शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

ओबीसींना हक्काप्रमाणे न्याय मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 01:01 IST

ओबीसींना घटनादत्त अधिकार मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेतले होते. मात्र तत्कालीन स्थितीत त्यांना समजून घेण्यात कमी पडलेला ओबीसी समाज आणि तत्कालीन शासनाने ओबीसी बांधवांकडे फिरवलेली पाठ, त्याचेच परिणाम आजही भोगावे लागत आहेत.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे भाजप ओबीसी कार्यकर्त्यांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : ओबीसींना घटनादत्त अधिकार मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेतले होते. मात्र तत्कालीन स्थितीत त्यांना समजून घेण्यात कमी पडलेला ओबीसी समाज आणि तत्कालीन शासनाने ओबीसी बांधवांकडे फिरवलेली पाठ, त्याचेच परिणाम आजही भोगावे लागत आहेत. मात्र ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्कांप्रमाणे न्याय मिळावा, असे आपले मत असून ओबीसींना घटनादत्त अधिकार मिळवून देणे हे आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले. देसाईगंज येथील सिधू भवनात भाजपा ओबीसी मोर्चा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती नाना नाकाडे, सभापती मोहन गायकवाड, न. प. उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशनी पारधी, भाजपचे जेष्ठ नेते किशन नागदेवे, प्रशांत वाघरे, सदानंद कुथे उपस्थित होते.आ. गजबे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलाच्य माध्यमातून ओबीसी बांधवांच्या भविष्यकालीन समस्या लक्षात घेऊन या समाजाला तत्कालीन स्थितीतच यथोचित न्याय मिळवून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र ओबीसी बांधवांच्या आरक्षण संदर्भात मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आज अखेर संघर्ष पेटू लागला असून आपल्या यथोचित न्याय हक्कासाठी ओबीसी बांधवांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. विद्यमान शासनाने स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती करुन ओबीसींना यथोचित न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याची सुरुवातही जिल्हा पातळीवर ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह बांधकामास गती देण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. तालुक्यातील भारनियमन, इटिया डोह नहराच्या पाण्याचा प्रश्न, या समस्या मांडण्यात आल्या. आ. गजबे यांनी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून इतरांवर अन्याय होऊ देणार नाही, याची ग्वाही दिली. संचालन विष्णू दुनेदार, प्रास्तविक प्रशांत वाघरे यांनी तर आभार सुनील पारधी यांनी मानले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती