शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसाठ्याचे संवर्धनाविषयी शिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:36 IST

नैसर्गिक संसाधनांचा मानव व संपूर्ण प्राणीमात्रांशी संबंध आहे. विकासक्रम निरंतर राहण्याकरिता जल, जमीन, जंगल या संसाधनांची गरज आहे. या परिसरात नैसगिक साठे भरपूर आहेत. भविष्याच्या पिढीसाठी जलसाठे कायम ठेवायचे असल्यास पाण्याच्या साठ्याचे संवर्धन व पुनर्भरण संदर्भात शिक्षणाची गरज आहे,..........

ठळक मुद्देकुलगुरूंचे प्रतिपादन : पाण्याचे पुनर्भरण व भूजल व्यवस्थापनावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : नैसर्गिक संसाधनांचा मानव व संपूर्ण प्राणीमात्रांशी संबंध आहे. विकासक्रम निरंतर राहण्याकरिता जल, जमीन, जंगल या संसाधनांची गरज आहे. या परिसरात नैसगिक साठे भरपूर आहेत. भविष्याच्या पिढीसाठी जलसाठे कायम ठेवायचे असल्यास पाण्याच्या साठ्याचे संवर्धन व पुनर्भरण संदर्भात शिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले आहे.जलसंसाधन मंत्रालय, केंद्रीय भूमीजल बोर्ड नागपूर व श्री गो. ना. मुनघाटे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण व भूजल व्यवस्थापन या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उद्घाटनिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू कल्याणकर बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून भूजल वैज्ञानिक केंद्रीय भूजल बोर्डाचे अधीक्षक डॉ.प्रभातकुमार जैन, प्राचाय डॉ. राजाभाऊ मुनघाटे, डॉ. भूषण लामसोगे, डॉ. गुणवंत वडपल्लीवार, उपप्राचार्य प्रा. पी. एस. खोपे, डॉ. संदीप निवडंगे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनिय भाषणादरम्यान मार्गदर्शन करताना अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, जिल्ह्यात नैसर्गिक बारमाही वाहणारे अधिक नद्या, नाले, झरणे आहेत. त्यासाठी सिंचनाची व्यवस्था नाही. येथून वाहणाऱ्या नदीवर नजिकच्या तेलंगणा राज्यात मोठा सिंचन प्रकल्प उभा होत आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधींना हे साध्य करता आले नाही, अशी खंत पोरेड्डीवार यांनी व्यक्त केली. डॉ. प्रभातकुमार जैन यांनी मार्गदर्शन करताना या देशात संसाधनांच्या तुलनेत लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे सिमीत असलेल्या पाण्याचे नियोजनबध्द ताळेबंद तयार करीत वापर होणे गरजेचे असल्याचे सांगितले.शेतकºयांकरिता पाच सत्रात आयोजित कार्यशाळेत केंद्रीय भूजल मध्यक्षेत्र नागपूर येथील वैज्ञानिक डॉ. हरीभाऊ काळे, डॉ. अश्विन आटे, डॉ. राहूल शेंडे, डॉ. नितीन झाडे, प्रशांत गोंगले, तुकेश सयाम, डॉ. भूषण लामसोगे यांनी भूजल पुनर्भरण, भूजल व्यवस्थापन, पाण्याचे टाळेबंद, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन, गरज व फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी मानले. मान्यवरांनी नवरगाव येथे भेट देऊन भूजल सर्वेक्षण तसेच बंधारा व्यवस्थापन यावर प्रात्यक्षिक सादर करून मार्गदर्शन केले.

टॅग्स :universityविद्यापीठ