शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

चामोर्शी तालुक्यात अग्निशमन यंत्रणाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:54 IST

चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उपलब्ध करून दिली नाही.

ठळक मुद्देशासन व प्रशासनाचे दुर्लक्ष : आगीच्या अनेक घटना घडूनही दखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उपलब्ध करून दिली नाही. परिणामी आग वेळेवर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे.चामोर्शी तालुक्यात मे महिन्यात आग लागून किराणा दुकान जळाल्याची घटना घडली. कुनघाडा मार्गावर शेतातील कचरा जाळताना तणसीचे ढिगही जळून पशुंच्या वैरणाची होळी झाली. अलिकडेच चामोर्शी शहरात लक्ष्मी गेट परिसरात सलुनचे दुकान व पानठेला जळून खाक झाल्याची घटना घडली. तालुक्याच्या बोरी येथे शेतशिवारातील तणसीचे अनेक ढिगही जळाले. यंदाच्या उन्हाळ्यात चामोर्शी शहरासह तालुक्यात आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याच्या बऱ्याच घटना घडल्या. दरवर्षीच्या उन्हाळ्यात तालुक्यासह शहरात आग लागण्याच्या अनेक घटना घडत असतात. मात्र या घटनांना आळा घालण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत नाही.चामोर्शी नगर पंचायतीकडे अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था नाही. त्यामुळे गडचिरोली, अहेरी व मूल या तीन ठिकाणावरून अग्निशमन वाहन व मनुष्यबळ बोलवावे लागते. या तिनही शहराचे अंतर दूर असल्याने हे वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत घटनास्थळी काहीच उरत नाही. आगीच्या रौद्ररूपात अनेक साहित्य जळून खाक होतात.चामोर्शी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी संजय गंगथडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, मी रजेवर आहे. अग्निशमन यंत्रणेचा प्रस्ताव आहे किंवा नाही, यासंदर्भात आपण सोमवारी माहिती देऊ, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.नगर पंचायतीला अग्निशमन यंत्रणा देण्याची मागणीचामोर्शी तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायती असून ११४ गावे आहेत. सर्वाधिक नऊ जिल्हा परिषद क्षेत्र असून दोन लाखांवर लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यात आग लागण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. या घटनेतील आग विझविण्याच्या उद्देशाने नगर पंचायत प्रशासनाला शासनाने अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. सदर मागणीला घेऊन नगर पंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा केल्यास अग्निशमन वाहन उपलब्ध होऊ शकते. अग्निशमन वाहन उपलब्ध झाल्यास आग आटोक्यात आणून लाखो रुपयांची नुकसान टाळू शकता येते. यासाठी राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

टॅग्स :fireआग