शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

सलग दुसऱ्या दिवशी वाघाने साधला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 23:07 IST

रामाळा- वैरागड मार्गावरील कक्ष क्रमांक ४१ मधील जंगलात सिंध कापण्यासाठी गेले होते. तिघेही जवळजवळ सिंध कापण्यात व्यस्त  होते. मात्र, लवकरच त्यांच्या दोन सोबत्यांची सिंध कापून झाली; परंतु, आनंदराव दुधबळे हे वयाेवृद्ध असल्याने त्यांची पुरेशी सिंध कापून झाली नाही. ते एकटे असल्याचे पाहून झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. दुपारी एक वाजता मृतदेह सापडला, तेव्हा वाघाने आनंदरावचा उजवा हात फस्त केला हाेता.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : धानाचे भारे बांधण्यासाठी लागणारी सिंध आणण्यासाठी दोन सहकाऱ्यांसाेबत जंगलात गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने ठार केले. ही घटना आरमाेरी तालुका मुख्यालयापासून अगदी १० किमी अंतरावरील रामाळा जंगलातील कक्ष क्रमांक ४१ मध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. शुक्रवारी एका गुराख्याचा बळी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा वाघाने हल्ला केल्यामुळे नागरिकांसह वनविभागाचे अधिकारीही चक्रावून गेल्या आहेत. चालू वर्षातील ही १७ वी घटना आहे.आनंदराव पांडुरंग दुधबळे (६५, रा. रामाळा) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आनंदराव पांडुरंग दुधबळे हे आपल्या दोन सहकाऱ्यांसाेबत शनिवारी सकाळी सायकलने रामाळा- वैरागड मार्गावरील कक्ष क्रमांक ४१ मधील जंगलात सिंध कापण्यासाठी गेले होते. तिघेही जवळजवळ सिंध कापण्यात व्यस्त  होते. मात्र, लवकरच त्यांच्या दोन सोबत्यांची सिंध कापून झाली; परंतु, आनंदराव दुधबळे हे वयाेवृद्ध असल्याने त्यांची पुरेशी सिंध कापून झाली नाही. ते एकटे असल्याचे पाहून झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. दुपारी एक वाजता मृतदेह सापडला, तेव्हा वाघाने आनंदरावचा उजवा हात फस्त केला हाेता. वडसाचे सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्रसहायक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक भारत शेंडे, कमलेश गिन्नलवार, विकास शिवणकर आदींनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच बेड व ट्रॅप कॅमेरे लावले. 

...अन् सहकारी हाक मारतच राहिले आनंदराव दुधबळे यांच्यासाेबत जंगलात सिंध कापण्यासाठी गेलेल्या दाेन सहकाऱ्यांची सिंध कापून झाली. तेव्हा त्यांनी आनंदरावला मोठमोठ्याने हाक मारली; परंतु, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तरीही त्यांनी काही वेळ आवाज दिला व शाेधसुद्धा घेतला. त्यानंतर मात्र त्यांना वाघहल्ल्याचा संशय आल्याने दोघेही गावात परतले. सर्व हकीकत सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबविली असता दुपारी आनंदरावचा मृतदेह सापडला. सिंध कापण्याच्या स्थळापासून जवळपास दाेन किमी अंतरापर्यंत वाघाने आनंदरावला फरफटत नेले हाेते.

वाघांना पकडण्यासाठी ताडाेबा व अमरावतीतील टीम दाखल

आरमाेरी : सलग दाेन दिवस आरमाेरी तालुक्यात दाेघांचा बळी घेणाऱ्या वाघांना पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडाेबा व अमरावती येथील रेक्स्यू टीम वडसा वनविभागात दाखल झाली. सदर टीम वाघांना पकडण्यासाठी कसाेसीचे प्रयत्न करणार आहे.वडसा वनविभागातील आरमोरी, पाेर्ला वन परिक्षेत्रातील जंगल परिसरात अनेक लोकांचा बळी सीटी-१ वाघाने घेतला. या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील रेस्क्यू टीम आली आहे. तर कुरंजा येथील ठेमाजी माधव आत्राम ह्या गुराख्याचा बळी टी- ६ या वाघाने घेतला असल्याची खात्री पटल्यानंतर शुक्रवारी उशिरा वनविभागाने टी-६ वाघाला जेरबंद करण्याचे आदेश काढले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी अमरावतीवरून रेस्क्यू टीम बोलविण्यात आली. ही टीम शनिवारी पाेर्ला वनपरिक्षेत्रात दाखल झाली. दोन्ही टीम वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. डॉ. किशोर मानकर यांनी पाेर्ला वनपरिक्षेत्रात टी- ६ वाघाला जेरबंद करण्यासाठी उपयोजना करण्याच्या सूचना दिल्या.

वनसंरक्षक डॉ. मानकर यांनी केली पाहणीगडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर व वडसाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी रामाळा जंगल परिसरात तीन किलोमीटर आत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे वाघाची ओळख पटवावी, गस्त वाढवा, गावागावात दवंडी देऊन लोकांना जागृत करावे, मुख्यालयी राहून काम करा, अशा  सूचना  वन कर्मचाऱ्यांना देत एकूणच परिस्थितीची माहिती जाणून घेतली. 

दुधबळे कुटुंबाला ३० हजारांची मदतवाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या आनंदराव दुधबळे यांच्या कुटुंबाला वनविभागातर्फे तातडीची ३० हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली. तसेच जंगलात वाघाचा वावर असल्याने कुणीही आत जाऊ नये, शेतावर जाताना योग्य खबरदारी घेऊन शेतीची कामे करावीत, असे आवाहन वनविभागाने केले.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग