शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२५३ गावांना ‘नवसंजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक ७३ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ५९, अहेरी तालुक्यातील ५७, सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा तालुक्यातील ३२ तर मुलचेरा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देपावसाळापूर्व नियोजन : ७० टक्के गावांमध्ये पोहोचले चार महिन्यांचे धान्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील २५३ गावांचा संपर्क तुटणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन करणे सुरू आहे. त्याअंतर्गत संबंधित गावातील नागरिकांसाठी नवसंजीवनी योजनेअंतर्गत चार महिन्यांच्या धान्य पुरवठ्याची सोय आधीच केली जात आहे. आतापर्यंत ७० टक्के गावांपर्यंत सदर धान्याचा पुरवठा झाला आहे.पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक ७३ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ५९, अहेरी तालुक्यातील ५७, सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा तालुक्यातील ३२ तर मुलचेरा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. या ६ तालुक्यातील १२७ रेशन दुकानांमार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना गहू आणि तांदळाचा पुरवठा केला जातो. आतापर्यंत जवळपास ८० दुकानांमध्ये हे धान्य पोहोचल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.पावसाळ्यात अनेक नदी-नाले भरभरून वाहतात. त्या नाल्यांवर पूल नसल्यामुळे नाल्यातून मार्ग काढत पलिकडच्या गावांमध्ये पोहोचणे कठीण होते. चारचाकी वाहन तर दूर, दुचाकी वाहनही चालू शकत नाही. यामुळे त्या गावांचा संपर्क तुटतो. अशावेळी तेथील नागरिकांना रेशनचा गहू आणि तांदूळ मिळावा म्हणून नवसंजीवनी योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना निर्धारित नियतव्ययानुसार चार महिन्यांचे धान्य एकाचवेळी दिले जाते. पावसाळ्यातील ही दैनावस्था दूर होण्याची प्रतीक्षा त्यांना आहे.औषधीही पोहोचविणारधान्यासोबत नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास गावातच औषधी मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये पुरेसा औषधीसाठा पुरविला जात आहे. अंगणवाड्यांमार्फत आहार पुरवठाही केला जात आहे.११ हजार क्विंटल धान्य पुरविणारअंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील तांदूळ मिळून एकूण २३६४ क्विंटल गहू आणि ८६९४ क्विंटल तांदूळ पुरवठा केला जाणार आहे. दोन्ही प्रकारचे धान्य मिळून ११ हजार ५८ क्विंटल धान्य पुरवठा होणार आहे. त्यापैकी ७० टक्के माल रेशन दुकानांपर्यंत पोहोचला आहे. पावसाळ्याला सुरूवात होण्याआधीच सर्व धान्यांचे वाटप लाभार्थ्यांना होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक