शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अधिकाऱ्यांनी निवडणूक कामासाठी केली दिवस-रात्र एक

By admin | Updated: October 18, 2014 23:24 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यात चांगल्या वातावरणात नियोजनबद्ध पद्धतीने

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यात चांगल्या वातावरणात नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुका पार पडू शकल्या. हे आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिंग पार्ट्या पाठविण्याच्या कामासह मतदानाची टक्केवारी टिकवून ठेवणे व पोलिंग पार्ट्या परत आल्यानंतर ईव्हीएम संग्रहीत करून घेणे या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र राबली. जिल्हाधिकारी कार्यालयाचा निवडणूक विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले. लोकसभा निवडणुकीतही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक काम केले. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामासाठी लागून होती. नागरिकांकडून तसेच माध्यमांकडून येणाऱ्या सूचनांवरही त्यांनी तत्काळ दखल घेत आवश्यक ते बदल केलेत. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मतदानाची वेळ २००९ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या कालावधीत चांगले मतदान व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जनजागृतीवर मोठा भर दिला. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदा मतदानासाठी व्यापक जनजागृती मोहीम गावपातळीवर राबविण्यात आली. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातही चांगले मतदान होऊ शकले. देसाईगंज, गडचिरोली, अहेरी या तिनही ठिकाणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनीही निवडणूक कामासाठी गेल्या २०-२२ दिवसांपासून प्रचंड मेहनत घेऊन काम केले. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही फेरमतदान घेण्याची वेळ आली नाही. या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही निवडणूक कामासाठी परिश्रमपूर्वक काम केले. त्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारीही वाढली.पोलीस यंत्रणेने प्रशासकीय यंत्रणेला चांगली साथ देत दुर्गम गावातही मोठे मतदान व्हावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या. त्यामुळे चांगले मतदान अहेरी विधानसभा क्षेत्रात होऊ शकले. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाचे परिश्रम निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)