शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आयुष्याच्या भ्रमंतीत असे थांबणे कधीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

संपूर्ण देश कोरोना विषाणू संसर्ग या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देत असताना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प पडले आहेत. सकाळी घणाचे घाव देऊन दिवसभर लोखंडाच्या शेती व संसारपयोगी बनविलेल्या विविध वस्तू विकून संध्याकाळी चूल पेटवायची. असा दिनक्रम परराज्यातील गाडीलोहार समाजातील लोकांचा आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । कोरोनाबंदीने पाय थबकले; रोजगारासाठी आलेल्या गाडी लोहार समाजाच्या लोकांपुढे संकट

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : बैलगाडीत बिºहाड, हातात काठी, अनवाणी पायांनी अंतर कापत गावाच्या वेशीवर मुक्काम ठोकायचा. तप्त झालेल्या लोखंडाला घनाचे दणादणा घाव घालायचे. शेती व संसारपयोगी लोखंडी साहित्य विकून आपला उदनिर्वाह करायचा, अशाप्रकारची जीवनशैली असलेल्या गाडीलोहार समाजाचे १० ते १५ कुटुंबासमोर कोरोना बंदीने मोठे संकट उभे केले आहे. संपूर्ण आयुष्यात भ्रमंती केली. मात्र अशाप्रकारचे थांबणे एकदाही आले नाही, असा अनुभव गाडीलोहार समाजाच्या लोकांनी सांगितला.संपूर्ण देश कोरोना विषाणू संसर्ग या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देत असताना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प पडले आहेत. सकाळी घणाचे घाव देऊन दिवसभर लोखंडाच्या शेती व संसारपयोगी बनविलेल्या विविध वस्तू विकून संध्याकाळी चूल पेटवायची. असा दिनक्रम परराज्यातील गाडीलोहार समाजातील लोकांचा आहे. मध्यप्रदेशातील इलामपूर येथील रहिवासी असलेल्या आठ ते दहा कुटुंब फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला कुरखेडा तालुक्याच्या कराडी गावात आले. तलाव परिसरातील या कुटुंबाच्या तात्पुरत्या झोपड्या आहेत. लोखंडापासून कुºहाड, विळे, तावे, नागराची फास व शेतीउपयोगी इतर साहित्य बनविण्याचे काम सदर लोक करतात.प्रशासकीय मदत पोहोचेनाकराडी गावात मध्यप्रदेशातून स्थलांतरित झालेले ८ ते १० कुटुंब व्यवसायाविना अडचणीत सापडले आहेत. कुठेही भटकायचे नाही, अशा सूचना तलाठ्यांनी या लोकांना दिल्या. पोलीस पाटलांनी कुरखेडा तहसीलदारांना या लोकांच्या परिस्थितीची माहिती दिली. मात्र प्रशासनाकडून त्यांना अजूनपर्यंत कोणतीही मदत करण्यात आली नाही.अशी परिस्थिती कधीही पाहिली नाहीलोखंडी वस्तू बनवून त्या विकून उदनिर्वाह करण्यासाठी महाराष्ट्रासह बऱ्याच राज्यात आजवर भटकंती केली. भ्रमंती करताकरताच आमच्या अनेक पिढ्या संपल्या. मात्र कोरोनासारख्या संकटाने जी परिस्थिती आणली ती कधीही निर्माण झाली नाही. अशी परिस्थिती आपण कधीही पाहिली नाही, असा अनुभव परराज्यातून आलेल्या गाडीलोहार समाजाच्या बिºहाडातील प्रमुख कैैलालसिंग ठाकूर यांनी लोकमतपुढे व्यक्त केला. या मोठ्या संकटातून परमेश्वर लवकरच सर्वांना मुक्त करेल, अशी पार्थना त्यांनी हात जोडून देवापुढे केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसjobनोकरी