शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सलग दुसऱ्या दिवशी वाघाने साधला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 23:07 IST

रामाळा- वैरागड मार्गावरील कक्ष क्रमांक ४१ मधील जंगलात सिंध कापण्यासाठी गेले होते. तिघेही जवळजवळ सिंध कापण्यात व्यस्त  होते. मात्र, लवकरच त्यांच्या दोन सोबत्यांची सिंध कापून झाली; परंतु, आनंदराव दुधबळे हे वयाेवृद्ध असल्याने त्यांची पुरेशी सिंध कापून झाली नाही. ते एकटे असल्याचे पाहून झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. दुपारी एक वाजता मृतदेह सापडला, तेव्हा वाघाने आनंदरावचा उजवा हात फस्त केला हाेता.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : धानाचे भारे बांधण्यासाठी लागणारी सिंध आणण्यासाठी दोन सहकाऱ्यांसाेबत जंगलात गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने ठार केले. ही घटना आरमाेरी तालुका मुख्यालयापासून अगदी १० किमी अंतरावरील रामाळा जंगलातील कक्ष क्रमांक ४१ मध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. शुक्रवारी एका गुराख्याचा बळी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा वाघाने हल्ला केल्यामुळे नागरिकांसह वनविभागाचे अधिकारीही चक्रावून गेल्या आहेत. चालू वर्षातील ही १७ वी घटना आहे.आनंदराव पांडुरंग दुधबळे (६५, रा. रामाळा) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आनंदराव पांडुरंग दुधबळे हे आपल्या दोन सहकाऱ्यांसाेबत शनिवारी सकाळी सायकलने रामाळा- वैरागड मार्गावरील कक्ष क्रमांक ४१ मधील जंगलात सिंध कापण्यासाठी गेले होते. तिघेही जवळजवळ सिंध कापण्यात व्यस्त  होते. मात्र, लवकरच त्यांच्या दोन सोबत्यांची सिंध कापून झाली; परंतु, आनंदराव दुधबळे हे वयाेवृद्ध असल्याने त्यांची पुरेशी सिंध कापून झाली नाही. ते एकटे असल्याचे पाहून झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. दुपारी एक वाजता मृतदेह सापडला, तेव्हा वाघाने आनंदरावचा उजवा हात फस्त केला हाेता. वडसाचे सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्रसहायक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक भारत शेंडे, कमलेश गिन्नलवार, विकास शिवणकर आदींनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच बेड व ट्रॅप कॅमेरे लावले. 

...अन् सहकारी हाक मारतच राहिले आनंदराव दुधबळे यांच्यासाेबत जंगलात सिंध कापण्यासाठी गेलेल्या दाेन सहकाऱ्यांची सिंध कापून झाली. तेव्हा त्यांनी आनंदरावला मोठमोठ्याने हाक मारली; परंतु, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तरीही त्यांनी काही वेळ आवाज दिला व शाेधसुद्धा घेतला. त्यानंतर मात्र त्यांना वाघहल्ल्याचा संशय आल्याने दोघेही गावात परतले. सर्व हकीकत सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबविली असता दुपारी आनंदरावचा मृतदेह सापडला. सिंध कापण्याच्या स्थळापासून जवळपास दाेन किमी अंतरापर्यंत वाघाने आनंदरावला फरफटत नेले हाेते.

वाघांना पकडण्यासाठी ताडाेबा व अमरावतीतील टीम दाखल

आरमाेरी : सलग दाेन दिवस आरमाेरी तालुक्यात दाेघांचा बळी घेणाऱ्या वाघांना पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडाेबा व अमरावती येथील रेक्स्यू टीम वडसा वनविभागात दाखल झाली. सदर टीम वाघांना पकडण्यासाठी कसाेसीचे प्रयत्न करणार आहे.वडसा वनविभागातील आरमोरी, पाेर्ला वन परिक्षेत्रातील जंगल परिसरात अनेक लोकांचा बळी सीटी-१ वाघाने घेतला. या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील रेस्क्यू टीम आली आहे. तर कुरंजा येथील ठेमाजी माधव आत्राम ह्या गुराख्याचा बळी टी- ६ या वाघाने घेतला असल्याची खात्री पटल्यानंतर शुक्रवारी उशिरा वनविभागाने टी-६ वाघाला जेरबंद करण्याचे आदेश काढले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी अमरावतीवरून रेस्क्यू टीम बोलविण्यात आली. ही टीम शनिवारी पाेर्ला वनपरिक्षेत्रात दाखल झाली. दोन्ही टीम वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. डॉ. किशोर मानकर यांनी पाेर्ला वनपरिक्षेत्रात टी- ६ वाघाला जेरबंद करण्यासाठी उपयोजना करण्याच्या सूचना दिल्या.

वनसंरक्षक डॉ. मानकर यांनी केली पाहणीगडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर व वडसाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी रामाळा जंगल परिसरात तीन किलोमीटर आत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे वाघाची ओळख पटवावी, गस्त वाढवा, गावागावात दवंडी देऊन लोकांना जागृत करावे, मुख्यालयी राहून काम करा, अशा  सूचना  वन कर्मचाऱ्यांना देत एकूणच परिस्थितीची माहिती जाणून घेतली. 

दुधबळे कुटुंबाला ३० हजारांची मदतवाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या आनंदराव दुधबळे यांच्या कुटुंबाला वनविभागातर्फे तातडीची ३० हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली. तसेच जंगलात वाघाचा वावर असल्याने कुणीही आत जाऊ नये, शेतावर जाताना योग्य खबरदारी घेऊन शेतीची कामे करावीत, असे आवाहन वनविभागाने केले.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग