शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बाहेरील सुरक्षा दलांमुळे फुगला गडचिरोलीतील कोरोनाचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत २३८ जणांना कोरोनाने ग्रासले. मात्र त्यापैकी १८७ जणांची नोंद गडचिरोलीतील रुग्ण म्हणून करण्यात आली असून बाकी रुग्णांची नोंद त्यांच्या मूळ जिल्ह्यात व राज्यात करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे एकूण रुग्णसंख्या पोहोचली २३८ वर११६ जवान बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात सर्वाधिक काळ कोरोनामुक्त राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत २३८ जणांना कोरोनाने ग्रासले. मात्र त्यापैकी १८७ जणांची नोंद गडचिरोलीतील रुग्ण म्हणून करण्यात आली असून बाकी रुग्णांची नोंद त्यांच्या मूळ जिल्ह्यात व राज्यात करण्यात आली आहे. एकूण बाधित रुग्णांमध्ये तब्बल ११६ जण नक्षलविरोधी अभियानासाठी बाहेरून आलेल्या सुरक्षा दलांचे जवान आहेत.मंगळवारी (दि.१४) राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) ४२ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.गेल्या आठवड्यात १५० एसआरपीएफ जवानांची तुकडी धुळे येथून गडचिरोलीत आल्यानंतर जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परिसरात ते सर्व जवान संस्थात्मक विलगिकरणात होते. उर्वरित जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) विविध बटालियनचे जवान गेल्या महिनाभरात सुट्यांवरून जिल्ह्यात परत आले आहेत. ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरणात होते. त्यापैकी आतापर्यंत ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय सीमा सुरक्षा दलाचे २ जवान पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात दाखल झालेल्या विविध सुरक्षा दलाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११६ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ एका रुग्णाचा हैदराबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तो हृदयरोगी होता. याशिवाय ९० जणांनी कोरोनावर मात केली असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस