शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

आता सरकारी कर्मचारी बनणार पोलिसांचे पंच

By admin | Updated: July 23, 2015 01:28 IST

गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच न्यायालयात सुनावनीच्या वेळेत फितूर होतात. त्यामुळे गृहविभागाने पंचनाम्याच्या कामामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा ....

गृह विभागाचा आदेश : पोलिसांच्या पंचनाम्याचे ओझे कर्मचाऱ्यांवरगडचिरोली : गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच न्यायालयात सुनावनीच्या वेळेत फितूर होतात. त्यामुळे गृहविभागाने पंचनाम्याच्या कामामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा आदेश गृहविभागाने नुकताच काढला आहे. त्यामध्ये शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची यादी संबंधीत पोलीस ठाण्यांना आदेश नुकतेच येऊन धडकले आहेत. या आदेशामुळे पोलिसांच्या पंचनाम्याचे ओझे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाठीवर येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनस्तापात भर पडणार आहे.एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपासी अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनाम्याच्यावेळी उपस्थितीत असलेल्या पंचाचे बयाण खटल्यांच्या सुनावणी दरम्यान महत्त्वाची ठरते. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीसाठी येण्याकरिता काही प्रकरणामध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो. तपासी अधिकाऱ्याने तत्कालिन परिस्थितीत उपस्थित केलेले पंच सुनावनी दरम्यान प्रामाणिक राहतील याची खात्री नसते.ऐनवेळी पंच फितूर होत असल्यामुळे बऱ्याचशा गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे दोषारोपसिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणी दरम्यान पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी राहणार असल्याचे गृहविभागाने ठरविले आहे. त्यामुळे न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मदत होणार आहे.शिक्षण मंडळासह इतरही विभागाने नुकतेच या संदर्भातील आदेश सर्व शाळातील मुख्यध्यापकासह अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे शिक्षक आणि ईतर कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या आवश्यकतेनुसार शाळेतील किंवा एका अधिकाऱ्यांची नोडल आॅफीसर म्हणून नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी त्याचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक जवळच्या पोलीस चौकीत असणार आहेत. पोलिसांना त्याची गरज भासेल तेव्हा त्यांना तत्काळ कामातून मुक्तता द्यावी असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्याचा खटला न्यायालयात सुरू असताना पंचाची साक्ष महत्त्वाची असते पण त्यावेळी नेमलेले पंच प्रामाणीक राहतील याची खात्री नसते व पंच फितूर झाल्यामुळे अनेक गुन्ह्यात आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यासह शिक्षकही पंचनाम्यासाठी पंच म्हणून ठेवण्यात येणार आहेत. या आदेशामुळे शिक्षकासह इतरही कर्मचाऱ्यात खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)