शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांकडून सहा महिन्यांसाठी युद्धविराम; बाह्य सुरक्षेला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 11:48 IST

करेगुट्टा अभियानात २६ नक्षल्यांचा खात्मा : सरकार आत्मसमर्पणावर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तीन राज्यांच्या सीमेवर करेगट्टा पहाडावर गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेले देशतील सर्वात मोठ माओवाद विरोधी अभियान आता सहा महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहे. २६ माओवाद्यांना या अभियानात कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले. विशेष म्हणजे सरकार आत्मसमर्पणावर ठाम आहे.

तीन राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्राच्या सीमेपासून ५० किलोमीटर अंतरावर करेगुट्टाचे मोठे पहाड आहे. १० हजार फूट किलोमीटर उंच असलेले करेगुट्टाच्या पहाडाला लागून अबूझमाड आणि इंद्रावती नॅशनल पार्क या दोन माओवाद्यांचेबलस्थानात अलीकडेच सुरक्षा दलांनी प्रवेश करून कॅम्प उभारल्याने काही वर्षापासून माओवाद्यांनी करेगुट्टा लगत असलेल्या परिसरात आपले वास्तव्याचे ठिकाण बनवले होते. या ठिकाणी माओवाद्यांनी एका महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात आयइडीची स्फोटके पेरून ठेवली असल्यामुळे गावकऱ्यांनी या भागात येऊ नये असं पत्र काढलं होतं. मोठ्या प्रमाणात माओवादी या ठिकाणी वास्तव्याला असल्यानेच माओवाद्यांनी हे पत्र काढल्याचे सुरक्षा दलांच्या लक्षात आले त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशातला सगळ्यात मोठं माओवाद विरोधी अभियान या ठिकाणी राबवण्याचा निर्णय छत्तीसगडच्या सुरक्षा दलाने घेतला. यात छत्तीसगड पोलीस डीआरजी यांच्यासह सीआरपीएफ कोब्रा बटालियनचे कमांडो मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या जवानांची संख्या २९ हजारांच्या जवळपास होती तर या अभियानात पहिल्यांदाच एमआय १७ या वायूदलाच्या हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. तसेच या अभियानात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ड्रोन चा वापरही करून माओवाद्यांची रेकी करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. जवानांनी या पहाडाला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले. पहिल्याच दिवशी झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार झाले होते.. दरम्यान गेल्या १६ दिवसांत माओवाद्यांनी पेरून ठेवलेली अडीचशे पेक्षा जास्त आयडीची स्फोटके सुरक्षा दलाने त्याच ठिकाणी निष्क्रिय केली. या दरम्यान दोन जवानांसह तीन सुरक्षा दलाचे या ठिकाणी आयइडीच्या स्फोटात जखमी झाले. तर माओवाद्यांच्या वास्तव्यासाठी असलेली मोठी गुफा ही जवानांनी शोधून काढली होती.. दोन दिवसांपूर्वी अभियानाच्या १५ व्या दिवशी जवान आणि माओवादी यांच्यात मोठी चकमक झाली आणि तब्बल २२ माओवद्यांना कंठस्नान घालण्यात यश आला आहे.

या पहाडावर माओवाद्यांची सर्वात मोठी आक्रमक असलेल्या बटालियनचे नेते हिडमा, देवा तेलंगाणा समितीचा प्रभारी दामोदर यांच्यासह दंडकारण्य झोनल समितीचे नेते आणि हजारच्या जवळपास माओवादी उपस्थित असल्याची सुरक्षा दलांकडे विश्वासनीया माहिती होती. त्यातूनच हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलं होतं. या अभियानावर केंद्रीय गृह मंत्रालयासह देशातल्या सगळ्या वरिष्ठ सुरक्षा एजन्सीची नजर होती.

जवानांनी त्या काळात नीलम शराय आणि धोबी पहाड हे दोन पहाड आपल्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर करेगटाच्या दिशेने जवानांची आगे कूच सुरू होते. आज १८ वा दिवस असताना ९ रोजी संध्याकाळपासूनच जवानांना परत येण्याचे निर्देश देण्यात आले.

बाह्य सुरक्षेला प्राधान्यभारत-पाक सीमेवर ज्या पद्धतीने थुमचक्री सुरू आहे. ते पाहता सरकारने बाह्य सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना माघारी येण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती एका वरिष्ठ उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. सीआरपीएफ आणि इतर निमलष्करी दलाचे जवान मुख्यालय परतण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या माओवाद्यांच्या विरोधातलं हे अभियान थांबले असले तरी भविष्यात परत एकदा हे मोठा अभियान सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली