शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

जनगणनेसाठी ओबीसींचा देसाईगंज येथे धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

शासन ओबीसींची जनगणना करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. ओबीसी बरोबरच व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गाची सुध्दा स्वतंत्र जनगणना करावी, या मुख्य मागणीसाठी देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देसाईगंज तालुक्यासह कुरखेडा, कोरची, आरमोरी तालुक्यातीलही हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते.

ठळक मुद्देशासनाला निवेदन । हजारो मोर्चेकऱ्यांमुळे देसाईगंज शहरातील रस्ते फुलले

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, या मुख्य मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला व पुरूष सहभागी झाले होते. मोर्चेकरांच्या रांगेने देसाईगंजातील मुख्य रस्ता व्यापला होता. या मोर्चाच्या माध्यमातून ओबीसींनी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले.१९३१ साली ब्रिटीश कालावधीत ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झाली होती. त्यानंतर मात्र एकदाही जनगणना झाली नाही. देशात ओबीसींची लोकसंख्या जवळपास ६५ टक्के असण्याची शक्यता आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी स्वतंत्र तरतूद करावी लागेल. यासाठी शासन ओबीसींची जनगणना करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. ओबीसी बरोबरच व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गाची सुध्दा स्वतंत्र जनगणना करावी, या मुख्य मागणीसाठी देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देसाईगंज तालुक्यासह कुरखेडा, कोरची, आरमोरी तालुक्यातीलही हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांमुळे देसाईगंज शहरातील रस्ते लोकांनी फुलून गेले होते. विशेष म्हणजे, महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. एचपी गॅस पार्इंट ते उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. नजर पुरणार नाही, एवढ्या दूरपर्यंत मोर्चाची रांग दिसून येत होती. मागण्यांचे निवेदन एसडीओ विशालकुमार यांच्यामार्फत शासनाला पाठविले.जनगणना होईपर्यंत स्वस्थ बसणार नाहीजनावरे, पशुपक्षी यांची जनगणना केली जाते. मात्र ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातील नागरिकांची जनगणना केली जात नाही. जनावरांपेक्षा या प्रवर्गांमधील नागरिक कनिष्ठ आहेत काय, असा प्रश्न उपस्थित करीत जोपर्यंत जातनिहाय ओबीसींची जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाने स्वस्थ बसू नये, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ह्युमनचे अध्यक्ष बाळासाहेब गावंडे यांच्यासह ओबीसी नेत्यांनी केले.या आहेत मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्याओबीसींची जनगणना करावी, गडचिरोली जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत करावे, अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे सर्व अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, पेसा क्षेत्रातील गावांमधील पुनर्सर्वेक्षण करावे, गैरआदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास ती गावे पेसा क्षेत्रातून वगळावी, वनहक्क दाव्यासाठी ओबीसींसाठी असलेली तीन पिढ्यांची अट शिथील करावी, विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र वसतिगृह बांधावे, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती