शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:32 IST

जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे,.....

ठळक मुद्देखोदतळ्यात टंँकरद्वारे पाणीसाठा : वन विभागाकडून वन्यजीवांसाठी केली जात आहे सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे, अशा ठिकाणी खोदतळ्यात व कोरडे पडलेल्या पाणवठ्यात वन विभागामार्फत टँकरद्वारे पाणीसाठा केला जात आहे.आरमोरी वन परिक्षेत्रातील अरसोडा, कासवी, रवी, वैरागड, डोंगरतमाशी व इतर वनक्षेत्रात साधारणपणे ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे, त्या परिक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठ्यात तसेच स्वनिर्मित खोदतळ्यात आरमोरी वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी टँकरद्वारे पाणीसाठा करीत आहेत. वाढत्या तापमानात वन्यजीवांची यातून पाण्याची व्यवस्था होत आहे. जंगलात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने वन्यजीव तहाण भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घेतात आणि त्याची शिकार केली जाते. हे टाळण्यासाठी आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जंगलात पाणी मिळत नसल्याने त्याच ठिकाणी वन्यजीवांचा तडफडून मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. असे असले तरी वनाधिकारी व कर्मचारी गॅस कनेक्शन वाटप करणे, तेंदू बोनसचे वाटप करणे व मानवीकृत रोपवाटीकांचे बोगस बिल पाठविण्यात व्यस्त आहे.आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वन्यजीवांना संजीवनी मिळत आहे. यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्ह्याच्या पाचही वन विभागात यंदा राबविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यात सध्या उष्णतेचा पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. नदी, नाले, तलाव, बोड्या, वनतलाव, खोदतळे पूर्णत: आटले असल्याने जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.आरमोरी वन परिक्षेत्रातील जे नैसर्गिक पाणवठे आहे, ते पूर्णत: कोरडे पडले आहे. दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वन्यप्राण्यांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याशिवाय वन्यप्राण्यांचा जीव जाऊ नये, यासाठी ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्या ठिकाणच्या खोदतळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी सुविधा होत आहे.- एच. जी. बारसागडे,वन परिक्षेत्राधिकारी, आरमोरी

टॅग्स :forest departmentवनविभाग