शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पावसाळ्यातही रेंगाळणार राष्ट्रीय महामार्गाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:04 IST

गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या गडचिरोली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळले आहे. धानोरा आणि चंद्रपूर मार्ग अर्धवट खोदून धिम्या गतीने काम सुरू असल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अशक्य झाले आहे.

ठळक मुद्देकामाची गती धिमी : पावसाळा लागताच वाहतुकीचा अडथळा वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या गडचिरोली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळले आहे. धानोरा आणि चंद्रपूर मार्ग अर्धवट खोदून धिम्या गतीने काम सुरू असल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात शहरवासीयांना वाहतुकीच्या कोंडीसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.छत्तीसगड सीमेवरील मुरूमगाव ते चंद्रपूर अशा २६२ किलोमीटर लांबीच्या या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० चे गडचिरोली शहरातील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी हाती घेण्यात आले. परंतु कंत्राटदाराच्या काम करण्याच्या धिम्या गतीमुळे हे काम पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्गाचे काम पाहणाºया अधिकाऱ्यांचेही त्यावर कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते.शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाची रूंदी जास्त नसली तरी या मार्गावर दुभाजक राहणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे मार्ग लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या एका बाजुचा मार्ग खोदून त्यावर गिट्टी, मुरूम व चुरीचा थर टाकणे सुरू आहे. त्यावर सिमेंटीकरण झाल्यानंतरच दुसºया बाजुचा मार्ग खोदला जाईल. ऐन पावसाळ्यात एका बाजुचा रस्ता खोदलेला राहिल्यास त्यात पाणी साचेल. चिखलामुळे वाहने घसरून खोदलेल्या रस्त्याच्या पाण्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.हिवाळा आणि उन्हाळ्यासारख्या मोकळे हवामान असणाºया काळातच हे काम तातडीने मार्गी लागले नसताना पावसाच्या अडथळ्यात या कामाला पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.शेकडो झाडांची कटाईशहराच्या चंद्रपूर मार्गावर कॉम्प्लेक्स एरियापर्यंत अनेक वर्ष जुनी मोठमोठी झाडे रस्त्याच्या दुतर्फा होती. ही झाडे महामार्गाच्या कामासाठी कापण्यात आली. या मार्गाला पुन्हा ते वैभव प्राप्त करून घेण्यासाठी नवीन रस्त्याच्या बाजुला पुन्हा सक्तीने झाडे लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग