शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

पुढील दोन वर्षांत जिल्ह्यातील शेती व शेतकऱ्यांचे चित्र बदलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. केवळ शासकीय योजनाच नाही तर नवनवीन तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या ...

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. केवळ शासकीय योजनाच नाही तर नवनवीन तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कोणकोणते प्रयोग केले जात आहेत यावर डॉ.कऱ्हाळे यांनी दिलेल्या मुलाखतीतून अनेक पैलू समोर आले. ते म्हणाले, या जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रातील ७५ टक्के जमीन जंगलव्याप्त आहे. केवळ २५ टक्के जमिनीवर खरिपाची लागवड होते. ‘विकेल ते पिकेल’ हे तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात करून नगदी पिकाकडे वळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र वाढत आहे.

परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी या जिल्ह्यात चांगला वाव आहे. विषमुक्त शेतमालाला चांगली मागणी आहे. त्यासोबतच त्याची वाजवी किंमत ठेवून विक्री केल्यास प्रत्येक जण तो माल घेण्यासाठी तयार होईल. जिल्ह्यात गायी असल्या तरी गायीच्या दुधाला स्थानिक स्तरावर मागणी नाही. कारण काळा चहा घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पण देशी गायीचे दूध म्हणून मार्केटिंग केल्यास इतर जिल्ह्यात मागणी वाढू शकते. यासोबत गायीचे शुद्ध तूप, गोमूत्र, गायीच्या शेणखतापासून गांडूळ खत यालाही माेठी मागणी होऊ शकते. जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर शेतकऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जात आहे. त्यासाठी प्रत्येक दोन गावांचा मिळून एक कृषीमित्र आहे.

कृषी यांत्रिकीकरणावरही भर दिला जात आहे. पण हे करताना सरसकट सर्वांनी ट्रॅक्टरचा वापर करण्याची गरज नाही. प्रत्येकासाठी ते शक्यही नाही. अशावेळी बैलचलित यंत्रांचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे डॉ.कऱ्हाळे म्हणाले. बैलचलित पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, नांगरणी, चिखलणी यंत्र अशा विविध यंत्रांचा वापर बैलांना घेऊन होऊ शकतो. ट्रॅक्टरच्या तुलनेत ते कमी खर्चात होते, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांमध्ये बदल होत आहे, पण त्याची गती वाढविण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियामक मंडळामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचे परिणाम हळूहळू नजरेस पडतील, असा विश्वास डॉ.कऱ्हाळे यांनी व्यक्त केला.

गडचिरोली हाच एक ब्रॅन्ड

या जिल्ह्यातील शेतकरी उत्पादन घेण्यात मागे नाहीत, पण मालाचे मार्केटिंग त्यांना जमलेले नाही. वास्तविक गडचिरोलीत सेंद्रिय शेतीला भरपूर वाव आहे. बाहेरच्या जिल्ह्यांसाठी गडचिरोली हाच एक ब्रॅन्ड आहे. त्यामुळे केवळ धान न विकता तांदूळ बनवून विकावा, जवस न विकता त्याचे तेल, ढेप विकावे, कडधान्याची विक्री न करता दाळ काढून विकावी यातून मालाचे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो, असा सल्ला डॉ.कऱ्हाळे यांनी दिला.

१४०० शेतकरी गटांची निर्मिती

‘स्मार्ट’ योजनेंतर्गत जिल्ह्यात १४०० शेतकरी गटांची आणि २० शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी चालना दिली जात आहे. त्यासाठी नाबार्डकडून २ कोटी रुपयापर्यंत शेतकरी गटाला कर्ज देण्याची सुविधा आहे. त्या व्याजावर सवलत दिली जाते. याशिवाय आदिवासी विकास विभागाकडूनही शेतकऱ्यांसाठी अनुदानाची सोय आहे. आत्माच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण, क्षेत्रीय भेटी आणि प्रात्यक्षिकासाठी मदत केली जाते.