शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

चामोर्शी तालुक्यात अग्निशमन यंत्रणाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:54 IST

चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उपलब्ध करून दिली नाही.

ठळक मुद्देशासन व प्रशासनाचे दुर्लक्ष : आगीच्या अनेक घटना घडूनही दखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उपलब्ध करून दिली नाही. परिणामी आग वेळेवर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे.चामोर्शी तालुक्यात मे महिन्यात आग लागून किराणा दुकान जळाल्याची घटना घडली. कुनघाडा मार्गावर शेतातील कचरा जाळताना तणसीचे ढिगही जळून पशुंच्या वैरणाची होळी झाली. अलिकडेच चामोर्शी शहरात लक्ष्मी गेट परिसरात सलुनचे दुकान व पानठेला जळून खाक झाल्याची घटना घडली. तालुक्याच्या बोरी येथे शेतशिवारातील तणसीचे अनेक ढिगही जळाले. यंदाच्या उन्हाळ्यात चामोर्शी शहरासह तालुक्यात आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याच्या बऱ्याच घटना घडल्या. दरवर्षीच्या उन्हाळ्यात तालुक्यासह शहरात आग लागण्याच्या अनेक घटना घडत असतात. मात्र या घटनांना आळा घालण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत नाही.चामोर्शी नगर पंचायतीकडे अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था नाही. त्यामुळे गडचिरोली, अहेरी व मूल या तीन ठिकाणावरून अग्निशमन वाहन व मनुष्यबळ बोलवावे लागते. या तिनही शहराचे अंतर दूर असल्याने हे वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत घटनास्थळी काहीच उरत नाही. आगीच्या रौद्ररूपात अनेक साहित्य जळून खाक होतात.चामोर्शी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी संजय गंगथडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, मी रजेवर आहे. अग्निशमन यंत्रणेचा प्रस्ताव आहे किंवा नाही, यासंदर्भात आपण सोमवारी माहिती देऊ, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.नगर पंचायतीला अग्निशमन यंत्रणा देण्याची मागणीचामोर्शी तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायती असून ११४ गावे आहेत. सर्वाधिक नऊ जिल्हा परिषद क्षेत्र असून दोन लाखांवर लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यात आग लागण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. या घटनेतील आग विझविण्याच्या उद्देशाने नगर पंचायत प्रशासनाला शासनाने अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. सदर मागणीला घेऊन नगर पंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा केल्यास अग्निशमन वाहन उपलब्ध होऊ शकते. अग्निशमन वाहन उपलब्ध झाल्यास आग आटोक्यात आणून लाखो रुपयांची नुकसान टाळू शकता येते. यासाठी राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

टॅग्स :fireआग