शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कर्जमाफीच्या १८३ अर्जांवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:34 IST

चावडी वाचनादरम्यान जिल्हाभरातील १८३ कर्जमाफीच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. यानंतर आता तालुकास्तरावर आक्षेप नोंदविता येणार आहेत.

ठळक मुद्देचावडी वाचन पूर्ण : यादीत नाव नसल्याने अनेकांचा गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चावडी वाचनादरम्यान जिल्हाभरातील १८३ कर्जमाफीच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. यानंतर आता तालुकास्तरावर आक्षेप नोंदविता येणार आहेत.कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरणे आवश्यक करण्यात आले होते. जिल्हाभरातील ६५ हजार ६४९ शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले. शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही, असे शासनाने घोषित केले असतानाही काही शासकीय कर्मचाºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. चावडी वाचनादरम्यान गावातील नागरिकांनी संबंधितांच्या अर्जावर आक्षेप घेतले. २९ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबर या कालावधीत गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. यामध्ये १८३ अर्जांवर नागरिकांनी आक्षेप घेऊन सदर अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.काही शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले, मात्र त्यांची नावे यादीमध्ये नसल्याने काही गावांमध्ये गोंधळ निर्माण झाला. ज्या शेतकºयांनी अर्ज केला आहे, मात्र यादीमध्ये नाव नाही, अशा शेतकºयांना तहसीलदारांकडे केलेल्या अर्जाची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने पुन्हा नवीन सॉप्टवेअर तयार केले असून यामध्ये शेतकºयांची तीन याद्यांमध्ये विभागणी केली जाणार आहे. यातील हिरव्या रंगाची यादी पात्र लाभार्थ्यांची राहणार आहे. पिवळ्या रंगाच्या यादीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरविलेले अर्जदार तर लाल रंगाच्या यादीमध्ये कायमस्वरूपी अर्ज रद्द केलेल्या नागरिकांचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लावण्यात आली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. ५० गावांमध्ये अजूनही चावडीवाचन झाले नाही. काही गावांमध्ये चावडीवाचन झाले आहेतहसीलदारांकडेही नोंदविता येणार आक्षेपकाही गावांमध्ये नागरिकांनी अर्जांबाबत तोंडी आक्षेप नोंदविले आहेत. तोंडी आक्षेप ग्राह्य धरले जाणार नसून त्यासाठी संबंधित व्यक्ती कसा अपात्र आहे, याबाबतचे योग्य पुरावे जोडणे आवश्यक आहे. पुराव्याअभावी अपात्र व्यक्ती पात्र व्यक्तीच्या यादीत येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी संबंधित अपात्र व्यक्तीचा पुरावा जोडावा, असे आवाहन प्रशासनाच्या मार्फत करण्यात आले आहे. १२ आॅक्टोबरपासून तालुकास्तरावर याद्या बनविण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे ११ आॅक्टोबरपर्यंत नागरिकांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे याबाबतचे आक्षेप नोंदविता येणार आहे.