शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

आता सरकारी कर्मचारी बनणार पोलिसांचे पंच

By admin | Updated: July 23, 2015 01:28 IST

गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच न्यायालयात सुनावनीच्या वेळेत फितूर होतात. त्यामुळे गृहविभागाने पंचनाम्याच्या कामामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा ....

गृह विभागाचा आदेश : पोलिसांच्या पंचनाम्याचे ओझे कर्मचाऱ्यांवरगडचिरोली : गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच न्यायालयात सुनावनीच्या वेळेत फितूर होतात. त्यामुळे गृहविभागाने पंचनाम्याच्या कामामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा आदेश गृहविभागाने नुकताच काढला आहे. त्यामध्ये शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची यादी संबंधीत पोलीस ठाण्यांना आदेश नुकतेच येऊन धडकले आहेत. या आदेशामुळे पोलिसांच्या पंचनाम्याचे ओझे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाठीवर येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनस्तापात भर पडणार आहे.एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपासी अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनाम्याच्यावेळी उपस्थितीत असलेल्या पंचाचे बयाण खटल्यांच्या सुनावणी दरम्यान महत्त्वाची ठरते. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीसाठी येण्याकरिता काही प्रकरणामध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो. तपासी अधिकाऱ्याने तत्कालिन परिस्थितीत उपस्थित केलेले पंच सुनावनी दरम्यान प्रामाणिक राहतील याची खात्री नसते.ऐनवेळी पंच फितूर होत असल्यामुळे बऱ्याचशा गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे दोषारोपसिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणी दरम्यान पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी राहणार असल्याचे गृहविभागाने ठरविले आहे. त्यामुळे न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मदत होणार आहे.शिक्षण मंडळासह इतरही विभागाने नुकतेच या संदर्भातील आदेश सर्व शाळातील मुख्यध्यापकासह अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे शिक्षक आणि ईतर कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या आवश्यकतेनुसार शाळेतील किंवा एका अधिकाऱ्यांची नोडल आॅफीसर म्हणून नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी त्याचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक जवळच्या पोलीस चौकीत असणार आहेत. पोलिसांना त्याची गरज भासेल तेव्हा त्यांना तत्काळ कामातून मुक्तता द्यावी असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्याचा खटला न्यायालयात सुरू असताना पंचाची साक्ष महत्त्वाची असते पण त्यावेळी नेमलेले पंच प्रामाणीक राहतील याची खात्री नसते व पंच फितूर झाल्यामुळे अनेक गुन्ह्यात आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यासह शिक्षकही पंचनाम्यासाठी पंच म्हणून ठेवण्यात येणार आहेत. या आदेशामुळे शिक्षकासह इतरही कर्मचाऱ्यात खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)