शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्यात अग्निशमन यंत्रणाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:54 IST

चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उपलब्ध करून दिली नाही.

ठळक मुद्देशासन व प्रशासनाचे दुर्लक्ष : आगीच्या अनेक घटना घडूनही दखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उपलब्ध करून दिली नाही. परिणामी आग वेळेवर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे.चामोर्शी तालुक्यात मे महिन्यात आग लागून किराणा दुकान जळाल्याची घटना घडली. कुनघाडा मार्गावर शेतातील कचरा जाळताना तणसीचे ढिगही जळून पशुंच्या वैरणाची होळी झाली. अलिकडेच चामोर्शी शहरात लक्ष्मी गेट परिसरात सलुनचे दुकान व पानठेला जळून खाक झाल्याची घटना घडली. तालुक्याच्या बोरी येथे शेतशिवारातील तणसीचे अनेक ढिगही जळाले. यंदाच्या उन्हाळ्यात चामोर्शी शहरासह तालुक्यात आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याच्या बऱ्याच घटना घडल्या. दरवर्षीच्या उन्हाळ्यात तालुक्यासह शहरात आग लागण्याच्या अनेक घटना घडत असतात. मात्र या घटनांना आळा घालण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत नाही.चामोर्शी नगर पंचायतीकडे अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था नाही. त्यामुळे गडचिरोली, अहेरी व मूल या तीन ठिकाणावरून अग्निशमन वाहन व मनुष्यबळ बोलवावे लागते. या तिनही शहराचे अंतर दूर असल्याने हे वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत घटनास्थळी काहीच उरत नाही. आगीच्या रौद्ररूपात अनेक साहित्य जळून खाक होतात.चामोर्शी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी संजय गंगथडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, मी रजेवर आहे. अग्निशमन यंत्रणेचा प्रस्ताव आहे किंवा नाही, यासंदर्भात आपण सोमवारी माहिती देऊ, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.नगर पंचायतीला अग्निशमन यंत्रणा देण्याची मागणीचामोर्शी तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायती असून ११४ गावे आहेत. सर्वाधिक नऊ जिल्हा परिषद क्षेत्र असून दोन लाखांवर लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यात आग लागण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. या घटनेतील आग विझविण्याच्या उद्देशाने नगर पंचायत प्रशासनाला शासनाने अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. सदर मागणीला घेऊन नगर पंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा केल्यास अग्निशमन वाहन उपलब्ध होऊ शकते. अग्निशमन वाहन उपलब्ध झाल्यास आग आटोक्यात आणून लाखो रुपयांची नुकसान टाळू शकता येते. यासाठी राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

टॅग्स :fireआग