शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:32 IST

जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे,.....

ठळक मुद्देखोदतळ्यात टंँकरद्वारे पाणीसाठा : वन विभागाकडून वन्यजीवांसाठी केली जात आहे सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे, अशा ठिकाणी खोदतळ्यात व कोरडे पडलेल्या पाणवठ्यात वन विभागामार्फत टँकरद्वारे पाणीसाठा केला जात आहे.आरमोरी वन परिक्षेत्रातील अरसोडा, कासवी, रवी, वैरागड, डोंगरतमाशी व इतर वनक्षेत्रात साधारणपणे ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे, त्या परिक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठ्यात तसेच स्वनिर्मित खोदतळ्यात आरमोरी वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी टँकरद्वारे पाणीसाठा करीत आहेत. वाढत्या तापमानात वन्यजीवांची यातून पाण्याची व्यवस्था होत आहे. जंगलात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने वन्यजीव तहाण भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घेतात आणि त्याची शिकार केली जाते. हे टाळण्यासाठी आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जंगलात पाणी मिळत नसल्याने त्याच ठिकाणी वन्यजीवांचा तडफडून मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. असे असले तरी वनाधिकारी व कर्मचारी गॅस कनेक्शन वाटप करणे, तेंदू बोनसचे वाटप करणे व मानवीकृत रोपवाटीकांचे बोगस बिल पाठविण्यात व्यस्त आहे.आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वन्यजीवांना संजीवनी मिळत आहे. यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्ह्याच्या पाचही वन विभागात यंदा राबविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यात सध्या उष्णतेचा पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. नदी, नाले, तलाव, बोड्या, वनतलाव, खोदतळे पूर्णत: आटले असल्याने जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.आरमोरी वन परिक्षेत्रातील जे नैसर्गिक पाणवठे आहे, ते पूर्णत: कोरडे पडले आहे. दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वन्यप्राण्यांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याशिवाय वन्यप्राण्यांचा जीव जाऊ नये, यासाठी ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्या ठिकाणच्या खोदतळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी सुविधा होत आहे.- एच. जी. बारसागडे,वन परिक्षेत्राधिकारी, आरमोरी

टॅग्स :forest departmentवनविभाग