शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

२५३ गावांना ‘नवसंजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक ७३ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ५९, अहेरी तालुक्यातील ५७, सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा तालुक्यातील ३२ तर मुलचेरा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देपावसाळापूर्व नियोजन : ७० टक्के गावांमध्ये पोहोचले चार महिन्यांचे धान्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील २५३ गावांचा संपर्क तुटणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन करणे सुरू आहे. त्याअंतर्गत संबंधित गावातील नागरिकांसाठी नवसंजीवनी योजनेअंतर्गत चार महिन्यांच्या धान्य पुरवठ्याची सोय आधीच केली जात आहे. आतापर्यंत ७० टक्के गावांपर्यंत सदर धान्याचा पुरवठा झाला आहे.पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक ७३ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ५९, अहेरी तालुक्यातील ५७, सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा तालुक्यातील ३२ तर मुलचेरा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. या ६ तालुक्यातील १२७ रेशन दुकानांमार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना गहू आणि तांदळाचा पुरवठा केला जातो. आतापर्यंत जवळपास ८० दुकानांमध्ये हे धान्य पोहोचल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.पावसाळ्यात अनेक नदी-नाले भरभरून वाहतात. त्या नाल्यांवर पूल नसल्यामुळे नाल्यातून मार्ग काढत पलिकडच्या गावांमध्ये पोहोचणे कठीण होते. चारचाकी वाहन तर दूर, दुचाकी वाहनही चालू शकत नाही. यामुळे त्या गावांचा संपर्क तुटतो. अशावेळी तेथील नागरिकांना रेशनचा गहू आणि तांदूळ मिळावा म्हणून नवसंजीवनी योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना निर्धारित नियतव्ययानुसार चार महिन्यांचे धान्य एकाचवेळी दिले जाते. पावसाळ्यातील ही दैनावस्था दूर होण्याची प्रतीक्षा त्यांना आहे.औषधीही पोहोचविणारधान्यासोबत नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास गावातच औषधी मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये पुरेसा औषधीसाठा पुरविला जात आहे. अंगणवाड्यांमार्फत आहार पुरवठाही केला जात आहे.११ हजार क्विंटल धान्य पुरविणारअंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील तांदूळ मिळून एकूण २३६४ क्विंटल गहू आणि ८६९४ क्विंटल तांदूळ पुरवठा केला जाणार आहे. दोन्ही प्रकारचे धान्य मिळून ११ हजार ५८ क्विंटल धान्य पुरवठा होणार आहे. त्यापैकी ७० टक्के माल रेशन दुकानांपर्यंत पोहोचला आहे. पावसाळ्याला सुरूवात होण्याआधीच सर्व धान्यांचे वाटप लाभार्थ्यांना होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक