शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

अकरावी प्रवेशाचे ‘नो टेन्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 01:17 IST

दहाव्या वर्गाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहे.

जिल्हाभरात १३५ तुकड्या : उत्तीर्ण विद्यार्थी १४ हजार ९२७, कमाल प्रवेश क्षमता १८ हजार ८००गडचिरोली : दहाव्या वर्गाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहे. जिल्ह्याचा निकाल सुमारे ८७.९७ टक्के लागला आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश मिळणार नाही की, नाही, अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्हाभरात अकरावीच्या प्रवेशीत जागा जास्त असल्याने प्रवेशासाठी टेन्शन घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. दहावीच्या परीक्षेत जिल्हाभरातून एकूण १४ हजार ९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६३ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये कला शाखेच्या एकूण १७० तुकड्या, विज्ञान शाखेच्या ६० तुकड्या व वाणिज्य शाखेच्या ५ अशा एकूण २३५ तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीत सुरूवातीला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतो. मात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीनंतर आणखी २० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येते. म्हणजेच प्रत्येक तुकडीत कमाल ८० विद्यार्थी प्रवेशीत होऊ शकतात.या गणिताप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेशीत जागांची संख्या १८ हजार ८०० एवढी आहे. उत्तीर्ण होणार विद्यार्थ्यांच्या तुलनेत ती ३ हजार ८७३ ने जास्त आहे. त्यामुळे निकाल जरी जास्त लागला असला तरी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दहावीनंतर विद्यार्थी आपापल्या आवडीप्रमाणे अभ्यासक्रम व शाखांची निवड करतात. पुढे त्याच शाखेत उच्च शिक्षण घेऊन करिअर करीत असल्याने अकरावी प्रवेशाचे विशेष महत्त्व आहे. मागील दोन वर्षांपासून दहावीच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कधीकधी प्रवेश मिळण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी अडचण जाणार नाही. (नगर प्रतिनिधी)विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या एकूण ६० तुकड्या आहेत. या तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांची कमाल प्रवेशीत संख्या ४ हजार ८०० एवढी आहे. मात्र बहुतांश विद्यार्थी विज्ञान शाखेसाठीच प्रवेश घेण्यास इच्छुक राहत असल्याने विज्ञान शाखेसाठी गर्दी होण्याची शक्यता यावर्षीसुध्दा नाकारता येत नाही. त्यातही नामांकित महाविद्यालय असेल तर आणखी गर्दी वाढण्याची व काही विद्यार्थ्यांना वेटींगवर राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकेकाळी गर्दी खेचणाऱ्या कला महाविद्यालयांचे मात्र भविष्य धोक्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांप्रमाणेच कला शाखेच्या प्राध्यापकांनाही विद्यार्थ्यांसाठी शोधमोहीम राबवावी लागत आहे. ३ हजार ८७३ जागा अतिरिक्तदहावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्वच महाविद्यालयांची कमाल प्रवेशीत क्षमता १८ हजार ८०० एवढी आहे. त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत ३ हजार ८७३ जागा अतिरिक्त आहेत. त्यातीलही काही विद्यार्थी पॉलिटेक्निक, आयटीआय व इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे प्रवेशीत विद्यार्थ्यांची संख्या आणखी कमी होते.