शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

आबांंमुळे नक्षलवाद नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून रूळलेला नक्षलवाद नियंत्रणात आणण्याचे काम केवळ कायदा व सुव्यवस्थेने शक्य नव्हते. विकासाचा अभाव आणि मागासलेपण हे या समस्येचे मूळ आहे. त्याचा फायदा घेत काही शक्तींनी आपले प्रस्थ वाढविले. पण आर.आर.पाटलांनी स्वत:हून या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून कोट्यवधी रुपयांची कामे या जिल्ह्यात घडवून आणली. ...

ठळक मुद्देपवारांचे प्रशंसोद्गार : राष्टÑवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून रूळलेला नक्षलवाद नियंत्रणात आणण्याचे काम केवळ कायदा व सुव्यवस्थेने शक्य नव्हते. विकासाचा अभाव आणि मागासलेपण हे या समस्येचे मूळ आहे. त्याचा फायदा घेत काही शक्तींनी आपले प्रस्थ वाढविले. पण आर.आर.पाटलांनी स्वत:हून या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून कोट्यवधी रुपयांची कामे या जिल्ह्यात घडवून आणली. जिल्ह्याचे पालकत्व गांभीर्याने घेऊन विकासाच्या वाटेवर आणले, म्हणून येथील अनेक समस्या नियंत्रणात आल्या, असे प्रशंसोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा समन्वयिका भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी, या जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला गोदावरी नदीवरील पूल आणि आबांनी केलेल्या इतर कामांचाही आवर्जुन उल्लेख केला. यावेळी त्यांनी राष्टÑीय कृषी धोरणावरही टीका केली. कृषी विकासाचा दर ३.१५ टक्के आहे. तो ८ टक्के असायला पाहिजे. राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात नाही. नागपूरसारख्या शहरात क्राईम रेट वाढला आहे. पण गृहखाते स्वत:कडे ठेवलेले मुख्यमंत्री त्यावर काहीही बोलायला तयार नाही. ही असंवेदनशिलता असल्याचे ते म्हणाले. शेतकºयांची क्रयशक्ती सुधारण्यासाठी शेतमालाला योग्य भाव देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शेतीच्या क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याची गरज पवार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली.पत्रपरिषदेनंतर अभिनव लॉनमध्ये झालेल्या जाहीर सभेतही पवारांनी इतर महापुरूषांसोबत दिल्लीतील संसदेच्या आवारात बिरसा मुंंडा यांचा पुतळा लावल्याचे आवर्जुन सांगितले. स्व.आर.आर. पाटील यांचे कार्य पाहता या जिल्ह्यात त्यांचा पुतळा उभारण्याचा मानस धर्मरावबाबांनी बोलून दाखविला. त्या पुतळ्याच्या अनावरणाला मी येणार, असेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख आपल्या भाषणात आर.आर.पाटलांच्या कामांचा उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणात माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या सरकारने ओबीसींचे आरक्षण १९ व ६ टक्के केल्याचा प्रश्न तसेच जिल्ह्यातील सिंचनाच्या सुविधांकडे पवार यांचे लक्ष वेधले. भाग्यश्री आत्राम यांनीही आपल्या भाषणात पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दिलेल्या महिला आरक्षणामुळेच आज माझ्यासारखी महिला जि.प.अध्यक्ष किंवा सभापती होऊ शकल्याचे सांगितले.सुरूवातीला क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेसमोर अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वालन करण्यात आले. तसेच सर्व पाहुण्यांचे बांबूपासून बनविलेली आदिवासींची पारंपरिक टोपी आणि तीरकमान देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने भलामोठा तिरंगी फुलांचा हार घालून शरद पवारांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी तर संचालन रिंकू पापळकर यांनी केले.पवारांच्या हस्ते रक्तदात्यांचा गौरवजिल्ह्याच्या काही युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘गडचिरोली जिल्हा रक्तपेढी’ या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप तयार करून जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात रक्तपुरवठा करण्याचे कार्य डिसेंबर २०१६ पासून सुरू केले. त्या युवकांचा बुधवारी शरद पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रक्तपुरवठा करणाºया युवकांपैकी निलेश पटले, अक्षय भिष्णूरकर, लिलाधर भरडकर, सौरभ भडांगे, भूषण फरांडे, आशिष म्हशाखेत्री, पंकज फुलबांधे या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपचे मार्गदर्शक रविंद्र वासेकर, रिंकू पापडकर, अजय कुंभारे आदी उपस्थित होते. या गौरवाने युवकांना आणखी प्रेरणा मिळेल व आणखी जोमाने हा ग्रूप रक्तदानाचे श्रेष्ठ कार्य पुढे करणार, अशी ग्वाही यावेळी युवकांनी दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार