शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाबाधितांचा नवा उच्चांक, मृत्यूचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 05:00 IST

जिलह्यात करोना विषाणूचे संशयबाधित रुग्ण आढळल्यास त्यावर नियंत्रण होण्यासाठी तसेच संशयबाधित लोकांचे विलगीकरण करण्यासाठी राखीव विलगीकरण कक्षाकरिता इमारती अधिग्रहित केल्या आहेत. यात शासकीय मुलींची आश्रमशाळा अहेरी, एकलव्य स्कूल अहेरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची नवीन इमारत कोरची, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चामोर्शी यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देअवघ्या २४ तासात तब्बल ४३४ रुग्णांची भर, ११ जणांनी गमावले प्राण; जमावबंदीत आणि संचारबंदीचा परिणाम नाही

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वाढत्या काेराेनाच्या साथीला लगाम घालण्यासाठी मागील १० दिवसांपासून शासनामार्फत विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. यापूर्वी शनिवार व रविवारी कडक लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. तर आता संचारबंदी लावण्यात आली आहे. असे असतानाही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी सुमारे ४३४ बाधितांची भर पडली. आजपर्यंतचा हा उच्चांक आहे. तर मृत्यूचे सत्रही सुरूच असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या १४ हजार १९ झाली आहे. तर ११ हजार २४९ जणांनी काेराेनावर मात केली आहे.  २ हजार ५८५ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण १८५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. ११ नवीन मृत्यूंमध्ये गडचिरोली तालुक्यातील  कुरखेडा येथील ६४ वर्षीय पुरुष, आरमोरी तालुक्यातील कारागोटा ५६  वर्षीय महिला, आरमोरी येथील ६७ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, धानोरातील ५२ वर्षीय पुरुष,  चिमूर येथील ७२ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील ५० व ७५ वर्षीय दाेन पुरुष,  सिंदेवाही तालुक्यातील  ६१ वर्षीय पुरुष, गडचिराेली शहरातील गोकूलनगर येथील ५६ वर्षीय महिला, भंडारा तालुक्यातील कुडेगाव येथील ८७ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.  काेराेनाची साथ वाढत असताना नागरिक मात्र बिनधास्त रस्त्यांवर फिरत असल्याचे दिसून येते.

विलगीकरण कक्षाकरिता इमारती अधिग्रहितजिलह्यात करोना विषाणूचे संशयबाधित रुग्ण आढळल्यास त्यावर नियंत्रण होण्यासाठी तसेच संशयबाधित लोकांचे विलगीकरण करण्यासाठी राखीव विलगीकरण कक्षाकरिता इमारती अधिग्रहित केल्या आहेत. यात शासकीय मुलींची आश्रमशाळा अहेरी, एकलव्य स्कूल अहेरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची नवीन इमारत कोरची, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चामोर्शी यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक सिंगला यांनी निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यात जमावबंदी आदेश गडचिरोली : राज्यात पुन्हा कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सभा, मिरवणूक, लग्न समारंभ व यात्रा उत्सव यांच्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहेत. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. 

लग्नसमारंभात गर्दी आढळल्यास गुन्हा नाेंदविणार 

लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त २५ लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी असून याचे उल्लंघन केल्यास संबंधित वर-वधू, त्यांचे आई-वडील, मंगल-कार्यालय/लॉन/सभागृह मालक, कॅटरर्स यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हे नाेंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. तसेच गर्दीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

एप्रिलमधील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात कोरोना संसर्ग अधिक गतीने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला कार्यक्रमातील गर्दी कमी करण्याबाबत व नियमानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबत या अगोदरच सूचना करण्यात आल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या