शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

नक्षली सावटात पर्यटन हरविले

By admin | Updated: March 30, 2015 01:26 IST

गडचिरोली हा राज्यातील मागास जिल्हा आहे. ८० टक्के जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात वनपर्यटनाला मोठा वाव आहे. अनेक चांगले पर्यटनस्थळ जंगलाच्या कुशीत दडलेले आहेत.

गडचिरोली : गडचिरोली हा राज्यातील मागास जिल्हा आहे. ८० टक्के जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात वनपर्यटनाला मोठा वाव आहे. अनेक चांगले पर्यटनस्थळ जंगलाच्या कुशीत दडलेले आहेत. जुने प्राचिन किल्लेसुध्दा जिल्ह्यात आहेत. मात्र याच्या देखभाल दुरूस्तीकडे जेवढे दुर्लक्ष आहे. तेवढेच दुर्लक्ष गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकडे आजवर शासनाचे झाले आहे. चांगले पर्यटनस्थळ असूनही नक्षलवाद्यांच्या दहशतीपोटी नागरिक या भागात भेटी देण्यास कानाडोळा करतात, असे दिसून आले आहे. काही पुण्या, मुंबईकडील पर्यटक व विदेशी पर्यटक सध्या लोकबिरादरी प्रकल्प व सर्चला मात्र भेटी देत असल्याचे दिसून येते.जिल्ह्याचा दुर्लक्षित भाग असलेल्या भामरागड तालुक्यात बिनागुंडा हे थंड हवेचे ठिकाण. परंतु महाराष्ट्राच्या अन्य पर्यटन स्थळाकडे वळणारे पर्यटकांचे पावले या भागात येण्यासाठी नेहमीच अडखळतात. यामागे प्रमुख कारण म्हणजे, या भागाची नक्षल भाग म्हणून असलेली देशभर ओळख. भामरागड हा महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेला लागून असलेला शेवटचा तालुका. या भागात निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. बाराही महिने वाहणारा राजरप्पी धबधबा या हा भागाचा वैभव. बिनागुंडा परिसराला भेट देऊन गेलेल कधीही राजरप्पी धबधब्याला विसरणार नाही इतके सुंदर असलेले हे ठिकाण. या भागात आदिवासीची दुर्मिळ जमात म्हणून ओळखले जाणारे बडामाडीया मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. शेती हा त्यांचा उपजिविकेचा मुख्य व्यवसाय आपल्या घरी असलेल्या झाडूसाठी लागणारे उच्च प्रतीचे गवत या भागात उत्पन्न होते. पर्यटन व्यवसायाला प्रचंड वाव या ठिकाणी आहे. परंतु अडचण आहे ती नक्षल दहशतीमुळे या भागाकडे पावले न वळविणाऱ्या पर्यटकांची. या भागातील आदिवासी अत्यंत मेहनती आहे. पर्यटकांना आस्वाद देण्यासाठी आदिवासींचे खास पेय असलेला गोरगा येथे तयार केले जाते. आदिवासी त्याला आपले बिअर पेय समजतात. भामरागड परिसरात ३० रूपयाला एक बॉटल या दराने हे पेय विकले जाते. गोरगा मालक वर्षाला चार महिन्यात एका झाडापासून किमान दीड लाख रूपये या भरवशावर कमवितात. पिणाऱ्यांची संख्या जर भरपूर राहिली तर आदिवासींचे अर्थकारणच बदलून जाऊ शकते, ऐवढी ताकद या भागाच्या पर्यटन सौंदर्यात आहे. परंतु नक्षल्याच्या दहशतीमुळे या पर्यटन स्थळाकडे पर्यटकांची तर पाठ आहेच शिवाय राज्य शासनाचेही या भागाच्या विकासाकडे कमालिचे दुर्लक्ष आहे. या भागात जाण्यासाठी साधा रस्ता नाही. दरवर्षी कोट्यावधी रूपयाचा निधी जिल्हा विकासासाठी येतो. परंतु यातून बिनागुंडा भागाचा विकास करावा, असे सरकारला अद्याप वाटलेले नाही. रस्ते व इतर सुविधा निर्माण झाल्यास पर्यटक निश्चितच या भागात येतील. परंतु या दृष्टीने आजपर्यंत कधीही प्रयत्न होत नाही, असे दिसून आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आठ गावांचा समूह बिनागुंडाईशान्य भारताला सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखले जाते. गडचिरोली जिल्ह्याचा भामरागड तालुक्यातील आठ गावांचा समूह असलेला बिनागुंडा भाग निसर्गरम्य परिसर आहे. या भागात मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असला तरी बिनागुंडा, कुव्वाकोडी, फोदेवाडा, कुर्रेमर्का, हामनमक्का, पुंगासूर, पेरमिल, भट्टी हे आठ गावे या आठ गावांचा एकमेकांशी रोटीबेटी संबंध आहे. सात डोंगर चढून सहा तास २० किमीचे अंतर लाहेरीवरून या भागात जाण्यासाठी आहे. परंतु आजवर स्थानिक लोकांशिवाय कुठलेही पर्यटक या भागाकडे वळलेले नाहीत.