शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आबांंमुळे नक्षलवाद नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून रूळलेला नक्षलवाद नियंत्रणात आणण्याचे काम केवळ कायदा व सुव्यवस्थेने शक्य नव्हते. विकासाचा अभाव आणि मागासलेपण हे या समस्येचे मूळ आहे. त्याचा फायदा घेत काही शक्तींनी आपले प्रस्थ वाढविले. पण आर.आर.पाटलांनी स्वत:हून या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून कोट्यवधी रुपयांची कामे या जिल्ह्यात घडवून आणली. ...

ठळक मुद्देपवारांचे प्रशंसोद्गार : राष्टÑवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून रूळलेला नक्षलवाद नियंत्रणात आणण्याचे काम केवळ कायदा व सुव्यवस्थेने शक्य नव्हते. विकासाचा अभाव आणि मागासलेपण हे या समस्येचे मूळ आहे. त्याचा फायदा घेत काही शक्तींनी आपले प्रस्थ वाढविले. पण आर.आर.पाटलांनी स्वत:हून या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून कोट्यवधी रुपयांची कामे या जिल्ह्यात घडवून आणली. जिल्ह्याचे पालकत्व गांभीर्याने घेऊन विकासाच्या वाटेवर आणले, म्हणून येथील अनेक समस्या नियंत्रणात आल्या, असे प्रशंसोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा समन्वयिका भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी, या जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला गोदावरी नदीवरील पूल आणि आबांनी केलेल्या इतर कामांचाही आवर्जुन उल्लेख केला. यावेळी त्यांनी राष्टÑीय कृषी धोरणावरही टीका केली. कृषी विकासाचा दर ३.१५ टक्के आहे. तो ८ टक्के असायला पाहिजे. राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात नाही. नागपूरसारख्या शहरात क्राईम रेट वाढला आहे. पण गृहखाते स्वत:कडे ठेवलेले मुख्यमंत्री त्यावर काहीही बोलायला तयार नाही. ही असंवेदनशिलता असल्याचे ते म्हणाले. शेतकºयांची क्रयशक्ती सुधारण्यासाठी शेतमालाला योग्य भाव देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शेतीच्या क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याची गरज पवार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली.पत्रपरिषदेनंतर अभिनव लॉनमध्ये झालेल्या जाहीर सभेतही पवारांनी इतर महापुरूषांसोबत दिल्लीतील संसदेच्या आवारात बिरसा मुंंडा यांचा पुतळा लावल्याचे आवर्जुन सांगितले. स्व.आर.आर. पाटील यांचे कार्य पाहता या जिल्ह्यात त्यांचा पुतळा उभारण्याचा मानस धर्मरावबाबांनी बोलून दाखविला. त्या पुतळ्याच्या अनावरणाला मी येणार, असेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख आपल्या भाषणात आर.आर.पाटलांच्या कामांचा उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणात माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या सरकारने ओबीसींचे आरक्षण १९ व ६ टक्के केल्याचा प्रश्न तसेच जिल्ह्यातील सिंचनाच्या सुविधांकडे पवार यांचे लक्ष वेधले. भाग्यश्री आत्राम यांनीही आपल्या भाषणात पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दिलेल्या महिला आरक्षणामुळेच आज माझ्यासारखी महिला जि.प.अध्यक्ष किंवा सभापती होऊ शकल्याचे सांगितले.सुरूवातीला क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेसमोर अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वालन करण्यात आले. तसेच सर्व पाहुण्यांचे बांबूपासून बनविलेली आदिवासींची पारंपरिक टोपी आणि तीरकमान देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने भलामोठा तिरंगी फुलांचा हार घालून शरद पवारांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी तर संचालन रिंकू पापळकर यांनी केले.पवारांच्या हस्ते रक्तदात्यांचा गौरवजिल्ह्याच्या काही युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘गडचिरोली जिल्हा रक्तपेढी’ या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप तयार करून जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात रक्तपुरवठा करण्याचे कार्य डिसेंबर २०१६ पासून सुरू केले. त्या युवकांचा बुधवारी शरद पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रक्तपुरवठा करणाºया युवकांपैकी निलेश पटले, अक्षय भिष्णूरकर, लिलाधर भरडकर, सौरभ भडांगे, भूषण फरांडे, आशिष म्हशाखेत्री, पंकज फुलबांधे या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपचे मार्गदर्शक रविंद्र वासेकर, रिंकू पापडकर, अजय कुंभारे आदी उपस्थित होते. या गौरवाने युवकांना आणखी प्रेरणा मिळेल व आणखी जोमाने हा ग्रूप रक्तदानाचे श्रेष्ठ कार्य पुढे करणार, अशी ग्वाही यावेळी युवकांनी दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार