शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली सावटात पर्यटन हरविले

By admin | Updated: March 30, 2015 01:26 IST

गडचिरोली हा राज्यातील मागास जिल्हा आहे. ८० टक्के जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात वनपर्यटनाला मोठा वाव आहे. अनेक चांगले पर्यटनस्थळ जंगलाच्या कुशीत दडलेले आहेत.

गडचिरोली : गडचिरोली हा राज्यातील मागास जिल्हा आहे. ८० टक्के जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात वनपर्यटनाला मोठा वाव आहे. अनेक चांगले पर्यटनस्थळ जंगलाच्या कुशीत दडलेले आहेत. जुने प्राचिन किल्लेसुध्दा जिल्ह्यात आहेत. मात्र याच्या देखभाल दुरूस्तीकडे जेवढे दुर्लक्ष आहे. तेवढेच दुर्लक्ष गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकडे आजवर शासनाचे झाले आहे. चांगले पर्यटनस्थळ असूनही नक्षलवाद्यांच्या दहशतीपोटी नागरिक या भागात भेटी देण्यास कानाडोळा करतात, असे दिसून आले आहे. काही पुण्या, मुंबईकडील पर्यटक व विदेशी पर्यटक सध्या लोकबिरादरी प्रकल्प व सर्चला मात्र भेटी देत असल्याचे दिसून येते.जिल्ह्याचा दुर्लक्षित भाग असलेल्या भामरागड तालुक्यात बिनागुंडा हे थंड हवेचे ठिकाण. परंतु महाराष्ट्राच्या अन्य पर्यटन स्थळाकडे वळणारे पर्यटकांचे पावले या भागात येण्यासाठी नेहमीच अडखळतात. यामागे प्रमुख कारण म्हणजे, या भागाची नक्षल भाग म्हणून असलेली देशभर ओळख. भामरागड हा महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेला लागून असलेला शेवटचा तालुका. या भागात निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. बाराही महिने वाहणारा राजरप्पी धबधबा या हा भागाचा वैभव. बिनागुंडा परिसराला भेट देऊन गेलेल कधीही राजरप्पी धबधब्याला विसरणार नाही इतके सुंदर असलेले हे ठिकाण. या भागात आदिवासीची दुर्मिळ जमात म्हणून ओळखले जाणारे बडामाडीया मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. शेती हा त्यांचा उपजिविकेचा मुख्य व्यवसाय आपल्या घरी असलेल्या झाडूसाठी लागणारे उच्च प्रतीचे गवत या भागात उत्पन्न होते. पर्यटन व्यवसायाला प्रचंड वाव या ठिकाणी आहे. परंतु अडचण आहे ती नक्षल दहशतीमुळे या भागाकडे पावले न वळविणाऱ्या पर्यटकांची. या भागातील आदिवासी अत्यंत मेहनती आहे. पर्यटकांना आस्वाद देण्यासाठी आदिवासींचे खास पेय असलेला गोरगा येथे तयार केले जाते. आदिवासी त्याला आपले बिअर पेय समजतात. भामरागड परिसरात ३० रूपयाला एक बॉटल या दराने हे पेय विकले जाते. गोरगा मालक वर्षाला चार महिन्यात एका झाडापासून किमान दीड लाख रूपये या भरवशावर कमवितात. पिणाऱ्यांची संख्या जर भरपूर राहिली तर आदिवासींचे अर्थकारणच बदलून जाऊ शकते, ऐवढी ताकद या भागाच्या पर्यटन सौंदर्यात आहे. परंतु नक्षल्याच्या दहशतीमुळे या पर्यटन स्थळाकडे पर्यटकांची तर पाठ आहेच शिवाय राज्य शासनाचेही या भागाच्या विकासाकडे कमालिचे दुर्लक्ष आहे. या भागात जाण्यासाठी साधा रस्ता नाही. दरवर्षी कोट्यावधी रूपयाचा निधी जिल्हा विकासासाठी येतो. परंतु यातून बिनागुंडा भागाचा विकास करावा, असे सरकारला अद्याप वाटलेले नाही. रस्ते व इतर सुविधा निर्माण झाल्यास पर्यटक निश्चितच या भागात येतील. परंतु या दृष्टीने आजपर्यंत कधीही प्रयत्न होत नाही, असे दिसून आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आठ गावांचा समूह बिनागुंडाईशान्य भारताला सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखले जाते. गडचिरोली जिल्ह्याचा भामरागड तालुक्यातील आठ गावांचा समूह असलेला बिनागुंडा भाग निसर्गरम्य परिसर आहे. या भागात मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असला तरी बिनागुंडा, कुव्वाकोडी, फोदेवाडा, कुर्रेमर्का, हामनमक्का, पुंगासूर, पेरमिल, भट्टी हे आठ गावे या आठ गावांचा एकमेकांशी रोटीबेटी संबंध आहे. सात डोंगर चढून सहा तास २० किमीचे अंतर लाहेरीवरून या भागात जाण्यासाठी आहे. परंतु आजवर स्थानिक लोकांशिवाय कुठलेही पर्यटक या भागाकडे वळलेले नाहीत.