शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

जाळपोळीतून नक्षल्यांचा अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न, कंत्राटदारासह गावकऱ्यांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2022 10:49 IST

भामरागडपासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या इरपनार गावात शुक्रवारी नक्षल्यांनी १५ ट्रॅक्टर्स, दोन जेसीबी व एक ग्रेडरगाडी जाळून टाकली होती.

ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान

गडचिरोली : जिल्ह्याच्या बऱ्याच भागात पोलिसांच्या नेटवर्कमुळे घातपाती कारवाया करणे शक्य होत नसलेल्या नक्षलींकडून छत्तीसगड सीमेकडील दुर्गम भागात आपले अस्तित्व शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शुक्रवारी दुपारी भामरागड तालुक्यातील इरपनार गावाजवळ केलेली रस्त्याच्या कामावरील वाहनांची जाळपाेळ त्याचाच एक भाग आहे. याशिवाय इतरही काही छुपी कारणे असण्याची शक्यता असून, पोलीस त्याबाबतचा तपास करीत आहे.

भामरागडपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या इरपनार गावात शुक्रवारी शसस्त्र नक्षलवाद्यांनी येऊन प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामावरील तब्बल ९ ट्रॅक्टर आणि २ जेसीबी वाहने जाळली. आपले अस्तित्व दाखविण्यासोबतच नक्षल्यांना हवी असलेली ‘रसद’ मिळाली नसल्याने त्यांनी हे कृत्य घडविल्याचे बोलले जाते. काम लवकर व्हावे म्हणून परिसरातील गावांमधील काही ट्रॅक्टर कंत्राटदाराने भाड्याने घेतले होते. ती वाहनेही नक्षल्यांच्या रोषाला बळी पडली.

कामे करायची तरी कशी?

यापूर्वीही अनेक वेळा दुर्गम भागात रस्ते, पुलाची कामे करताना नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली आहे. अलीकडे हा प्रकार थोडा कमी झाला होता. त्यामुळे दुर्गम भागातील विकासात्मक कामेही वाढली होती, पण आता छत्तीसगडमधील नक्षलींच्या बळावर पुन्हा नक्षली कारवाया वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने घेतलेली कामे करायची तरी कशी, असा प्रश्न कंत्राटदारांसह सरकारी यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादी