शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

आता सरकारी कर्मचारी बनणार पोलिसांचे पंच

By admin | Updated: July 23, 2015 01:28 IST

गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच न्यायालयात सुनावनीच्या वेळेत फितूर होतात. त्यामुळे गृहविभागाने पंचनाम्याच्या कामामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा ....

गृह विभागाचा आदेश : पोलिसांच्या पंचनाम्याचे ओझे कर्मचाऱ्यांवरगडचिरोली : गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच न्यायालयात सुनावनीच्या वेळेत फितूर होतात. त्यामुळे गृहविभागाने पंचनाम्याच्या कामामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा आदेश गृहविभागाने नुकताच काढला आहे. त्यामध्ये शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची यादी संबंधीत पोलीस ठाण्यांना आदेश नुकतेच येऊन धडकले आहेत. या आदेशामुळे पोलिसांच्या पंचनाम्याचे ओझे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाठीवर येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनस्तापात भर पडणार आहे.एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपासी अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनाम्याच्यावेळी उपस्थितीत असलेल्या पंचाचे बयाण खटल्यांच्या सुनावणी दरम्यान महत्त्वाची ठरते. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीसाठी येण्याकरिता काही प्रकरणामध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो. तपासी अधिकाऱ्याने तत्कालिन परिस्थितीत उपस्थित केलेले पंच सुनावनी दरम्यान प्रामाणिक राहतील याची खात्री नसते.ऐनवेळी पंच फितूर होत असल्यामुळे बऱ्याचशा गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे दोषारोपसिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणी दरम्यान पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी राहणार असल्याचे गृहविभागाने ठरविले आहे. त्यामुळे न्यायालयात गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मदत होणार आहे.शिक्षण मंडळासह इतरही विभागाने नुकतेच या संदर्भातील आदेश सर्व शाळातील मुख्यध्यापकासह अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे शिक्षक आणि ईतर कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या आवश्यकतेनुसार शाळेतील किंवा एका अधिकाऱ्यांची नोडल आॅफीसर म्हणून नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी त्याचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक जवळच्या पोलीस चौकीत असणार आहेत. पोलिसांना त्याची गरज भासेल तेव्हा त्यांना तत्काळ कामातून मुक्तता द्यावी असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्याचा खटला न्यायालयात सुरू असताना पंचाची साक्ष महत्त्वाची असते पण त्यावेळी नेमलेले पंच प्रामाणीक राहतील याची खात्री नसते व पंच फितूर झाल्यामुळे अनेक गुन्ह्यात आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यासह शिक्षकही पंचनाम्यासाठी पंच म्हणून ठेवण्यात येणार आहेत. या आदेशामुळे शिक्षकासह इतरही कर्मचाऱ्यात खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)