शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मशरूम गोळा करण्यासाठी जंगलात जाणे 'त्याच्या' जीवावर बेतले; वाघाने झडप घालून फरफटत नेले

By गेापाल लाजुरकर | Updated: September 8, 2022 17:18 IST

देसाईगंज तालुक्यात एकाचा वाघाने घेतला बळी, दुसऱ्याने पळ काढत वाचवला जीव

कुरूड : (गडचिराेली) : गावातील एका मित्रासह जंगलात मशरूम गाेळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ८ सप्टेंबर राेजी देसाईगंज तालुक्यातील उसेगाव येथे घडली. प्रेमलाल प्रधान (४४) रा. उसेगाव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

देसाईगंजपासून १० किमी अंतरावर असलेल्या उसेगाव येथील प्रेमलाल प्रधान व वासुदेव झोडे (३२) हे दाेघेही गुरुवारी सकाळी ७ वाजता गावाला लागूनच असलेल्या जंगलात अळंबी (मशरूम) गाेळा करण्यासाठी गेले. दाेघेही जवळपास राहूनच अळंबी शाेधत हाेते. दरम्यान ७:३० वाजता दबा धरून बसलेल्या वाघाने प्रेमलाल प्रधान यांच्यावर झेप घेऊन त्यांना फरफटत नेले.

वाघाने हल्ला केला हे पाहताच साेबती वासुदेव झाेडे हे भयभीत झाले व त्यांनी घटनास्थरावरून पळ काढला. गावात पाेहाेचून नागरिकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी वनविभागाला कळविले. वन भागाचे वनपरिक्षेत्राधिकारी चव्हाण, विजय धांडे, के. वाय. कऱ्हाडे, वनरक्षक सलीम सयद हे काही वेळेतच घटनास्थळी दाखल झाले; परंतु तेथे काहीच आढळले नाही.

परिसरात शाेधमाेहीम सुरू केली असता, घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर प्रेमलालचा मृतदेह आढळला. वाघाने छाती व मानेचा भाग खाल्ला हाेता. वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन ताे उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी पाठविला. उसेगावला लागूनच जंगल असल्याने अगदी २ किमी अंतरावर ही घटना घडली. दरम्यान प्रधान कुटुंबाला वन विभागाने २५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत दिली.

चार दिवसांपूर्वीच दिली हाेती दवंडी

काेंढाळा परिसरात वाघाचा वावर आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात ताे अधूनमधून कैद हाेत आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगलात जाऊ नये, अशी दवंडी वनविभागाने परिसरातील गावांमध्ये ४ सप्टेंबर राेजी दिली हाेती. असे असतानाही उसेगाव येथील दाेन इसम जंगलात गेले. यापूर्वी याच जंगलात वाघाने दाेन नागरिकांना ठार केले हाेते. त्यानंतर आता पुन्हा एकाला ठार केले. त्यामुळे जंगलालगत शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांसमाेर आपण शेती कशी कसावी असा प्रश्न आहे.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली