शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

राज्यातल्या मागास जिल्ह्यात ३६४९ घरांपर्यंत वीज पोहोचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:12 IST

देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी दोन जिल्ह्यांनी वीज पुरवठ्याचा लक्ष्यांक गाठत सर्व कुटुंबांमध्ये वीज पुरवठा सुरू केला आहे. मात्र गडचिरोली आणि नंदूरबार जिल्ह्यात अजून ३६४९ कुटुंबांना वीज पुरवठा मिळालेला नाही.

ठळक मुद्देआकांक्षित जिल्हे वाशिम आणि उस्मानाबादची लक्ष्यपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी दोन जिल्ह्यांनी वीज पुरवठ्याचा लक्ष्यांक गाठत सर्व कुटुंबांमध्ये वीज पुरवठा सुरू केला आहे. मात्र गडचिरोली आणि नंदूरबार जिल्ह्यात अजून ३६४९ कुटुंबांना वीज पुरवठा मिळालेला नाही. यातील बहुतांश कुटुंबिय नंदूरबार जिल्ह्यातील आहेत.विस्तार ग्रामस्वराज अभियानांतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘सहज बिजरी हर घर’ ही योजना आणली. त्यानुसार महाराष्ट्रातील गडचिरोली, नंदूरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा नसलेल्या ३६ हजार १९९ कुटुंबांमध्ये वीज कनेक्शन देण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यात वाशिम जिल्ह्याने २१६५ तर उस्मानाबाद जिल्ह्याने ५७५९ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन आपले १०० टक्के लक्ष्य गाठले आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्याने २२ हजार ३७ कुटुंबांना वीज पुरवठा देण्याच्या लक्ष्यापैकी १८ हजार ४४५ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन ९४.१५ टक्के लक्ष्य गाठले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार २३८ कुटुंबांपैकी ६ हजार २१९ कुटुंबांना वीज देण्यात आली असून आता अवघ्या १९ कुटुंबांना वीज कनेक्शन देणे बाकी आहे.या योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील २८१ गावांत, नंदूरबारमधील ५४७ गावांत, उस्मानाबादमधील ४८८ गावांत आणि वाशिम जिल्ह्यातील ३९१ गावांमध्ये सर्व कुटुंबात वीजेचा प्रकाश पाडला जात आहे. काही दिवसात दोन्ही जिल्ह्यात लक्ष्यपूर्ती होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :electricityवीज