शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

दहावी-बारावीच्या दीड हजारांवर विद्यार्थ्यांची काेराेनामुळे परीक्षेकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST

गडचिराेली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा एप्रिल ते मे महिन्यांदरम्यान ...

गडचिराेली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा एप्रिल ते मे महिन्यांदरम्यान घेण्यात येणार आहे. मात्र, काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे यावर्षी परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. दीड हजारांवर विद्यार्थ्यांनी यावर्षी बाेर्डाच्या परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

शैक्षणिक जीवनाचा व करिअरचा टर्निंग पाॅइंट समजल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या परीक्षा यशस्वी केल्यानंतर पुढील शैक्षणिक वाटचाल व करिअरचा मार्ग सापडत असताे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही या परीक्षांना प्रचंड महत्त्व देतात. इतकेच नव्हे, तर यश व करिअरसाठी झपाटून जाऊन या परीक्षेत भरघाेस यश मिळविण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम करतात.

पहिले शैक्षणिक सत्र संपल्यावर दिवाळीनंतर बाेर्डाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरून नाेंदणी करावी लागते. मात्र, यावर्षी काेराेनामुळे सात ते आठ महिने शाळा बंद राहिली. काेराेना संसर्गाचा प्रसार हाेऊ नये, याकरिता खबरदारी म्हणून शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाइन शिक्षण पद्धती राबविण्यात आली. स्मार्ट फाेन व व्हाॅटस्ॲपच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. मात्र, ही शिक्षण पद्धती फारसी प्रभावी ठरली नाही. दरम्यान, शासनाच्या वतीने निर्णय झाल्यावर दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यापासून इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविण्यास सुरुवात झाली.

काेराेनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी बाेर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरले नाहीत. विद्यार्थ्यांसह पालकांचे दुर्लक्ष झाले. परिणामी, यावर्षी बाेर्डाची परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

बाॅक्स...

दहावीचे परीक्षार्थी

१५,१०३

२०२०

..............

१३,५८२

२०२१

बारावीचे परीक्षार्थी

१२,२०१

२०२०

...............

१०,६०२

२०२१

बाॅक्स....

पुनर्परीक्षार्थ्यांची संख्या ३७० वर

- इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षेत मागील शैक्षणिक सत्रात नापास झालेल्या मात्र यावर्षी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ३७० पेक्षा अधिक आहे. दरवर्षी पुनर्रपरीक्षार्थ्यांची संख्या यापेेक्षाही अधिक असते. मात्र, काेराेना संसर्गामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी बाेर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरले नाही. पुनर्परीक्षार्थ्यांचा ऑनलाइन शिक्षण पद्धतीत सहभाग नव्हता. घरीच अभ्यास करून तयारी करावी लागत हाेती. त्यामुळे यावर्षी पुनर्परीक्षार्थ्यांची संख्या घटली आहे.

- सन २०२० मध्ये गतवर्षी एकूण १५ हजार १०३ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची बाेर्डाची परीक्षा दिली. यावर्षी ही संख्या कमी झाली असून, १३ हजार ५८२ परीक्षार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. गतवर्षी २०२० मध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षेला १२ हजार २०१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. यावर्षी काेराेनामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या घटली असून, ती १० हजार ६०२ इतकी आहे.