शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

झाडावर नऊ तास चढून वाचविला स्वत:चा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

नदीच्या पुलावरून जवळपास दोन ते तीन फूट पाणी वाहत होते. याच पाण्यातून त्यांनी दुचाकी टाकली. मात्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून जाऊन एका झाडाला अडकली. दोघेही वाहून जात असताना नाल्यातील झाडाच्या फांदीला अडकले. या फांदीच्या आधाराने दोघेही झाडावर चढले. पाणी कमी होतपर्यंत प्रतीक्षा केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याजवळ नव्हता.

ठळक मुद्देमुस्का येथील घटना : गावकऱ्यांनी शनिवारी रात्री १२ वाजता जाऊन दोघांना काढले पुरातून बाहेर

घनश्याम म्हशाखेत्री ।लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : पुराच्या पाण्यात वाहून जात असताना झाडाचा आसरा मिळाला. त्याच झाडावर रात्रभर थांबून दोघांनी स्वत:चा जीव वाचविला. सदर घटना धानोरा तालुक्यातील मुस्का येथील आहे. त्या दोघांनाही गावकऱ्यांनी ७ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजता सुखरूप बाहेर काढले. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती. याचा प्रत्यय या दोघांच्या बाबतीत आला.मुस्का येथील विनोद बोरकर व मनोहर बोरकर हे दोघे जण गावाजवळच असलेल्या सालेभट्टी येथे काही कामानिमित्त दुचाकीने शनिवारी सकाळी गेले होते. काम आटोपून दुपारी ३ वाजता गावाकडे परत येत होते. गावाजवळून डेडरी नदी वाहते. या नदीच्या पुलावरून जवळपास दोन ते तीन फूट पाणी वाहत होते. याच पाण्यातून त्यांनी दुचाकी टाकली. मात्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून जाऊन एका झाडाला अडकली. दोघेही वाहून जात असताना नाल्यातील झाडाच्या फांदीला अडकले. या फांदीच्या आधाराने दोघेही झाडावर चढले. पाणी कमी होतपर्यंत प्रतीक्षा केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याजवळ नव्हता. हे दोघेही पुरात अडकल्याची माहिती गावकºयांना मिळाली. मात्र पुराने वेढा घातला असल्याने गावकरी सुध्दा मदत करू शकत नव्हते. घटनास्थळ गावापासून दीड किमी अंतरावर होते. बचावाचे कोणतेही साधन गावकºयांजवळ उपलब्ध नव्हते. पूर थोडा कमी झाल्यानंतर सरपंच शालिक गावडे, आरोग्य विभागाचे कर्मचारी तिरूपती कोल्लुरी यांनी इतर गावकºयांच्या मदतीने घटनास्थळ गाठले. सुमारे कंबरभर पाण्यातून मार्ग काढत दोघांनाही सुखरूप वाचविले. बचाव कार्यात पंकेश गावडे, आकाश गावडे, संतोष मोहुर्ले, जितेंद्र मोहुर्ले, युवराज पटणे, राजू मोहुर्ले, अक्षय मोहुर्ले, शंभूलाल चाटारे, जगन मोहुर्ले, अल्पेश मोहुर्ले, विश्वनाथ मोहुर्ले, राजकुमार पटणे, तनवीर बोरकर, भाऊराव बोरकर, ऋषी बोरकर यांनी मदत केली. पूर ओसरल्यानंतर रविवारी दुचाकी आणण्यात आली.बचाव साहित्याची मागणीमुस्का गावाला दर पावसाळ्यात पुराचा वेढा बसतो. आवश्यक कामानिमित्त गावकºयांना जीव धोक्यात घालून बाहेर जावेच लागते. एखादा व्यक्ती पुरात अडकला असल्यास त्याला काढावे लागते. यासाठी ग्रामपंचायतीने तसेच इतर विभागाने नागरिकांना पुरापासून बचावाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर