शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बँकेसाठी अद्यापही करावा लागतो ५० किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 14:52 IST

नागरिकांचे हाल : १२ लाख लोकसंख्येसाठी १३० शाखा

दिगांबर जवादेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रत्येक गावापर्यंत बँकसेवा पोहोचली पाहिजे, हे धोरण आहे. मात्र जिल्ह्यातील नागरिकांना बँक सेवांसाठी ५० किमीचे अंतर गाठावे लागत असल्याचे वास्तव आहे. शहरांमध्ये बँकांची गर्दी होत असताना ग्रामीण व दुर्गम भागात मात्र बँकसेवा पोहोचली नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांचे बँक खाते कसे निघणार, असा प्रश्न आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्यावर आहे. बँकांची संख्या मात्र केवळ १३० एवढी आहे. त्यातही काही तालुक्यांमध्ये योजनांची संख्या नगण्य आहे. शासकीय योजनांचे पैसे आता बँक खात्यातच जमा करण्याचे धोरण शासनाने सुरू केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचे उत्पन्न कमी असल्याने येथील नागरिक शासकीय योजनांसाठी पात्र ठरतात. मात्र त्यांच्यापर्यंत बँक सेवाच पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. बँकेचा खाता असला तरी ५० किमी अंतर सायकलने जाऊन त्यातील पैसे काढणे अनेकांना व्यावहारिक वाटत नाही. तालुकास्थळी असलेल्या बँकेचे व्यवहार करण्यासाठी एक दिवसाच्या मुक्कामाने जावे लागते.

प्रत्येक शासकीय योजनेच्या लाभासाठी बँक खाते आवश्यक आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांकडे बँक खाते नसल्याने ते योजनेसाठी पात्र ठरत नाही. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांमध्ये तर बोटावर मोजण्याएवढ्या बँकेच्या शाखा आहेत.

बीसी चांगला उपाय मात्र संख्या वाढवावीबँकेची शाखा स्थापन करून ती चालविण्यासाठी महिन्याला लाखो रूपये खर्च होतात. त्यामुळे आर्थिक उलाढाल कमी असलेल्या ठिकाणी बँक शाखा स्थापन करणे व्यावहारिक नाही. त्यासाठी व्यावसायिक प्रतिनिधी (बीसी) हा एक चांगला पर्याय आहे. बँक एखाद्या व्यक्तीला व्यावसायिक प्रतिनिधी नेमते. तो व्यक्ती बँकेचे व्यवहार दुचाकीने गावात जाऊन पूर्ण करते. आर्थिक उलाढालीनुसार त्याला बँक कमिशन देते. बीसी हा बँकेचा व्यवहार करीत असल्याने त्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. यातून नागरिकांना गावातच बँकसेवा मिळेल. तसेच युवकांना रोजगार मिळेल.

गाव तेथे रस्त्याची प्रतीक्षा

  • एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांमध्ये अजूनही अनेक गावांचा पावसाळ्यात चार महिने संपर्क तुटलेला असतो. देश चंद्रावर यान पाठवत असताना गावात मात्र जायला रस्ता नाही.
  • जवळच्या नाल्यावर पूल नाही. परिणामी गर्भवती महिलेला किवा आजारी व्यक्तीला खाटेने रुग्णालयात दाखल करावे लागते.

 

बीसींची संख्या वाढविण्याचे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत. बीसीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार प्राप्त होईल. बहुतांश बँका बीसीची नियुक्ती करतात. बीसीच्या रोजगारासाठी युवकांनी बँकांशी संपर्क साधावा, बीसीमुळे गावातच बँकसेवा मिळण्यास मदत होईल.- प्रशांत धोंगळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली