शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दीडशे किमीचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST

असाच काहीसा प्रसंग भेंडाळा परिसरात बघावयास मिळाला. भेंडाळा परिसरातील बरेच मजूर मिरची तोडणीच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा भागात गेले आहेत. कोरोनाच्या संचारबंदीमुळे मजूर कामाच्या ठिकाणीच अडकून पडले आहेत. काम संपले, उदरनिर्वाहासाठी पैसा नाही. अशा स्थितीत परगावी राहून काय करायचे, असा विचार मनात येऊ लागल्याने काही कुटुंबांनी स्वत:च्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजुरा परिसरातून १५० किमीचा पायी प्रवास करून काही मजूर भेंडाळा परिसरात स्व:गावी पोहोचले.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा परिसरातून गाठले भेंडाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : कोरोनाच्या संचारबंदीने गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजूर परजिल्ह्यात व परराज्यात अडकले आहेत. काम संपले, हातातील पैसा संपला, अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न अनेक मजूर कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे. अशातच काही कुटुंब पायी प्रवास करून परजिल्ह्यातील आपले स्वत:चे गाव गाठत असल्याचे दिसून येत आहे.असाच काहीसा प्रसंग भेंडाळा परिसरात बघावयास मिळाला. भेंडाळा परिसरातील बरेच मजूर मिरची तोडणीच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा भागात गेले आहेत. कोरोनाच्या संचारबंदीमुळे मजूर कामाच्या ठिकाणीच अडकून पडले आहेत. काम संपले, उदरनिर्वाहासाठी पैसा नाही. अशा स्थितीत परगावी राहून काय करायचे, असा विचार मनात येऊ लागल्याने काही कुटुंबांनी स्वत:च्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजुरा परिसरातून १५० किमीचा पायी प्रवास करून काही मजूर भेंडाळा परिसरात स्व:गावी पोहोचले. दोन दिवसांपूर्वी निघालेले हे मजूर पायी प्रवास करून सोमवारी सकाळी भेंडाळा गावात पोहोचले. मिरची तोडण्याचे काम पूर्ण झाले. तसेच तेथे निवास व अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला. गावाकडे परतण्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे कोरोनाच्या संचारबंदीत पायीच प्रवास करून स्वत:चे गाव गाठायचे, असा निर्णय घेतला. डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन मुख्य मार्गाने मजूर चामोर्शी तालुक्यात पोहोचले. दरम्यान पायी प्रवास केलेले हे मजूर प्रचंड थकल्याचे दिसले. मात्र स्वत:च्या गावी पोहोचल्याचे वेगळेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. अशा प्रकारे पायी प्रवास करून गावाकडे परतणाऱ्या मजुरांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. कोरोनाच्या संकटामुळे रोजगारासाठी गेलेल्या मजुरांची फजिती होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या