शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ११५ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक विलगीकरणात १४ दिवस राहणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रवेश करताच संबंधित व्यक्तीच्या हातावर संस्थात्मक विलगीकरणाचा शिक्का मारून त्याला संबंधित तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणाच्या इमारतीमध्ये पाठविले जाते.

ठळक मुद्देबाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण घटले : कोरोनाविषयीची अनावश्यक भीती झाली दूर, मास्क घालून नागरिक बिनधास्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाºया नागरिकांची संख्या घटल्याने संस्थात्मक विलगीकरणात राहणाऱ्यांची संख्या सुध्दा कमी झाली आहे. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्हाभरात रविवारी केवळ ११५ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात होते.कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक विलगीकरणात १४ दिवस राहणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रवेश करताच संबंधित व्यक्तीच्या हातावर संस्थात्मक विलगीकरणाचा शिक्का मारून त्याला संबंधित तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणाच्या इमारतीमध्ये पाठविले जाते.कामाच्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना स्वगावी जाण्याची परवानगी राज्य शासनाने दिल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात येणाºयांचा ओघ वाढला होता. जिल्हाभरातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रांमध्ये जवळपास दीड हजार नागरिक होते. यातील बहुतांश नागरिकांचे कोरोनाचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच काही नागरिकांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची सुटी करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात राहणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार केवळ ११५ नागरिक संस्थात्मक विलगीकरण केंद्रांमध्ये आहेत. त्यापैकी २० जणांचे नमुने रविवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले.सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात पाच प्रतिबंधात्मक क्षेत्र आहेत. त्या ठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळल्याने संबंधित क्षेत्राला प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले आहे. यातील काही प्रतिबंधात्मक क्षेत्रांना १० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे काही दिवसातच प्रतिबंधात्मक क्षेत्रही हटविले जाण्याची शक्यता आहे.३ हजार ८३३ नमुने तपासलेकोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या तसेच कोरोना प्रभावित जिल्ह्यांमधून आलेल्या सुमारे ३ हजार ८३३ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ३०८ नागरिकांचे दुबार नमुने घेण्यात आले. ८६ नमुने ट्रू नॅटवरील आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ ९ अ‍ॅक्टिव्ह रूग्ण शिल्लक आहेत. एकूण ४८ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ३८ जण बरे होऊन परतले आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी बरेचशे रूग्ण बरे होऊन परतत असल्याने कोरोना विषयी असलेली नागरिकांच्या मनातील भिती कमी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या