शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

राज्यातल्या मागास जिल्ह्यात ३६४९ घरांपर्यंत वीज पोहोचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:12 IST

देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी दोन जिल्ह्यांनी वीज पुरवठ्याचा लक्ष्यांक गाठत सर्व कुटुंबांमध्ये वीज पुरवठा सुरू केला आहे. मात्र गडचिरोली आणि नंदूरबार जिल्ह्यात अजून ३६४९ कुटुंबांना वीज पुरवठा मिळालेला नाही.

ठळक मुद्देआकांक्षित जिल्हे वाशिम आणि उस्मानाबादची लक्ष्यपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी दोन जिल्ह्यांनी वीज पुरवठ्याचा लक्ष्यांक गाठत सर्व कुटुंबांमध्ये वीज पुरवठा सुरू केला आहे. मात्र गडचिरोली आणि नंदूरबार जिल्ह्यात अजून ३६४९ कुटुंबांना वीज पुरवठा मिळालेला नाही. यातील बहुतांश कुटुंबिय नंदूरबार जिल्ह्यातील आहेत.विस्तार ग्रामस्वराज अभियानांतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘सहज बिजरी हर घर’ ही योजना आणली. त्यानुसार महाराष्ट्रातील गडचिरोली, नंदूरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा नसलेल्या ३६ हजार १९९ कुटुंबांमध्ये वीज कनेक्शन देण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यात वाशिम जिल्ह्याने २१६५ तर उस्मानाबाद जिल्ह्याने ५७५९ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन आपले १०० टक्के लक्ष्य गाठले आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्याने २२ हजार ३७ कुटुंबांना वीज पुरवठा देण्याच्या लक्ष्यापैकी १८ हजार ४४५ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन ९४.१५ टक्के लक्ष्य गाठले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार २३८ कुटुंबांपैकी ६ हजार २१९ कुटुंबांना वीज देण्यात आली असून आता अवघ्या १९ कुटुंबांना वीज कनेक्शन देणे बाकी आहे.या योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील २८१ गावांत, नंदूरबारमधील ५४७ गावांत, उस्मानाबादमधील ४८८ गावांत आणि वाशिम जिल्ह्यातील ३९१ गावांमध्ये सर्व कुटुंबात वीजेचा प्रकाश पाडला जात आहे. काही दिवसात दोन्ही जिल्ह्यात लक्ष्यपूर्ती होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :electricityवीज