शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नक्षल्यांनी जाळली रस्ता बांधकामावरील १६ वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 21:00 IST

  गडचिरोली - नक्षलवाद्यांकडून रविवारपासून पाळल्या जाणा-या पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी) सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत ...

 गडचिरोली - नक्षलवाद्यांकडून रविवारपासून पाळल्या जाणा-या पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी) सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत रस्ता बांधकामावर असलेली १६ वाहने जाळली. रस्ता बांधकामाला तसेच सुरजागड लोहखाणीला विरोध म्हणून हे कृत्य करून कोट्यवधी रुपयांची हाणी करण्यात आली. ही घटना शुक्रवारच्या रात्री घडली.

प्राप्त माहितीनुसार, आलापल्लीपासून ११ किलोमीटरवर असलेल्या वट्टेगट्टा ते गट्टेपल्ली या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खडीकरणाचे काम एका कंत्राटदार कंपनीकडून सुरू होते. शुक्रवारी हे खडीकरणाचे काम संपणार होते. दरम्यान दुपारी ३.३० च्या सुमारास काही महिला नक्षलींसह ८ ते १० नक्षलवाद्यांनी तिथे येऊन सदर बांधकामावरील मजुरांकडून त्यांच्याकडे असलेले मोबाईल फोन हिसकावून घेतले. त्यानंतर त्या कामाववील १० पोकलॅन, ५ ट्रॅक्टर जेसीबी आणि एक ४०७ मालवाहू वाहन अशी एकूण १६ वाहने रस्त्याच्या कामापासून ३ किलोमीटर लांब रेगडी मार्गावरील जंगलाजवळ नेली आणि त्या वाहनांसाठी टाक्यांमध्ये ठेवलेले डिझेल शिंपडून ती वाहने पेटवून दिली. सायंकाळी ६ पासून रात्री ८ वाजेपर्यंत वाहने पेटविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे सर्व १६ वाहने पूर्णपणे जळाली. शनिवारी सकाळपर्यंत या वाहनांमधील आग धुमसत होती. यातील काही वाहने राजस्थान पासिंगची होती तर काही महाराष्टÑाची होती. या वाहनांची एकूण किंमत ४ कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी या नक्षलवाद्यांनी गावात येऊन बैठक घेऊन सदर कामाला विरोध असल्याचे गावकºयांना बजावले. शुक्रवारी सकाळी मजुरांची सुटका झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक १० चे हे कृत्य असल्याचे कळते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, एटापल्लीचे एसडीपीओ किरणकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी हालेवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल काळे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली