शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसाठ्याचे संवर्धनाविषयी शिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:36 IST

नैसर्गिक संसाधनांचा मानव व संपूर्ण प्राणीमात्रांशी संबंध आहे. विकासक्रम निरंतर राहण्याकरिता जल, जमीन, जंगल या संसाधनांची गरज आहे. या परिसरात नैसगिक साठे भरपूर आहेत. भविष्याच्या पिढीसाठी जलसाठे कायम ठेवायचे असल्यास पाण्याच्या साठ्याचे संवर्धन व पुनर्भरण संदर्भात शिक्षणाची गरज आहे,..........

ठळक मुद्देकुलगुरूंचे प्रतिपादन : पाण्याचे पुनर्भरण व भूजल व्यवस्थापनावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : नैसर्गिक संसाधनांचा मानव व संपूर्ण प्राणीमात्रांशी संबंध आहे. विकासक्रम निरंतर राहण्याकरिता जल, जमीन, जंगल या संसाधनांची गरज आहे. या परिसरात नैसगिक साठे भरपूर आहेत. भविष्याच्या पिढीसाठी जलसाठे कायम ठेवायचे असल्यास पाण्याच्या साठ्याचे संवर्धन व पुनर्भरण संदर्भात शिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले आहे.जलसंसाधन मंत्रालय, केंद्रीय भूमीजल बोर्ड नागपूर व श्री गो. ना. मुनघाटे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण व भूजल व्यवस्थापन या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उद्घाटनिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू कल्याणकर बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून भूजल वैज्ञानिक केंद्रीय भूजल बोर्डाचे अधीक्षक डॉ.प्रभातकुमार जैन, प्राचाय डॉ. राजाभाऊ मुनघाटे, डॉ. भूषण लामसोगे, डॉ. गुणवंत वडपल्लीवार, उपप्राचार्य प्रा. पी. एस. खोपे, डॉ. संदीप निवडंगे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनिय भाषणादरम्यान मार्गदर्शन करताना अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, जिल्ह्यात नैसर्गिक बारमाही वाहणारे अधिक नद्या, नाले, झरणे आहेत. त्यासाठी सिंचनाची व्यवस्था नाही. येथून वाहणाऱ्या नदीवर नजिकच्या तेलंगणा राज्यात मोठा सिंचन प्रकल्प उभा होत आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधींना हे साध्य करता आले नाही, अशी खंत पोरेड्डीवार यांनी व्यक्त केली. डॉ. प्रभातकुमार जैन यांनी मार्गदर्शन करताना या देशात संसाधनांच्या तुलनेत लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे सिमीत असलेल्या पाण्याचे नियोजनबध्द ताळेबंद तयार करीत वापर होणे गरजेचे असल्याचे सांगितले.शेतकºयांकरिता पाच सत्रात आयोजित कार्यशाळेत केंद्रीय भूजल मध्यक्षेत्र नागपूर येथील वैज्ञानिक डॉ. हरीभाऊ काळे, डॉ. अश्विन आटे, डॉ. राहूल शेंडे, डॉ. नितीन झाडे, प्रशांत गोंगले, तुकेश सयाम, डॉ. भूषण लामसोगे यांनी भूजल पुनर्भरण, भूजल व्यवस्थापन, पाण्याचे टाळेबंद, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन, गरज व फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी मानले. मान्यवरांनी नवरगाव येथे भेट देऊन भूजल सर्वेक्षण तसेच बंधारा व्यवस्थापन यावर प्रात्यक्षिक सादर करून मार्गदर्शन केले.

टॅग्स :universityविद्यापीठ