शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातल्या मागास जिल्ह्यात ३६४९ घरांपर्यंत वीज पोहोचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:12 IST

देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी दोन जिल्ह्यांनी वीज पुरवठ्याचा लक्ष्यांक गाठत सर्व कुटुंबांमध्ये वीज पुरवठा सुरू केला आहे. मात्र गडचिरोली आणि नंदूरबार जिल्ह्यात अजून ३६४९ कुटुंबांना वीज पुरवठा मिळालेला नाही.

ठळक मुद्देआकांक्षित जिल्हे वाशिम आणि उस्मानाबादची लक्ष्यपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी दोन जिल्ह्यांनी वीज पुरवठ्याचा लक्ष्यांक गाठत सर्व कुटुंबांमध्ये वीज पुरवठा सुरू केला आहे. मात्र गडचिरोली आणि नंदूरबार जिल्ह्यात अजून ३६४९ कुटुंबांना वीज पुरवठा मिळालेला नाही. यातील बहुतांश कुटुंबिय नंदूरबार जिल्ह्यातील आहेत.विस्तार ग्रामस्वराज अभियानांतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘सहज बिजरी हर घर’ ही योजना आणली. त्यानुसार महाराष्ट्रातील गडचिरोली, नंदूरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा नसलेल्या ३६ हजार १९९ कुटुंबांमध्ये वीज कनेक्शन देण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यात वाशिम जिल्ह्याने २१६५ तर उस्मानाबाद जिल्ह्याने ५७५९ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन आपले १०० टक्के लक्ष्य गाठले आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्याने २२ हजार ३७ कुटुंबांना वीज पुरवठा देण्याच्या लक्ष्यापैकी १८ हजार ४४५ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन ९४.१५ टक्के लक्ष्य गाठले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार २३८ कुटुंबांपैकी ६ हजार २१९ कुटुंबांना वीज देण्यात आली असून आता अवघ्या १९ कुटुंबांना वीज कनेक्शन देणे बाकी आहे.या योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील २८१ गावांत, नंदूरबारमधील ५४७ गावांत, उस्मानाबादमधील ४८८ गावांत आणि वाशिम जिल्ह्यातील ३९१ गावांमध्ये सर्व कुटुंबात वीजेचा प्रकाश पाडला जात आहे. काही दिवसात दोन्ही जिल्ह्यात लक्ष्यपूर्ती होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :electricityवीज