शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

आता जिल्ह्यातच होणार सैन्यभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:46 IST

भारतीय सैन्यदलातर्फे वेळोवेळी विविध जिल्ह्यात होणारी सैन्यभरतीची प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत होत नव्हती. ही सैन्यभरती प्रक्रिया इतर जिल्ह्यात होत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर अर्थिक भुर्दंड बसत होता.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश : मुख्यमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : भारतीय सैन्यदलातर्फे वेळोवेळी विविध जिल्ह्यात होणारी सैन्यभरतीची प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत होत नव्हती. ही सैन्यभरती प्रक्रिया इतर जिल्ह्यात होत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर अर्थिक भुर्दंड बसत होता. तसेच प्रवासात बराच वेळ खर्च होत होता. मात्र आता पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात सैन्य पदभरतीची प्रक्रिया घेतली जाणार आहे.राज्य सरकार तर्फे भारतीय सैन्यदलाला राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात सैन्यभरती घ्यायची याची शिफारस केली जाते. या बाबीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापुढे होणारी सैन्यभरती ही गडचिरोली जिल्ह्यातच घेण्यात यावी अशी मागणी केली होती. याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर्षी पासून होणारी सैन्यभरती ही गडचिरोली जिल्ह्यातच घेण्यात येईल, असे मान्य केले आहे.आजपर्यंत पोलीस भरती याच जिल्ह्यात होत होती परंतु सैन्यभरती ही या जिल्ह्यात होत नसल्याने बेरोजगार युवकांची मोठी आर्थिक कोंडी होत होती याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने यापुढे होणारी सैन्यभरती ही गडचिरोली जिल्ह्यातच घेण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील बेरोजगारारांना सैन्य भरती प्रक्रियेत उतरणे सुलभ होणार आहे. सदर भरती प्रक्रिया गडचिरोली जिल्हास्तरावर होणार असल्याने याचा लाभ अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागातील युवकांना मिळणार आहे.पोलीस व सैन्य भरतीवरच युवकांची मदारगडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहीत जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात रोजगाराच्या संधी खुप कमी उपलब्ध आहेत. या जिल्ह्यात बेरोजगार युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून जिल्ह्यातील युवक पोलीस भरती व सैन्यभरती याकडे मोठ्या आशेने बघतात.

टॅग्स :SoldierसैनिकGadchiroliगडचिरोली