शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

दीडशे किमीचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST

असाच काहीसा प्रसंग भेंडाळा परिसरात बघावयास मिळाला. भेंडाळा परिसरातील बरेच मजूर मिरची तोडणीच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा भागात गेले आहेत. कोरोनाच्या संचारबंदीमुळे मजूर कामाच्या ठिकाणीच अडकून पडले आहेत. काम संपले, उदरनिर्वाहासाठी पैसा नाही. अशा स्थितीत परगावी राहून काय करायचे, असा विचार मनात येऊ लागल्याने काही कुटुंबांनी स्वत:च्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजुरा परिसरातून १५० किमीचा पायी प्रवास करून काही मजूर भेंडाळा परिसरात स्व:गावी पोहोचले.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा परिसरातून गाठले भेंडाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : कोरोनाच्या संचारबंदीने गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजूर परजिल्ह्यात व परराज्यात अडकले आहेत. काम संपले, हातातील पैसा संपला, अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न अनेक मजूर कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे. अशातच काही कुटुंब पायी प्रवास करून परजिल्ह्यातील आपले स्वत:चे गाव गाठत असल्याचे दिसून येत आहे.असाच काहीसा प्रसंग भेंडाळा परिसरात बघावयास मिळाला. भेंडाळा परिसरातील बरेच मजूर मिरची तोडणीच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा भागात गेले आहेत. कोरोनाच्या संचारबंदीमुळे मजूर कामाच्या ठिकाणीच अडकून पडले आहेत. काम संपले, उदरनिर्वाहासाठी पैसा नाही. अशा स्थितीत परगावी राहून काय करायचे, असा विचार मनात येऊ लागल्याने काही कुटुंबांनी स्वत:च्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजुरा परिसरातून १५० किमीचा पायी प्रवास करून काही मजूर भेंडाळा परिसरात स्व:गावी पोहोचले. दोन दिवसांपूर्वी निघालेले हे मजूर पायी प्रवास करून सोमवारी सकाळी भेंडाळा गावात पोहोचले. मिरची तोडण्याचे काम पूर्ण झाले. तसेच तेथे निवास व अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला. गावाकडे परतण्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे कोरोनाच्या संचारबंदीत पायीच प्रवास करून स्वत:चे गाव गाठायचे, असा निर्णय घेतला. डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन मुख्य मार्गाने मजूर चामोर्शी तालुक्यात पोहोचले. दरम्यान पायी प्रवास केलेले हे मजूर प्रचंड थकल्याचे दिसले. मात्र स्वत:च्या गावी पोहोचल्याचे वेगळेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. अशा प्रकारे पायी प्रवास करून गावाकडे परतणाऱ्या मजुरांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. कोरोनाच्या संकटामुळे रोजगारासाठी गेलेल्या मजुरांची फजिती होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या