शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

केवळ ११५ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक विलगीकरणात १४ दिवस राहणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रवेश करताच संबंधित व्यक्तीच्या हातावर संस्थात्मक विलगीकरणाचा शिक्का मारून त्याला संबंधित तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणाच्या इमारतीमध्ये पाठविले जाते.

ठळक मुद्देबाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण घटले : कोरोनाविषयीची अनावश्यक भीती झाली दूर, मास्क घालून नागरिक बिनधास्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाºया नागरिकांची संख्या घटल्याने संस्थात्मक विलगीकरणात राहणाऱ्यांची संख्या सुध्दा कमी झाली आहे. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्हाभरात रविवारी केवळ ११५ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात होते.कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक विलगीकरणात १४ दिवस राहणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रवेश करताच संबंधित व्यक्तीच्या हातावर संस्थात्मक विलगीकरणाचा शिक्का मारून त्याला संबंधित तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणाच्या इमारतीमध्ये पाठविले जाते.कामाच्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना स्वगावी जाण्याची परवानगी राज्य शासनाने दिल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात येणाºयांचा ओघ वाढला होता. जिल्हाभरातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रांमध्ये जवळपास दीड हजार नागरिक होते. यातील बहुतांश नागरिकांचे कोरोनाचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच काही नागरिकांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची सुटी करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात राहणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार केवळ ११५ नागरिक संस्थात्मक विलगीकरण केंद्रांमध्ये आहेत. त्यापैकी २० जणांचे नमुने रविवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले.सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात पाच प्रतिबंधात्मक क्षेत्र आहेत. त्या ठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळल्याने संबंधित क्षेत्राला प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले आहे. यातील काही प्रतिबंधात्मक क्षेत्रांना १० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे काही दिवसातच प्रतिबंधात्मक क्षेत्रही हटविले जाण्याची शक्यता आहे.३ हजार ८३३ नमुने तपासलेकोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या तसेच कोरोना प्रभावित जिल्ह्यांमधून आलेल्या सुमारे ३ हजार ८३३ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ३०८ नागरिकांचे दुबार नमुने घेण्यात आले. ८६ नमुने ट्रू नॅटवरील आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ ९ अ‍ॅक्टिव्ह रूग्ण शिल्लक आहेत. एकूण ४८ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ३८ जण बरे होऊन परतले आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी बरेचशे रूग्ण बरे होऊन परतत असल्याने कोरोना विषयी असलेली नागरिकांच्या मनातील भिती कमी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या