शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

‘त्या’ नक्षल चकमकी बनावट? सत्यशोधन समितीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 20:49 IST

गेल्या २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली.

गडचिरोली : गेल्या २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली, असा आरोप सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत सोमवारी दिनांक ७ मे रोजी केला आहे.

सत्यशोधन समितीमध्ये  मानवाधिकार संदर्भात काम करणाऱ्या विविध संघटनाच्या ४४ सदस्यांचा समावेश होता. त्यांनी दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात फिरून या चकमकी संदर्भातील सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात कसनासूर जंगलात चकमक घडलीच नाही. तर पोलिसांनी मृतकांना चारही बाजुने घेरून त्यांच्यावर हॅन्ड ग्रेनेड व लॉन्चर फेकले. त्याचबरोबर चारही बाजुने फायरींग झाली. मृतकांनी मात्र फायरींग केली नाही. त्यामुळे याला चकमक म्हणणे चुकीचे असून ही एक प्रकारची सामुहिक हत्या आहे, असा आरोप समिती सदस्यांनी केला. जे लोक मारले गेले, त्यामध्ये काही गावकऱ्यांचासुध्दा समावेश आहे. पोलिसांनीसुध्दा त्यांना बेपत्ता दाखविले आहे. २२ एप्रिलच्या चकमकीत नक्षल कमांडर नंदू व त्याच्या इतर सहा साथीदारांना पोलिसांनी जिवंत पकडले व नंदूकडून नक्षल्यांनी राजाराम जंगलात साठवून ठेवलेला पैसा शोधून काढल्यानंतर त्याच्यावर व इतर साथीदारांवर गोळ्या झाडल्याचे समितीचे सदस्य म्हणाले. ४० मृतदेहांपैकी केवळ दोघांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्याचे डॉक्टरांनी समिती सदस्यांना सांगितल्याचे ते म्हणाले. बोरीया गावातील नागरिक पोलिसांच्या प्रचंड दबावात आहेत. त्यामुळे ते बोलण्यास तयार नसल्याचे सांगितले. सदर चकमक बनावट असून पोलिसांनी संबंधिताची निघृण हत्या केली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह संबंधित पोलिसांवर भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. या प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे, अशी माहिती समिती सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेला आशिष गुप्ता, एन. नारायणराव, व्ही. रघुनाथ, क्रांती चैतन्य, एन. गंगाधर, डॉ. महेश कोपुलवार, अमोल मारकवार, जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसू नागोटी यांच्यासह सर्वच सदस्य उपस्थित होते.या आरोपांसंदर्भात पोलीस उपमहानिरिक्षक अंकूश शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, हे आरोप बिनबुडाचे असून सत्यावर आधारीत नसल्याचे सांगितले. मृत नक्षल्यांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्या असून तसा शवविच्छेदन अहवालही असल्याचे सांगितले.

नक्षल पीडितांची नारेबाजीसत्यशोधन समितीचे सदस्य भामरागड तालुक्यातील बोरीया या गावात गेले असता, नक्षल पीडित कुटुंबांनी या सत्यशोधन समितीचा निषेध केला. मागण्यांचे निवेदन सुध्दा सत्यशोधन समितीला सादर केले. नक्षल्यांकडून अनेक नि:ष्पाप नागरिकांची हत्या केली जाते. त्यावेळी सत्य शोधण्याचा प्रयत्न या समितीकडून का केला जात नाही, असा प्रश्न नक्षल पीडित नागरिकांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे जे सत्य आहे ते समोर येईलच. त्यानुसार कारवाई केली जाईल. सोबतच एनएचआरसीला रिपोर्ट पाठविल्या जाईल.- डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली