेदभाव होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा-गडचिरोली या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम लवकर सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली वाढल्या असताना शेतकरी मात्र मिळणाऱ्या मोबदल्यासाठी समाधानी नाहीत. त्यामुळे गडचिरोली उपविभागातल्या ७ गावांमधील प्रकल्पबाधित १७५ पैकी फक्त ५७ शेतकऱ्यांनीच या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे प्रशासनापुढे अडचणी वाढल्या आहेत.या रेल्वेमार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्या दर द्यावा याबाबतच्या वाटाघाटी करण्यासाठी गुरूवारी गडचिरोली एसडीओ कार्यालयात तिसऱ्यांदा बैठक ठेवली होती. मात्र शासनाकडून अपेक्षित मोबदला मिळत नसल्याबद्दल गडचिरोली, गोगाव आणि लांजेडा येथील भूधारकांनी सहमती पत्र दिले नाही.गडचिरोली उपविभागांतर्गत येणाऱ्या ७ गावांमधील ५८.५०६ हेक्टर जमीन या प्रकल्पात रेल्वे मार्ग व रेल्वे स्थानकासाठी जाणार आहे. त्यात काटली येथील ८.४६ हेक्टर, साखरा ६.३६ हे., महादवाडी ६.३६ हे., अडपल्ली ३.९९ हे., गोगाव ६.६७ हे., गडचिरोली १.९८ हे. आणि लांझेडा येथील २४.६ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. गडचिरोली आणि आसपासच्या गावातील लोकांना बाजार भावानुसार शासन जमिनीचे दर देत नसल्यामुळे ते जमीन देण्यास विरोध दर्शवीत आहेत अशी माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी दिली. यापूर्वीच्या दोन बैठकांमध्ये वाटाघाटी फिस्कटल्या. गुरूवारी तिसऱ्या बैठकीतही ज्यांनी सहमती पत्र दिले नाही त्यांना तुम्ही दुसरीकडे दाद मागण्यासाठी मोकळे आहात असे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कनिष्ठ अधिकाºयाने सांगितले.६ जूनला जमिनीची नोंदणीगडचिरोली एसडीओ कार्यालयात गुरूवारी झालेल्या बैठकीत गडचिरोली, लांझेडा, काटली, साखरा, महादवाड़ी, गोगाव आणि अडपल्ली येथील भूधारकांना बोलविण्यात आले होते. त्यात काटलीतील ८, साखरा येथील २३, महादवाडीतील १८ आणि अडपल्लीतील ८ भूधारकांनी आपले ने सहमतीपत्र एसडीओ कार्यालयाकडे सोपविले. त्यांच्या जमिनीची नोंदणी येत्या ६ जूनला होऊन शेतकऱ्यांना चेकने त्यांचा मोबदला दिला जाणार आहे. या बैठकीला नायब तहसीलदार एम.एन. शेंडे, अव्वल कारकून वी.सी. येरमे यांच्यासह भूमि अभिलेख अधिकारी उपस्थित होते. एसडीओ सचिन ओम्बासे इतर बैठक असल्यामुळे काही वेळातच निघून गेले.रेल्वेऐवजी आधी धरण करायावेळी पत्रकारांशी बोलताना गोगावच्या नागरिकांनी आम्हाला विस्थापित करणारी हे रेल्वे आमच्या काही कामाची नाही. त्याऐवजी अनेक वर्षांपासून रखडलेले तुलतुली धरणाचे काम आधी पूर्ण करावे, अशी मागणी केली. हे धरण पूर्ण झाल्यास किमान शेतीला पाणी मिळू शकेल, असे शेतकरी म्हणाले.शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यातलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा-गडचिरोली या ५२ किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गात जमिनी जाणाऱ्या गोगाव येथील शेतकऱ्यांनी वाटाघाटीसाठी आयोजित तिसºया बैठकीत संमतीपत्र देण्यास नकार दिला. लगतच्या अडपल्ली या गावासाठी लागू केलेले ७४ लाख रुपये प्रतिहेक्टरचे दर आम्हालाही द्या, अन्यथा जमीन अधिग्रहण करू देणार नाही, असा इशारा तेथील शेतकऱ्यांनी दिला आहे.यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत माहिती देताना गोगाव येथील १७ शेतकऱ्यांनी सांगितले की, अडपल्ली या गावाला ७४ लाखांचा दर, महादवाडीला ६० लाख असे दर निश्चित केले असताना गोगावला मात्र कोरडवाहू शेतीसाठी १९ लाख तर ओलिताच्या शेतीसाठी २९ लाख प्रतिहेक्टर असा दर प्रशासनाने निश्चित केला. मात्र हा दर आम्हाला मान्य नाही. आधीच या प्रकल्पामुळे काही शेतकरी भूमीहिन होणार आहेत. दुसरीकडे शेती घेण्याचा विचार केला तरी या दरात शेती मिळत नाही. मग आम्ही जगावे कसे? असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला.गोगाव आणि अडपल्ली या दोन्ही गावांची शेती लागूनच आहे. असते असताना दोन्ही गावातील लोकांच्या जमिनीच्या दरात एवढी तफावत कशी? आमच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देऊन न्याय द्यावा आणि आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी विनंती गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पत्रपरिषदेला नंदलालजी लाडे, दिवाकर म्हशाखेत्री, नक्टूजी शेंडे, यशवंत म्हशाखेत्री, नयन फुलझेले, उपेंद्र फुलझेले, सुधीर फुलझेले, तेजराम भोयर, आनंद चापले, दिनकर चौधरी, खुशाल खेवले, हिरामण भरडकर, ज्योती जुमनाके, संगीता मंगर, अभयपुरी मुलताने, श्यामसुंदर म्हशाखेत्री शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वे