शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

धानोरातील गैरआदिवासी आक्रमक

By admin | Updated: October 13, 2014 23:20 IST

गडचिरोली जिल्ह्यातील गैरआदिवासी समाजावर सतत अन्याय करण्यात आला. ओबीसींसह एनटी, व्हीजे समाजाचे आरक्षण कमी करण्यात आले. त्यामुळे या समाजाच्या विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

धानोरा : गडचिरोली जिल्ह्यातील गैरआदिवासी समाजावर सतत अन्याय करण्यात आला. ओबीसींसह एनटी, व्हीजे समाजाचे आरक्षण कमी करण्यात आले. त्यामुळे या समाजाच्या विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनी गैरआदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याकडे सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत धानोरा तालुक्यातील गैरआदिवासी समाजाच्यावतीने नोटा या पर्यायाचा वापर केला जाईल, अशी माहिती विविध समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक माळी समाज भवना आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गडचिरोली जिल्ह्यात जमीनदारी काळापासून गैरआदिवासी समाज मूळचा रहिवासी आहे. आदिवासी समाजाकडून गैरआदिवासींनी विकत घेतलेल्या जमिनी परत आदिवासींना मिळाल्या. त्यामुळे जमिनीवर उपजीविका करणाऱ्या गैरआदिवासी समाजावर उपासमारीचे संकट कोसळले. या संकटातून सावरल्यानंतर गैरआदिवासींनी काबाडकष्ट करून जमिनी प्राप्त केल्या. परंतु आता जिल्ह्यातील ओबीसींसह एनटी व व्हीजे यांचे आरक्षण कमी झाल्याने पुन्हा पेसाची अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातील गैरआदिवासींच्या नोकऱ्या सरकार हिरावू पाहात आहे. त्यामुळे शासनाप्रती गैरआदिवासींमध्ये तीव्र असंतोष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान न करता नोटा पर्यायाचा वापर धानोरा तालुक्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत गैरआदिवासी समाजाच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी दिली. पत्रकार परिषदेला ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुकाध्यक्ष राजु मोहुर्ले, माळी समाजाचे अध्यक्ष मुकाजी भेंडारे, शिवराम चिमुरकर, भास्कर सोनुले, मधुकर रामपुरकर, अर्जुन सोमनकर, मारोती मेश्राम, ज्ञानेश्वर भुरसे, सदाशिव सहारे, मनोहर गावतुरे, संदीप तोंडरे, गणू लोणबले, हिवराज सोनुले, नामदेव गुरनुले, अनिल मोहुर्ले, नाना पाल, विनोद लेनगुरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)