शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वनतलावांमुळे जनावरांना नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:24 IST

दरवर्षी उन्हाळ्यात नदी, नाले आटत असल्याने रानटी प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. अनेक प्राणी कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार होतात. वन्यप्राण्यांचा त्रासही लोकांना होतो. ही बाब जाणून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील जंगलात अनेक ठिकाणी वनतलावाचे खोदकाम मागील वर्षी करण्यात आले.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजना : बारसेवाडा-चंदनवेली जंगलात मागील वर्षी केले खोदकाम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : दरवर्षी उन्हाळ्यात नदी, नाले आटत असल्याने रानटी प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. अनेक प्राणी कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार होतात. वन्यप्राण्यांचा त्रासही लोकांना होतो. ही बाब जाणून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील जंगलात अनेक ठिकाणी वनतलावाचे खोदकाम मागील वर्षी करण्यात आले. सध्या या तलावांमध्ये भरपूर पाणी असल्याने जनावरांसाठी एकप्रकारची संजीवनी मिळाली आहे.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मागील वर्षी एटापल्ली तालुक्यात भामरागड वनविभागाच्या पेरमिली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत वनतलावाचे खोदकाम करण्यात आले. बारसेवाडा ते चंदनवेली जंगलात वनतलावांचे खोदकाम करण्यात आले. सध्या या तलावामध्ये भरपूर प्रमाणात पाणी दिसून येते. तालुक्यातील नाले, लहान नद्या मार्च महिन्यातच आटल्या. तलाव, बोड्याही कोरड्या पडल्या. या भागातील हातपंप व विहिरीतील जलपातळी झपाट्याने घटली आहे. तालुक्यातील जंगलात मोजक्याच प्रमाणात वनतळे होते. परंतु मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी वनतलाव खोदण्यात आले.बारसेवाडा ते चंदनवेली जंगलात अनेक ठिकाणी अशाप्रकारचे वनतलाव दिसून येतात. या तलावामुळे जंगलातील प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. याशिवाय दिवसा परिसरातील पाळीव जनावरे पाणी पितात. जलपातळी वाढविण्याच्या मुख्य हेतूने निर्माण करण्यात आलेले वनतलाव या भागातील पाळीव व रानटी जनावरांना नवसंजीवनी ठरत आहेत. वनविभागाने पुन्हा अशाप्रकारच्या वनतलावाची निर्मिती तालुक्यातील जंगलात करावी, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणी