शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अपघात टाळण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज

By admin | Updated: January 10, 2017 00:55 IST

देशामध्ये दरवर्षी वाढत चालले अपघात लक्षात घेता देशातील प्रत्येक नागरिकाने अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

महेश आव्हाड यांचे प्रतिपादन : २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभगडचिरोली : देशामध्ये दरवर्षी वाढत चालले अपघात लक्षात घेता देशातील प्रत्येक नागरिकाने अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वच बाबी प्रशासनावर सोडून चालणार नाही. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांमध्ये घट करणे शक्य आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २८ वा रस्ता सुरक्षा सप्ताह ९ ते २३ जानेवारीदरम्यान राबविला जात आहे. या सप्ताहाचा शुभारंभ ९ जानेवारी रोजी करण्यात आला. यानिमित्त इंदिरा गांधी चौकातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महेश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, जिल्हा परिवहन समिती सदस्य कृष्णा म्हस्के, कार्यकारी अभियंता कुंभार, डॉ. जितेंद्र गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.मार्गदर्शन करताना अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड म्हणाले, जपानमध्ये एक लाख नागरिकांमागे चार व्यक्ती, इंग्लडमध्ये तीन व्यक्ती व भारतात ११ व्यक्तींचा अपघातामध्ये मृत्यू होतो. इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात अपघाताचे प्रमाण व त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र अपघातांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरोगामी महाराष्ट्राला ही बाब शोभनिय नाही. ७५ टक्के अपघात वाहन चालकाच्या चुकीमुळे, पाच टक्के अपघात दुसऱ्या वाहनचालकांच्या चुकीमुळे तर तीन टक्के अपघात पादचारींमुळे होतात, असे मार्गदर्शन केले.एसडीपीओ डॉ. सागर कवडे म्हणाले, केवळ पंधरवडा सप्ताह साजरा करून चालणार नाही, तर वाहन चालवितेवेळी आपली जबाबदारी व कर्तव्य याचे भान वाहनचालकांनी ठेवले पाहिजे. वाहन चालविताना मद्यपान टाळावे, वेगाने वाहन चालविल्यास अपघाताची शक्यता वाढते. रात्रीचा प्रवास टाळावा, पावसाळ्यात वेगाने वाहन चालवू नये, अपघात झाल्यानंतर सदर व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल करावे, रुग्णालयात दाखल करणाऱ्या व्यक्तीला पोलीस त्रास देणार नाही, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आलापल्ली आयटीआयचे प्राचार्य सुरेश जोग, विजय काळबांधे, भास्कर मेश्राम, ठाणेदार विजय पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. कविता मोहोरकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)