शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

ग्रामपंचायतींच्या आॅनलाईन नामांकनाला इंटरनेटचा ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:11 IST

जिल्ह्यात येत्या २५ फेब्रुवारीला १६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी नामांकन दाखल करणे सुरू आहे.

ठळक मुद्देउमेदवारांची धावपळ : चार दिवसांत केवळ ११ नामांकन दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात येत्या २५ फेब्रुवारीला १६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी नामांकन दाखल करणे सुरू आहे. मात्र आॅनलाईन नामांकन भरण्यासाठी ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधाच नसल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी गेल्या चार दिवसांत केवळ ११ नामांकन दाखल होऊ शकले. हीच परिस्थिती कायम राहिल्यास अनेकांना निवडणूक लढण्यापासून वंचित राहावे लागू शकते.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यात १६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यासाठी सरपंच व सदस्यपदासाठी इच्छुक उमेदवारांना आपले नामांकन निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर आॅनलाईन दाखल करायचे आहेत. त्यात आवश्यक असलेली माहिती भरताना इंटरनेटचा वेग अतिशय मंद राहात आहे. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी तर इंटरनेट सुविधाच नाही. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन नामांकन दाखल करावे लागत आहे. त्यातही एखादे कागदपत्र राहिल्यास गावाला येऊन पुन्हा नामांकन भरण्यासाठी जाण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. काही तालुका ठिकाणी तर इंटरनेटचा वेग अतिशय कमी राहात असल्यामुळे उमेदवारांचे नामांकन भरण्यासाठी बराच वेळ लागत आहे. यातून उमेदवारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक व पोटनिवडणूक होत आहे त्यामध्ये भामरागड, कोरची, धानोरा या तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या जास्त आहे. या तालुक्यांमध्ये इंटरनेटची समस्या अधिक तीव्र आहे. बीएसएनएल या सरकारी कंपनीने ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट सुविधा देण्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे अशी अपेक्षा सर्वांकडून केली जात आहे.नामांकनासाठी उरले दोनच दिवसदि.५ पासून सुरू झालेली नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया दि.१० ला संपणार आहे. सर्व ग्रामपंचायती मिळून २२५ पेक्षा जास्त जागांसाठी निवडणूक होत असताना गेल्या चार दिवसात अवघे ११ नामांकन दाखल झाले आहे. आता नामांकन दाखल करण्यासाठी दि.९ व १० असे केवळ दोन दिवस शिल्लक आहे. त्यावरून परिस्थिती किती बिकट आहे याची कल्पना येते.पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्याकोरची तालुका- ३, कुरखेडा- १०, देसाईगंज- ३, आरमोरी- ७, धानोरा- ४२, गडचिरोली- १५, चामोर्शी- २५, मुलचेरा- १०, एटापल्ली- २२, भामरागड- १५, अहेरी- २३, सिरोंचा- २४, एकूण- २०७जातवैधतेची अट शिथिलराखीव जागेवर सरपंच किंवा सदस्यपदासाठी नामांकन दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. केवळ वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी समितीकडे अर्ज केल्याची पावती आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र जोडल्यास उमेदवाराला त्या राखीव जागेवर निवडणूक लढविता येणार आहे.या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूकमुदत संपत असल्यामुळे सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोरची तालुक्यातील नवेझरी, बोदालदंड, दवडी, मुरकुटी व कोटरा, धानोरा तालुक्यातील मिचगाव झाडा, पुसटोला, दुर्गापूर, झाडापापडा, गडचिरोली तालुक्यातील देवापूर, एटापल्ली तालुक्यातील हालेवारा, भामरागड तालुक्यातील मडवेली, धिरंगी, फोदेवाडा, अहेरी तालुक्यातील राजाराम, सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Internetइंटरनेट