शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

न.प. मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे शहर विकासाला खीळ

By admin | Updated: February 8, 2016 01:32 IST

नगर पालिकेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांचेवर गडचिरोली शहराच्या विकासाची जबाबदारी आहे.

राजेश कात्रटवार यांचा आरोप : निधी अखर्चित राहण्याची शक्यतागडचिरोली : नगर पालिकेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांचेवर गडचिरोली शहराच्या विकासाची जबाबदारी आहे. मात्र नगर पालिकेचे मुख्याधिकारी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याने विकासाला खिळ बसली आहे. नगर पालिकेला विविध योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त झाला. सदर निधी कोणत्या कामावर खर्च करावा, याचे नियोजन करून तसा ठराव दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे विकास कामे रखडली. त्यामुळे पालिकेचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चीत राहण्याची शक्यता आहे. न.प. मुख्याधिकाऱ्यांना प्रशासकीय पाठबळ मिळत आहे, असा आरोप नगर पालिकेचे बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांनी केला आहे. सभापती कात्रटवार यांनी म्हटले आहे की, नगरोत्थान योजनेंतर्गत चार तर दलित वस्ती सुधार योजनेतून दोन कोटींचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीतून शहरातील अनेक वार्डातील विकासकामे पूर्ण होणार आहेत. परंतु निष्क्रीय मुख्याधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे सदर निधी तसाच पडून आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत निधी खर्च न झाल्यास शहर विकासावर परिणाम होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. बारमाही वाहणारी वैनगंगा नदी असूनही दिवसातून एकदाच पाणी पुरवठा करावा लागत आहे. ही समस्या असूनही मुख्याधिकारी पालिका व शहराला वाऱ्यावर सोडून दीर्घ रजेवर गेले आहे, असेही कात्रटवार यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांकडून कामांचे ठराव उशिरा घेण्यात आले. यापैकी काही ठरावावर अंदाजपत्रक तयार करून काही कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तर काही कामांचे ठराव तांत्रिक मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहेत. पालिकेत कर्मचारी कमी आहेत. कामातील त्रूट्या दूर करून शहरातील कामे लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.- गिरीश बन्नोरे, सीओ न.प.गडचिरोलीमुख्यमंत्र्यासमोरही वाचला निष्क्रियतेचा पाढानगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणी खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. मितेश भांगडिया यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यानंतर आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सीओंच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला.अविश्वास ठरावानंतरही कारवाई नाहीन.प. मुख्याधिकाऱ्यांविरूध्द सन २०१५ मध्ये अविश्वास ठराव पारित करण्यात आला. या ठरावाला २३ नगर सेवकांचा पाठींबा आहे. मात्र मुख्याधिकाऱ्यांवर अद्यापही प्रशासकीय कारवाई करण्यात आली नाही.